अनेक संकटे आली.उच्च समजणाऱ्या समाजाने अनेक बद्दतीचा त्रास ही दिला. एवढ काय शिकत असताना दलित आहे, म्हणून वर्गा बाहेर बसवून शिक्षण ही दिले ,पण तरीही हार न मानता शिक्षण घेण्याची व समाज हितासाठी काहीतरी करून दाखवण्याची जी तिव्र इच्छा असणारे महामानव बाबासाहेब आंबेडकर.
महाभारतात अशाच दोन विराचे उद्धाहरण भेटते ते म्हणजे कर्णाचे आणि एकलव्याचे कर्णाला सूत पुत्र म्हणून अनेक वेळा युद्ध प्रशिक्षणा पासून दूर जावे लागले तर ऐकलव्यालाही कमी जातीचे उल्लेखून शिक्षणापासून दूर लोटण्यात आले.पण इतके संकटे येऊनही शेवटी महाभारताचा वीर योद्धा कर्णाला मानण्यात आले.
अशीच काही गोष्ट बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर झाली असे इतिहासाकडे बघून लक्षात येते .बाबासाहेब आंबेडकरही ध्येय वादी होते ,समाजहितासाठी काही करून दाखवण्याची जिद्द बाबासाहेबा मध्ये दिसून येते .
महामानव म्हटले जाणाऱ्या बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथील लष्करी छावणीत भिमाबाईंच्या पोटी जन्म झाला .आईचे नाव भीमाबाई असल्या मुळे बाबासाहेबाना भीमा असेही म्हणत. बाबासाहेबांचे वडील रामजी हे धार्मिक व प्रेमळ स्वभावाचे होते. बाबासाहेबानी खूप शिकावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. बाबासाहेबांचं उद्धिष्ट पूर्ण व्हावे अशी जर कोणाची इच्छा असेल तर ती म्हणजे त्यांची पत्नी रमाबाई . रमाबाईंनी जेव्हढे कष्ट सहन केले .असे कष्ट फक्त एक पतिव्रताच घेऊ शकते बाबासाहेब जेव्हा विदेशात शिक्षण घेत होते त्यावेळी रमाबाईंनी अनेक कष्ट घेऊन बाबासाहेबांची आर्थिक मदत देत होत्या.
आज जी लोकशाही बगतोय ,सामान्य माणसासाठी जे कायदे बनवले आहे .त्या मध्ये बाबासाहेबांचा मोठा हात आहे. समाजासाठी व दलित समाजासाठी जे कार्य बाबासाहेबानी केले ते खरच वंदनीय आहे .
अशा महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा