मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महाभारतातील कर्ण संबंध ।



    अनेक  संकटे आली.उच्च समजणाऱ्या समाजाने अनेक बद्दतीचा त्रास ही दिला. एवढ काय शिकत असताना दलित आहे, म्हणून वर्गा बाहेर बसवून शिक्षण ही दिले ,पण तरीही हार न मानता शिक्षण घेण्याची व समाज हितासाठी काहीतरी करून दाखवण्याची जी तिव्र इच्छा असणारे महामानव बाबासाहेब आंबेडकर.

    महाभारतात अशाच दोन विराचे उद्धाहरण भेटते ते म्हणजे कर्णाचे आणि एकलव्याचे कर्णाला सूत पुत्र म्हणून अनेक वेळा युद्ध प्रशिक्षणा पासून दूर जावे लागले तर ऐकलव्यालाही कमी जातीचे उल्लेखून शिक्षणापासून दूर लोटण्यात आले.पण इतके संकटे येऊनही शेवटी महाभारताचा वीर योद्धा कर्णाला मानण्यात आले.

     अशीच काही गोष्ट बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर झाली असे इतिहासाकडे बघून लक्षात येते .बाबासाहेब आंबेडकरही ध्येय वादी होते ,समाजहितासाठी काही करून दाखवण्याची जिद्द बाबासाहेबा मध्ये दिसून येते .

    महामानव म्हटले जाणाऱ्या बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथील लष्करी छावणीत भिमाबाईंच्या पोटी जन्म झाला .आईचे नाव भीमाबाई असल्या मुळे बाबासाहेबाना भीमा असेही म्हणत. बाबासाहेबांचे वडील रामजी हे धार्मिक व प्रेमळ स्वभावाचे होते. बाबासाहेबानी खूप शिकावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. बाबासाहेबांचं उद्धिष्ट पूर्ण व्हावे अशी जर कोणाची इच्छा असेल तर ती म्हणजे त्यांची पत्नी रमाबाई . रमाबाईंनी जेव्हढे कष्ट सहन केले .असे कष्ट फक्त एक  पतिव्रताच घेऊ शकते बाबासाहेब जेव्हा विदेशात शिक्षण घेत होते त्यावेळी रमाबाईंनी अनेक कष्ट घेऊन बाबासाहेबांची आर्थिक मदत देत होत्या. 

       आज जी लोकशाही बगतोय ,सामान्य माणसासाठी जे कायदे बनवले आहे .त्या मध्ये बाबासाहेबांचा मोठा हात आहे. समाजासाठी व दलित समाजासाठी जे कार्य बाबासाहेबानी केले ते खरच वंदनीय आहे .

    अशा महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...