मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

स्वतंत्रवीर म्हणून नावाजलेले विनायक दामोधर सावरकर

  ने मजसी ने परत मातृभूमीला ।  सागरा, प्राण तळमळला    भारत भूमीच्या स्वातंत्रतेसाठी कोठलीही किंमत मोजू पण स्वातंत्र्याची देवता आम्ही प्रसंन्नच करू ही जिद्दीची असा ठेवणारे विनायक दामोधर सावरकर     स्वतंत्र वीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर यागावी राधाबाई यांच्या पोटी झाला.  वडील दामोधर सावरकर यांना एकूण तीन अपत्य त्या पैकी विनायक हे दुसऱ्या क्रमांकाचे. विनायक यांचे वडील हे व्यवसायाने सावकार. विनायक नऊ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे छत्र त्यांच्या पासून हिरावले. मोठया काकूने त्यांचा सभांळ केला. पुढे इंग्रजांच्या अत्याचारमुळे त्यांची सावकिरी गेली. आणि त्यातच प्लेग रोगाच्या साथी मध्ये वडीलही वारले. मोठया काकांना इंग्रजांनी एका आंदोलनात गोळी झाडली, असे अनेक संकटे भघितल्यावर तुळजा माते पुढे शिवराया प्रमाणे प्रण घेतला की शेवटच्या स्वासा पर्यंत इंग्रजां बरोबर संघर्ष करत राहील.     स्वातंत्रवीर सावरकर हे बालपणापासूनच हुशार होते. सावरकर हे छत्रपती शिवराय यांच्याकडून प्रेरित होते. काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यावर इंग्...

छत्रपती शिवरायांच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या जयंती का ?

  छत्रपती शिवरायांची   सर्वात प्रथम जयंती साजरी केली असेल तर ती म्हणजे महात्मा जोतीराव फुलेंनी. त्यांनीच सर्वप्रथम शिवरायांची समाधी शोधली. व 1869 रोजी जयंती साजरी केली. पण त्यांनी जी जयंती साजरी केली, ती शिवकालीन बखरींनी नमूद केलेली तारीख होती. यानंतर जेव्हा लोकमान्य टिळकांनी पुण्यात एप्रिल 1900 च्या दरम्यान शिवरायांची जयंती साजरी केली. याचा सविस्तर उहापोह त्यांनी केसरी वृत्तपत्रात 14 एप्रिल 1900 रोजी केला आहे.        यात मुख्य कारण जर पाहिले तर शिवरायांचा जन्म ज्या कालावधीत झाला. तो कालावधी धामधुमीचा होता. शहाजीराजे आदिलशीहीशी बंड करून बंगळूरला होते. व जिजामाता या शिवनेरी किल्यावर होत्या. जिजाऊंच्या रक्षणासाठी किल्लेदराने किल्ला पूर्ण कडे कोट बंद केला होता. या धामधुमीच्या कालावधीत बखरी यांच्या कडून योग्य तारीख बखरीत लिहिणे राहून गेली असेल असे एक कारण आढळते. शिवाय शिवरायही स्वतःचाच महिमा गुणगान किंवा इतिहास लिहून घेणाऱ्यामधले राजे नव्हते. स्वराज्याच्या कार्यात ते इतके व्यस्त होते, की त्यांच सार आयुष्य मुघल ,आदिलशाही  यांच्याशी संघर्षात व स्वराज्य स्थाप...

छत्रपती शिवराय नवीन मोहीम हाती घेण्या अगोदर घेत होते या पद्धतीची सुरक्षा व काळजी

        छत्रपती शिवराय बालपणापासूनच शांत व विचारी स्वभावाचे होते, कोणताही नवीन निर्णय घेण्या अगोदर ते अनेक बाजुंनी त्या गोष्टीचा विचार करत. पूर्ण गुप्तचरां कडून योग्य माहिती मिळाल्यावर ते पुढची योजना राबवत.        कोणत्या किल्यावर ते हमला करणार आहे. याविषयी काही वेळा जिजाऊ महासाहेब यांना सुद्धा माहीत नसतं. एवढंच काय तर जे सैनिक शिवराया बरोबर कामगिरीवर जात त्यांना सुद्धा शिवराय कोणता किल्ला, व कोणती कामगिरी बजावणार आहे याचा पत्ता सुद्धा लागत नसे. अफजलखान वधाच्या वेळी शिवरायांनी कोणती योजना बनवली आहे याची माहिती जिजामाता सह बाकी इतर कोणालाही नव्हती. एवढी छत्रपती शिवराय गुप्तता राखत.      याचे मूळ कारण बघितले तर दुष्मणाला  कुठल्याही पद्धतीने आपण घेणारे निर्णय कळू न देने. अदिलशाही किंवा मुघलशाही असो या शाही मध्ये सुद्धा गुप्तचर ठेवत. त्यामुळे नव उमळलेलं हे स्वराज्य बघण्यासाठी शिवरायांना अधिक सावधगिरी बागळणे आवश्यक होते. शिवाय शिवरायांचेच अनेक नातेवाईक शरीराने शिवरायनकडे आणि जहागिरीसाठी मनातून आधीलशाही मुघलशाही यांच्याकडून होते. ...

प्रत्येक किर्तीवान पुरुषा मागे एका धेर्य वाण मातेचाच हात । जागतिक मातृदिन

      मित्रांनो आपण जर पाहिले तर अनेक कीर्तीवाण मातानी इतिहासात आपली नावे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली आढळून येते. ज्यांनी आपल्या पोटी एका शूरविरास जन्म दिला.      भारत भूमी तर अनेक वीरांनी भरली आहे पण त्यांना घडवण्यासाठी एक माताच होती, हेही आपण लक्षात घ्यायला हवे,       माता कौसल्या यांनी प्रभू राम यांना जन्म दिला आणि आपल्याला एक मर्यादा पुरुषोत्तमाचे चरित्र बघण्यास मिळाले. यावरून माता कैसाल्या यांनी श्री रामाला जी शिकवण दिली असेल, ती  श्री रामच्या कीर्ती यावरून लक्षातच येते.      माता देवकी यांनी श्रीकृष्ण रक्षणासाठी जे प्रयन्त केले ते फक्त एक माताच करू शकते, तर माता यशोदेने श्रीकृष्ण यांना ज्या प्रेमाने वाढवले, यातून ऐका प्रेमळ मातेचे जीवापाड प्रेम दिसून येते.    कुंती मातेने पांडवांना धर्माविषयी जागृत केले नसते, तर महाभारतातील धर्मयुद्ध झालेच नसते.      राजमाता  जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवले नसते. शिवरायांनी ज्या ठिकाणी स्वराज्य मिळवले, त्याठिकाणी काय अवस्था असती ते वेगळे सांगाय...

शिवरायांच्या बालपणीच्या लाल महाला विषयी थोडक्यात माहिती

        शहाजी   महाराजांनी छत्रपती शिवरायांवर पुण्याचा जहागीर सोपवली. त्यावेळी शिवराय लहान होते. त्यामुळे दादोजी आणि जिजाऊच पुण्याचा करोभार पाहत होतो. नेस्त नाबूत केलेल्या पुण्यात सुरुवातीला शिवरायांना व जिजाऊंना राहण्यासाठी व करोभार बघण्यासाठी जागा नव्हती. राजमाता जिजाऊ यांच्या आदेशाने दादोजींनी लाल महालाचे काम सुरू केले. पुण्यात जनता पुन्हा येऊन काम करावी यासाठी दादोजींनाही युक्ती मिळाली लाल महालाचे काम त्यांनी जोरात सुरू केले.       ही जागा बघताना दादोजींनी अनेक छोटया छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या. पाणी मुबलक हवे, जंगली जनावरापासून दूर ,आणि असे ठिकाण ज्यापासून जहागिरीव र लक्ष ठेवता येईल. आणि जनतेला फिर्याद मांडण्यासाठी जवळचे स्थान असेल.     लाल दगडांनी बांधले म्हणून लाल महाल नाव ठेवण्यात आले. लाल महाल हा पुणे शहराच्या मध्यभागी असून कसबे पेठ यामध्ये जिजामाता उद्यानात आहे.  हे उद्यान १९८८ साली महिला व लहान मुलांसाठी बनवले होते. जवळच शनिवार वाडा, आणि गणपतीचे भव्य मंदिर आहे.    शिवरायांचे सर्व लहानपणीचे बालपण याच महाल...

आठव्या वर्षीच रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली होती कविता शिवराया कडून झाले होते प्रेरित

    ज्या वयात आपल्याला शाळेतील बाराखडी व्यवस्थित येत नाही, त्या वयात रवींद्र नाथ टागोर यांनी कविता लिहिणे चालू केले होते.       रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकात्यातील जोराशनग येथील पिराली या ब्राम्हण कुटुंबात झाला. वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी. देवेंद्रनाथ यांना एकूण १४ अपत्य होती. त्यात रवींद्रनाथ १३ वे. लहानपणापासूनच रवींद्रनाथ यांना काव्य लेखन कथा लेखन यात रस होता. वयाच्या  १६ व्या वर्षीच त्यांनी भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला.     पुढे ब्यारिस्टर होण्यासाठी ते लंडनला गेले.पण कोठलीही पदवी न घेता ते भारतात परतले. बंगालला परतल्यावर त्यांनी मृणाली देवी यांच्याशी विवाह केला. रवींद्रनाथ यांना एकूण ५ अपत्य झाली. पण त्यातील २ अपत्य  वारली.      पुढे रवींद्र नाथाच्या वडिलांचे निधन झाल्यावर ते आपली घरची मालमत्ता सभाळण्यासाठी जन्म गावी परतले. पण येथेच त्यांच्या पत्नी व तीनही अपत्याचा मृत्य झाला.       अनेक दुःख झेलण्या नंतरही त्यांनी गीतांजली हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. यासाठी त्यां...

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

संकटातही एका बाणात अनेक निशाण भेदण्याची कला फ़क्त छत्रपती शिवरायांतच (भाग २)

  छत्रपती   शिवरायांनी आपल्या सरदारांना आणि मावळ्यांना मातृभूमी विषयी एवढं जागृत केलं होतं की दुष्मन कितीही मोठा असोत पण त्याचा सामना करायचाच.  त्यामुळेच बाजी पासळकरांनी दोन मोठे विरोधक सुभानमंगळ गडावर असूनही त्यांचा सामना केला.        शिवरायांना गड ताब्यात आल्याची वर्दी बाजीनी दिली. गड फत्ते झाल्याचे समजतात. शिवरायांना खुप आनंद झाला. पण जेव्हा ही बातमी आधीलशाहाने पाठवलेल्या फत्तेखानाला समजली तो चवताळून उठला. त्याने सरळ चाकण वर चढाई करायचे ठरवले.      इकडे बाजी पासळकरांनी सुभानमंगळ गडातून मोठी लूट मिळविली. घोडे आणि दारुगोळा मोठया प्रमाणात मिळाल्यावर ती सर्व कुमक घेऊन शिवरायांनी बाजींना चाकण ला बोलावले. आदिलशाहीचा दारुगोळा अदिलशाही वर वापरायचा असे शिवरायांनी ठरवले.         फक्त मोठ्या फौजेच्या भरोश्यावर आलेला फत्तेखान शिवरायांच्या योजनेला समजू शकला नाही त्याने सरळ किल्यावर हल्ला चढवला. शिवरायांनी सर्वात आधी खानाला तोफांच्या गोळ्यांच्या सीमेत आणले, व त्यानंतर बेसावध खानावर गोळे डागण्यास सुरुवात केली. तोफेच्या गोळ्...

संकटातही एका बाणात अनेक निशाण भेदण्याची कला फ़क्त छत्रपती शिवरायांतच ( भाग १)

  छत्रपती  शिवरायांच्या अदिलशाही विरुद्ध चाललेल्या कार्यवाही बघितल्यावर शिवरायांनी ज्यावेळी चाकण घेतला. त्याशेजारीच असलेले अदिलशाहीचे शिरवळचे ठाणे या ठिकाणी  असलेल्या अमिनाने अदिलशाही मध्ये शिवराया विरुद्ध तक्राळ केली. त्यांनतर अमिनाच्या तक्रारीने व दरबारातील शिवरायांच्या विरुद्ध कानपिचक्या ऐकल्यावर नशेत धुंद अदिलशाहा काहीसा जागा झाला. त्याने ताबडतोब शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानाला पाठवले.       ही खबर जेव्हा शिवरायांना समजली, त्यावेळी शिवराय काहीसे हर्ष भरीत झाले. पण दरबारातील जिजाऊ महासाहेब ,बाजी पासलकर ,तानाजी सर्व अचर्यचकीत झाले. जिजाऊंनी विचारल्यावर शिवराय म्हणाले की "आम्ही विचार केला त्यापेक्षा अदिलशाही काहीशी उशिरा जागी झाली. मुळात खर पाहिलेतर हे आपल्याला संकट नाही तर संधीचं आहे. कसे काय या विषयी बाजी पासलकर यांनी शिवरायांना विचारल्यावर शिवराय म्हणले "सर्वात आधी आपण फत्तेखानाला अडवू बाकी आई भवानी बळ देईलच.     ठरल्या प्रमाणे शिवारायनी चाकण किल्यावर आले. तो पर्यंत फत्तेखान खळत- बेलसरला तळ देऊन बसला होता. शिवराय चाकणला आल्य...

आम्हाला गड नको. तुम्ही हवे होता, शिवरायांचे फिरंगोजी नरसाळ यांना बोल

      छत्रपती   शिवरायांच्या आदिलशाही विरुद्ध कार्यवाही सुरूच होती. तोरणा , पुरंधर, रायरेश्वर घेतल्यानंतर शिवराय पुढील कोणती कामगिरी हातात घेतात, यासाठी लाल महालात बैठका बसू लागल्या. या बैठकीत तानाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी वैगेरे मंडळी हजर असायची.      एकदा बैठकीत शिवरायांनी दर्शनासाठी अर्धी फौज घेऊन बाहेर पडायचे ठरवले. पण यातील कोणालाच काही माहीत नव्हते, सर्वाना वाटले की शिवराय पुन्हा रायरेश्वराच्या दर्शनासाठी चालले आहे. पण अर्ध्या मार्गावर शिवारायनी मार्ग बदलला आणि चाकणची वाट पकडली. सर्व चकित झाले. काहींना वाटले की शिवराय चाकण घेण्यासाठी निघाले आहेत. तानाजीने अदबीने विचारले की राज चाकण घेण्याचा विचार दिसतोय , यावर शिवराय म्हणाले की "आई भवानी जी बुद्धी देईल ते करू.    शिवराय चाकण किल्याच्या दरवाज्या समोर फौज घेऊन उभे राहिले. हवलंदाराला काहीच कळेना. चाकण किल्याचे किल्लेदार होते   फिरंगोजी नरसाळा. फिरंगोजी स्वभावाने धार्मिक व कर्मठ होते. मातृभूमी वर त्यांना प्रेम होते. पण पिढी जात त्यांना आदिलशाहीचा किल्ला राखण करावा लागत होते....

यशवंतराव चव्हाण यांच्या या चतृर्या मुळे मुंबई महाराष्ट्रात। १ मे महाराष्ट्र दिन

       इंग्रजांनी भारताची फाळणी जाती नुसार करण्याचा भरपूर प्रयत्न केला. परिणाम भारत पाकिस्तान फाळणी होण्यास कारक ठरली.       पण जेव्हा भारत एकसंघ राष्ट्र म्हणून उदयास आले, त्यावेळी भारताचे पाहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाले. त्यांनी राज्य संघ म्हणजेच कुठलेही राज्य न निर्माण करण्या पेक्षा भारतात भारत एकसंघ निर्माण करण्याचे ठरवले, ज्यामध्ये क्षेत्रानुसारच भारतात फक्त ४ ते ५ राज्य सुरुवातीला होती. पण भारतातील अनेक क्षेत्रातून क्रांती घडवून आली. ही क्रांती होती भाषेवरून. महाराष्ट्र आधी गुजरात, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मधील काही भाग मिळून होता. पण येथील जनते मध्ये भाषा व संस्कृती वरून वाद निर्माण झाला. त्यावेळेस या तीनही राज्यांना सौराष्ट्र म्हटले जाई. आणि या राज्याचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. त्यावेळेस काँग्रेस पक्ष भारतातील सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे अनेक मोठे नेते या पक्षात काम करत होते. ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण पण होते. आणि महत्वाचे निर्णय हे पक्षातील मोठे नेते घेत.       जनतेतील भाषा व संस्कृती वरून राज्य निर्मितीची ...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रेरक जीवन

        ग्रामविकास   हा देश विकासाचा पाया आहे, हा दुरदृष्टीकोन ज्या संतांचा होता असे तुकडोजी महाराज. भारतात ग्रामीण भाग सर्वात जास्त आहे. तो जर सुजलाम सुफलाम झाला. तर देश प्रगती पथावर जाण्यास कोणीही रोखु शकणार नाही. हे भविष्यातील स्वप्न ही तुकडोजी महाराज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते.     युवाच भविष्यात भारत विकासात सर्वात महत्वाची भूमिका आहे, ही बाब सुद्धा तुकडोजी महाराजांच्या लक्षात आली होती. पण त्या अगोदर महिला सुशिक्षित होणं ही आवश्यक आहे कारण त्याच अशा युवकांना घडवू शकतील हे विचार सुद्धा तुकोडजी महाराजानी इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हाच विचार केला होता. आणि यासाठी त्यांनी प्रयन्त ही केले होते.       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. वडिलांचे नाव बंडोजी तर आईचे नाव मंजुळा बाई.      तुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिक बेंडोजी इंगळे. पण तुकडोजी हे नाव महाराजांना त्यांच्या गुरूंनी दिले.      समाज प्रभोधनासाठी तुकडोजी महाराज ग्रामगीता हा...

वीर बाजीराव पेशवे यांची वयाच्या फक्त २० साव्या वर्षी पेशवे पदावर नेमणूक

        पाहिले किंवा थोरले बाजीराव पेशवे म्हणून ओळखले जाणारे बाजीराव बल्लाळ हे चौथे छत्रपती म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शाहू महाराजांच्या कालावधीत बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर  श्रीमंत पेशवे पदावर आरूढ झाले.       बाजीराव पेशवा हे बाळाजी विश्वनाथ यांचे सुपुत्र, बाजीराव यांनी वडिलांच्या सानिध्यात अनेक युद्ध कोशल्याच्या बाबी शिकल्या. मुघलसाम्राज्य जेव्हा कमकुवत झाले. त्यावेळी  बाळाजी विश्वनाथ हे अनेक वेळा उत्तरे कडे सत्ता स्थापन करण्यासाठी मोहीम हाती घेत. त्यामुळे कोवळ्या वयात हट्ट करून बाजीराव हे सुध्दा उत्तरेकडे मोहिमेत शामिल होत. उत्तरे कडील दिल्ली, आग्रा या प्रदेशातील मारा करण्यासाठी मोक्याच्या ठिकाण बाजीरावणे बालपणीच पाहून ठेवले.       बाजीराव हे स्वभावाने तापत होते. शांत व मुत्सद्देगिरीपेक्षा तालावर बाजीराव यांना जवळची वाटायची.        त्यामुळे जेव्हा पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीमंत पेशवा पद हे बाजीराव यांच्या कडे देण्यास छत्रपती शाहू महाराजांचे राजदरबारी मनाई करत होते. यांचे...

जगायचं तर वाघ होऊन, शेळी होऊन आता जगू वाटत नाही। दादोजींचे आणि मावळ्यांचे शिवरायांना बोल

        छत्रपती   शिवरायांनी ज्या वेळी रारारेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, त्यावेळी मुघलांचे अत्याचार पाहून मावळ्यांच्या मनात राग उफळत होता. परकीय निजाम केव्हाही काहीही आदेश देतील आणि आपली गाव लुटली जातील ,आया बायांच्या अब्रू लुटल्या जातील, हे मावळे शतकानुशतके बघतच होते. त्यात आपले काही हिंदू राजे जहागिरी साठी केव्हाही आपला मान या निजामान पुढे झुकवत. ज्याचा राग सामान्य जनतेत आणि मावळ्यांच्या मनात होताच, फक्त त्याला आग लागने गरजेचे होते. जे शिवरायांनी केले, देशभक्ती मातृभूमी प्रेम जागृत करून.       दोदोजीं कोंडदेव ही शहाजी राज्या सह निजामाची गुलामगिरी करण्यास राग येत होता, शहाजीराज्यानी  निजामविरुद्ध बंड पुकारला, त्यात दादोजींची मदत होती. पण ज्यावेळी बंड मोडून काढला, त्यावेळी दादोजींचे मन हिरमुसले होते. ज्यावेळी शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. सुरुवातीला शहाजीराजेना आलेले अपयश शिवरायांना ही येते की काय? असे दादोजींना वाटायचे, पण जेव्हा शिवरायांचा स्वराज्या प्रति उत्साह ,आणि जोश पाहिल्यावर त्यांचीही खात्री पटली होती.      ज्या क...

हनुमान जयंती निमित्त बलशाली बजरंगा कडून घ्या ५ अतिमोलाचे गुण

  जय हनुमान ज्ञान गुण सागर । जय कपीस तिहु लोक उजागर।     संत तुलसी दास यांनी लिहलेला हा बजरंगाचा चालिसा सर्वश्रुत प्रसिध्द आहे. ४० कडवे असल्यामुळे चालिसा हे नाव प्रसिद्ध झाले.      नाशिक जिल्यातील अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला. वडील केसरी जे वानरांचे महाराज होते.       बालपणात सूर्याला जेव्हा फळ म्हणून खाण्यास उड्डाण केलेल्या वायुसुता ला इंद्राने बघितल्यावर वज्रचा मारा केला, ज्यामध्ये हनुमानाच्या हनुवटीला मार लागला, वायू देवला याचा खूप राग आला. तो राग शांत करण्यासाठी अनेक देवांनी हनुमंताला शक्ती प्रदान केली, कुबेराने गदा दिली, तर इंद्राने हनुवटीला मारा लागल्या मुळे हनुमान हे नाव प्रदान केले.       बलशाली हनुमंत    शक्ती आणि सामर्थ्य या दोन्हीचा जेथे संगम आढळतो, असे हनुमंतराया. कुस्ती खेळणारे पहिलवान डाव खेळताना पहिल्यांदा हनुमंताचे स्मरण करतात.   बुद्धिवंत  मारुतीराय   सूर्याच्या प्रतिक्रम चालू असताना हनुमंताने सूर्याकडून ज्ञान घेतले. हनुमंत ज्ञान घेण्यासती सतत तत्पर...

छत्रपती शिवरायां सह त्यांच्या सवनगड्यांची रायरेश्वराच्या मंदिरातील शपथ

            निजाम, मुघलांचे अत्याचार बघितल्याव जिजामातेच्या मनात तसेही ज्वाला भडकत होती. आणि हीच ज्वाला जिजाऊंनी शिवरायांच्या मनात बालपणापासूनच रुजवण्यास सुरुवात केली.         त्यात शिवरायांचे विचारही बालपणापासून प्रखर व अन्यायाविरुद्ध वाचा फोडनारे होते. बालपणापासूनच निजामशाही चे अत्याचार, हिंदूंचा होणारा छळ, जनतेची लूट असे सर्व वातावरण एक निजामशाहीतील नामी सरदारांचा पुत्र असताना शिवराय पाहत होते. जेथे समोर सर्व सुख सुविधां होत्या तरीही सामान्य जनतेसाठी काही कर्तुत्व करून दाखवन्याचे शिवरायांनी ठरवले.      ज्या वयात आपण नववी,दहावी चे पेपर देत होतो. त्या वयात शिवरायांनी स्वराज्य स्थापण करण्याची शपथ घेतली. तीही बारा मावळ रानातील त्या योध्याबरोबर जे शिवराया पेक्षा वयाने मोठे होते.         छत्रपती शिवरायांनी मावळ्यामध्ये मातूभूमी, देशप्रेम या विषयी जागृत केले, आणि वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ रोजी रायरेश्वराच्या मंदिरात सर्वा समावेत एक शपथ घेतली.     शिवपिंडीवर बेलपत्र वाह...

भगवान महावीर वर्धमान यांच्या जयंती निमित्त त्यांनी सांगितले ५ अतिमोलाचे तत्व

    भगवान  महावीर हे जैन धर्माचे २४ वे तिर्थकर. ज्यांचा जन्म इ.स.पू ५९९ ते ५२६ या दरम्यान उत्तरेकडील कुंडलपूर येथे इस्वाकू वंशात झाला.वडील सिद्धार्थ जे एक क्षत्रिय राजा होते, तर आईचे नाव  त्रिशला होते.        महावीर हे खरे अविवाहित राहणार होते. पण माता पितांच्या आग्रहामुळे महावीर वर्धमांन यांचे लग्न यशोदा नामक राजकन्ये बरोबर झाला. महावीर यांना प्रियदर्शिनी नावाची मुलगी होती.         महावीर यांनी १२ वर्ष तप करून अनेक विकारावर विजय मिळवला होता.       भगवान महावीर यांनी समाजाला अनेक बोधक संदेश दिले ज्या मध्ये त्यांचे पंचतत्व सर्वत्र प्रसिद्ध आहे ते पुढील प्रमाणे -   सत्य      सर्वांशी खर बोलावं खोट बोलणे हे एक पाप आहे ,असे भगवान महावीर यांचे मनाने आहे.   अहिंसा      कुठल्याही प्राण्यांची किंवा जीवाची हिंसा न होता ,सर्वा बरोबर अहिंसेने राहावे असा संदेश महावीरांचा आहे.     अस्तेय     म्हणजेच आपला अधिकार नसता दुसऱ्याची कुठल्याही वस्तूची चोरी करणं एक प्रक...

शिवरायांचा पुरंधर किल्ल्यावरील विजय कपट की गनिमी कावा भाग २

      छत्रपती  शिवरायांना आवश्यक होतं, ते प्रथम किल्ल्यामध्ये प्रवेश करण, कारण त्याशिवाय पुढील योजना आखण अवघड होतं, शिवाय निळोजीला थोडा जरी अविश्वास निर्माण झाला, तर किल्ल्यावर जाण अवघड होते. त्यामुळे शिवरायांनी योग्य संधीची वाट पाहिली.       संक्राजी ,व पिलाजी यांनी निळोजीची समजूत घालून, शिवरायांना दिवाळी सणाच्या दरम्यान निमंत्रण पाठवलं.निळोजीचा ही विश्वास शिवरायांवर होता, त्यामुळे त्याने निमंत्रिनाचे ताबडतोब पत्र पाठवले. आणि हीच संधी शिवरायांना नामी वाटली. शिवराय ताबडतोब तानाजी, जिवाजी या सवंगडया सह किल्यात दाखल झाले.      निळोजी तसा लोभी व भोगी पद्धतीचा होता. मद्य पिणं महिलांचे नृत्य बगण यातच तो आपलं आयुष्य घालवत होता. संध्याकाळी महिफिल बसल्यावत दिवाळी असल्यामुळे निळोजी ने शिवरायांना घाबरत मद्य देण्याचा पर्यंत केला.पण मात्र शिवारायनी हसत म्हणाले की मद्य आम्हाला वर्ज्य आहे ,पण आम्ही त्या जागी सरबत घेऊ .निळोजी ने ही सरबत आणण्यास आदेश दिला.     संक्राजी व पिलाजी याच दरम्यान शिवरायांकडे बघत होते. योजना आधीच ठरली होती. निळोजी मद...

शिवरायांचा पुरंधर किल्ल्यावरील विजय कपट की गनिमी कावा भाग १

      तोरणा   किल्यांनंतर शिवरायांना थांबणे घातक होते. मागरीच्या तलावात मोती काढण्यासाठी उतरल्यावर जसे चपळाई केल्यावर मोती हातात येतात, त्याच प्रणाने शिवरायांनी चपळाई दाखवण्यास सुरुवात केली.        मुळातच तोरणा जिंखल्यां नंतर ही विजापूरकर स्वस्थ झोपले होते ,याच गोष्टीचा शिवरायांनी फायदा घेण्याचे ठरवले. शिवरायांच्या खेपा रोहिडेश्वर, चाकण या क्षेत्रा मध्ये होऊ लागल्या ,त्याच वेळी त्यांचे लक्ष जवळच असलेल्या पुरंधर किल्यावर गेले. पुरंधर निजामाच्या हाती होता ,आणि किल्लेदार शहाजी महाराजांचे ,व दादोजींचा स्नेही निळकंठराव होते. त्यामुळे सुरुवातीला शिवरायांनी या किल्ल्याकडे फक्त नजर ठेवली .पण जेव्हा निळकंठराव यांच्या मृत्यू झाला, त्यावेळेस मात्र निळकंठराव यांच्या तीन मुलांमध्ये किल्याच्या महसुलीवरून वाद निर्माण झाला, आणि यातच नीलकंठराव यांच्या मोठा मुलगा निळोजी याने किल्यावर कबजा मिळवला. व लहाने दोन भाऊ संक्राजी व पिलाजी या दोघांनाही अधिकार देण्यास नकार दिला.  शिवराय किल्यावर चाललेल्या या  सर्व घडामोडी जाणत होते. निळोजी, संक्राजी व पिलाजी शिवराया...

श्रीरामाच्या चरित्रातुन घ्या ५ मौल्यवान गुण

    भारतात रामायण घडून गेले ,ही काही सामान्य बाब नव्हे,किंवा रामयनाकडे फक्त एक सामान्य धार्मिक, व सांस्कृतिक ग्रंथ म्हणून बघण्या पेक्षा जीवन सांगण्याचा जो मूळ मंत्र श्री यांनी सांगितले आहे ,त्याचे पालन करून आपण स्वतः आपले जीवन समृद्ध करू शकतो .      मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम     श्री राम कोणतेही कार्य करताना ते कार्य एका मर्यादेत राहून करत. त्या कार्याचा अतिरेक किंवा अधिक मिळवण्याची हवस श्री रामात नव्हती. त्यामुळेच श्री रामाला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम म्हटले जाते.     आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींची अपेक्षा तेवढीच बाळगा जी आपल्या मर्यादेत आहे.तिची अधिक अपेक्षा बाळगली तर त्या गोष्टीची माती होण्यास जास्त वेळ लागत नाही.   संयम     संयमी म्हणजे ज्या मध्ये उतावळे स्वभाव म्हणजे कुठलीही गोष्ट ताबडतोब मिळावी ही अपेक्षा नाही असा , श्री राम संयमी होते,कुठलेही कार्य ते संयमी राहून करत. तापत स्वभाव लक्ष्मणाला होता पण राम सतत लक्ष्मणाला संयम बागळण्यास सांगत .     आदर     संपूर्ण रामायणात श्री र...

समर्थ रामदासस्वामीचे छत्रपती शिवरायांना व समाजाला मौल्यवान उपदेश

  यज्ञ तो देव जाणावा,   किंवा, वाळूचे कण रगडीता तेलही गळे,     असे संसारात न राहूनही समाजाला मौल्यवान उपदेश देणारे रामदास स्वामी, भक्ती ,धेर्य आणि हिम्मत या बळावर आपण कोणतेही लक्ष्य साध्य करू शकतो. समर्थ रामदासस्वामीनी जगप्रसिध्द ग्रंथ दासबोध मध्ये तर अनेक तात्विक विचारणा मांडले आहे. हे वरील काही उपदेशावरून लक्षातच आले असेलच.     जागी सर्व सुखी असा कोण आहे,     विचारी मना तूचि शोधूनि पाहे ,   त्यामुळे कर्तव्य महत्वाचे .जन्म का मिळाला? आपले मूळ कर्तव्य काय? तर समाजहित ,समाजासाठी कार्य ,कर्तव्य केले. तर ते ईश्वराला जाऊन मिळते असे अनेक उपदेश समर्थानी छत्रपती शिवरायांना सह छत्रपती संभाजी महाराजांना ही केले आहे.       समर्थांचा जन्म २४ मार्च १६०८ जालना जिल्यातील जांब या गावी झाला. वडिलांचे नाव सूर्याजी ठोसर तर आईचे नाव रेणुबाई, समर्थ लहानपणापासून खोडकर होते .पण एका निश्चित कालावधी नतंर त्यांच्यात बदल होऊ लागला .एकाच जागी निपचित राहून सम्पूर्ण जगाचा विचार करत, आई रेणुबाईना समर्थांचा हा स्वभाव लग्न झाल्यावर ताळ्यावर येईल, असे वाट...

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

छत्रपती शाहू महाराजांच्या कालावधीत श्रीमंत पेशवा पदास अधिक ताकद का प्राप्त झाली?

        छत्रपती  संभाजी महाराज सत्तेवर होते, त्याच कालावधीत औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला. तब्बल नऊ ते दहा वर्षे मुघलांना अडवल्या नंतर फंद फितुरीला ते बळी पडले, व मुघलांच्या कैदेत गेले. शंभूराज्यांचे पुत्र शाहू महाराज लहान असल्या मुळे शंभू राज्यांच्या पत्नी येशुबाई यांनी काही दिवस करोभार बघितला ,पण रायगडाचा किल्लेदार  खंडोजी पिसाळ मुघलांना जाऊन भेटला, त्यामुळे शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई मुघलांच्या ताब्यात गेले.यानंतर गादीवर आले ते शिवरायांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज भरपूर दिवस मुघलांचा सामना केल्यानंतर ते ही वीर गतीला प्राप्त झाले.     शेवटी गादीवर आल्या त्या ताराबाई, भरपूर दिवस मुघलांना आडवणाऱ्या त्या महाराणी बनल्या. वृद्ध झालेला औरंगजेब शेवटी महाराष्ट्रातच त्याने आपली कबर खोदली . औरंगजेबांनंतर बादशहा कोण होणार यासाठी मुघलांमध्ये आप आपसात युद्ध होऊ लागले. याच दरम्यान शाहू महाराज व येसूबाई यांना मुक्त करण्यात आले. हक्काने वारसदार शाहू महाराज होते. पण ताराबाई स्वतः निर्माण केलेल राज्य  शाहू महाराजांना  देण्यास नकार दिला . शेवटी...

अखेर वेडात मराठे वीर दाऊडले सात। वीरांची म्हण प्रचलित

        प्रतापराव   यांनी बहलोलखानास सोडल्यामुळे शिवरायांचे जे खरखरीत पत्र रावांनी वाचले त्यामुळे त्यांचे मन दुःखी झाले  .      शिवरायांनी कल्पना केल्या प्रमाणे खानाने जखमी सर्पप्रमाणे पुन्हा ताकद जुटाऊन स्वराज्यकडे वाटचाल सुरू केली, प्रतापराव यांना खान चालून येत असल्याची वार्ता कळली तेव्हा त्यांना पाश्चाताप ही झाला ,आणि रागही आला .   खान चालून येताना आता मोठी फौज घेऊन येत होता, तो पूर्ण चौताळलेला होता. स्वराज्यातील सर्व गाव तो उध्वस्त करत चालला होता ,मोठी फौज असल्यामुळे ताबडतोब खानाला थांबावं आता प्रतापरावांना अशक्य होतं ,कारण पहिल्या युद्धात  अर्धी सेना दमलेली होती, व नव्या व ताज्या दमाची फौज येण्यास किमान १५ एक दिवस लागणार होते ,प्रतापरावांच्या सहकाऱ्यांनी अत्ता थोडा धीर धरण्यास सांगितलं, पण शिवरायांचे खरखरीत पत्र व बहलोलखानाचा उर्मट पना रावा ना पाहवेना .     खान आला त्यावेळी शेजारच्या जंगलामध्ये राव शिकार करत होते, गुप्तचरणी जेव्हा ही खबर राव याना दिली तेव्हा प्रतापरावांचे रक्त खानाला पाहून सळसळू लागले पुढचा कोणताही वि...

सला काय निमित्त केला? छत्रपती शिवरायांचे प्रतापरवाना खरखरीत बोल

          सरनोबत  प्रतापराव गुजर यांकडे बहलोलखानास पकडण्यास पाठवले यावरून शिवरायांना प्रतापराव यावर पूर्ण विश्वास होता, की ते नक्की ही कामगिरी पार पडतील आणि प्रतापराव यांनीही मोठ्या शौर्याने बहलोलखानास परास्त केले ही वार्ता ऐकून शिवराय फार आनंदीत ही झाले होते,        येथ पर्यंत सर्व ठीक होते पण जेव्हा भावनांच्या आहारी जाऊन  सारनोबत यांनी खानास जीवदान दिले ही गोष्ट शिवरायांना कळली तेव्हा त्यांची तळ पायची आग मस्तकात गेली .त्यांनी एक खरखरीत पत्र प्रतापराव यांना लिहिले, ज्यामध्ये ते प्रतापराव यांना म्हणाले की "तुम्ही स्वराज्याचे सरनोबत तुम्ही तरी अशी चूक करायला नको होती हाती, आलेला शत्रू तुम्ही जाऊ दिला कोणाच्या परवानगीने एकदा आमची रजामंदी घेणं आवश्यक वाटले नाही. हातून सुटलेला शत्रू हा जखमी सापसारखा आहे जो पुन्हा वार करण्यास नक्की येईल सला काय निमित्त केला .आता जो पर्यंत तुम्ही त्या बहलोलखानास पकडून आणत नाही तोपर्यंत आपले मुख सुद्धा आम्हाला दाखवू नका.        खरे पाहिले हातात आलेला शत्रू जर सुटला तर दुसऱ्या वेळेस वार ...

या योजनेने सरनोबत प्रतापराव यांनी बहलोलखानास परास्त केले

        छत्रपती   शिवरायांच्या शूर वीरांच्या तिजोरीत अनेक कल्पक ,धीर जिद्दी सरदार होते जे छत्रपती कडून एखादी कामगिरी मिळाल्यावर उसंत घेत नव्हते .      छत्रपतींचा राज्याभिषेक काही दिवसांवर येऊन ठेपला होता. आणि त्याच मुळे आदिलशाही आणि मुघलशाही एकत्र येणे लाजमी आणि शिवरायांचा प्रताप दाखवण्यास पुरेसे आहे. त्याच मुळे निजामाने बहलोलखानास १२ हजाराच्या फौजेसह छत्रपतीवर चालून जाण्यास सांगितले .ही खबर जेव्हा शिवरायांना कळली .तेव्हा त्यांनी ताबडतोब सरनोबत प्रतापरावांची भेट घेतली. खान उंबरणीत आपला तळ ठोकून बसला होता. आणि मुघलांकडून येणाऱ्या फौजेची वाट पाहत बसला होता. शिवरायांना ही नामी संधी वाटली .आणि प्रतापरावाणी शिवरायांच्या मनातील ही गोष्ट हेरली.   दुष्मन खाऊ द्यायच बलाढ्य होऊ द्यायच इतका वेळ दिल्यावर अंगावर घ्यायचं हे शिवरायांचे तत्व मुताळतच नव्हते .अंगावर येणारच आहे ,तर त्या आधीच दुष्मन ठेचायचा म्हणजे समोरच्याला पुढील हमला करता धाक पडायला हवा .       छत्रपती शिवरायांचा आदेश मिळताच प्रतापरावयांनी  खान जेथे तळ ठोकून बसला होता .त्या...

आपल्या मराठ्यांना हाच शाप विचारानं पेक्षा भावनाच बलवत्तर,।शिवरायांचे प्रतापरावाना वैचारिक बोल

      छत्रपती   शिवरायांच्या कालावधीतील इतिहास जर पहिला तर शिवरायांचे अनेक साथीदार, मावळे,सरदार शिवरायांसाठी जीव की प्राण देण्यास तयार होते. खरे पाहिले तर मराठे खाल्या मिठाला जगात, आणि एकदा वचन दिले तर ते तोडणे म्हणजे मराठ्यांना मृत्यू समान वाटत. शिवाय जुने व काही चुकीच्या  धार्मिक परंपरेत अडकलेल्या आपल्या हिंदूंवर पौराणिक कालावधीतील अनेक गोष्टींचा प्रभाव होता.भावनांच्या भरात अनेक वेळा शक्तीचा वापर अधिक होत होता. त्यामुळे कलियुगातील अनेक राजपटवरील डाव मराठे भावनांच्या बळावरच लढत .ज्याच्या मध्ये भावना बलवत्तर आहे ,तो विचारांचा  वापर करत नाही हे अनेक इतिहासातील उदाहरणावरून लक्षात येते.         राकट स्वभावाचे लक्ष्मण हे  श्री रामाच्या भक्तीती मध्ये राहत ,त्यामुळे अनेक वेळा युद्धच्या वेळी ते भावांच्या भारत युद्ध करत.   ( रावणाचा पुत्र इंद्रजित मायावी होता, हे रामाने समजून सांगितले होते ,तरीही श्री रामाला लालकरल्यामुळे भावनांच्या भरात लक्ष्मण इंद्रजित बरोबर युद्धास गेले, नंतर मायावी शक्तीचा वापर करून लक्ष्मणाला मूर्च्छित होण्या...

महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महाभारतातील कर्ण संबंध ।

    अनेक    संकटे आली.उच्च समजणाऱ्या समाजाने अनेक बद्दतीचा त्रास ही दिला. एवढ काय शिकत असताना दलित आहे, म्हणून वर्गा बाहेर बसवून शिक्षण ही दिले ,पण तरीही हार न मानता शिक्षण घेण्याची व समाज हितासाठी काहीतरी करून दाखवण्याची जी तिव्र इच्छा असणारे महामानव बाबासाहेब आंबेडकर.     महाभारतात अशाच दोन विराचे उद्धाहरण भेटते ते म्हणजे कर्णाचे आणि एकलव्याचे कर्णाला सूत पुत्र म्हणून अनेक वेळा युद्ध प्रशिक्षणा पासून दूर जावे लागले तर ऐकलव्यालाही कमी जातीचे उल्लेखून शिक्षणापासून दूर लोटण्यात आले.पण इतके संकटे येऊनही शेवटी महाभारताचा वीर योद्धा कर्णाला मानण्यात आले.      अशीच काही गोष्ट बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर झाली असे इतिहासाकडे बघून लक्षात येते .बाबासाहेब आंबेडकरही ध्येय वादी होते ,समाजहितासाठी काही करून दाखवण्याची जिद्द बाबासाहेबा मध्ये दिसून येते .     महामानव म्हटले जाणाऱ्या बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथील लष्करी छावणीत भिमाबाईंच्या पोटी जन्म झाला .आईचे नाव भीमाबाई असल्या मुळे बाबासाहेबाना भीमा असेही म्हणत. बाबासाहेबां...

भारतीय नुतून वर्ष गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज संभंध

        भारतीय नुतून वर्ष जर मूळ संस्कृती नुसार पाहिले तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच इंग्रजी महिन्या नुसार एप्रिल किंवा मे महिन्यात आपल्या महाराष्ट्राचा लाडका सण गुढीपाडवा आहे ,असे महाराष्ट्रातील जनते वरून दिसून येते .महाराष्ट्रात दिवाळी नंतर या सणाला महत्व आहे .     ह्या सणाचा प्रथम सभंधं जर पहिला तर इंद्र जेव्हा भूतलावर आले.तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक काठी व त्यावर नवीन कापड टाकून त्यांचें स्वागत केले, खर म्हणजे इंद्र हा पाऊस, वर्षा याचा देवता त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी शेतकऱ्यांनी असे स्वागत केले होते. आणि त्यानंतर ही एक परंपराच झाली .       म्हणजे पुराण कथेवरून ही गोष्ट स्पष्ठ होते की हा सण खरा शेतकऱ्यां पासून सुरू झाला असावा .       यानंतर एक पौराणिक कथा ज्यामध्ये असा उल्लेख येतो की श्री राम जेव्हा वनवासातुन पुन्हा अयोध्येत आले , तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या वासींनी गुढी उभारली व रामाचे स्वागत केले .      गुढी हा शब्द खरा तामिळ मधून आला आहे .गुढी म्हणजे तामिळ मध्ये काठी म्हणून गुढी पा...