मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिवरायांचा पुरंधर किल्ल्यावरील विजय कपट की गनिमी कावा भाग १


 

   तोरणा  किल्यांनंतर शिवरायांना थांबणे घातक होते. मागरीच्या तलावात मोती काढण्यासाठी उतरल्यावर जसे चपळाई केल्यावर मोती हातात येतात, त्याच प्रणाने शिवरायांनी चपळाई दाखवण्यास सुरुवात केली.

       मुळातच तोरणा जिंखल्यां नंतर ही विजापूरकर स्वस्थ झोपले होते ,याच गोष्टीचा शिवरायांनी फायदा घेण्याचे ठरवले. शिवरायांच्या खेपा रोहिडेश्वर, चाकण या क्षेत्रा मध्ये होऊ लागल्या ,त्याच वेळी त्यांचे लक्ष जवळच असलेल्या पुरंधर किल्यावर गेले. पुरंधर निजामाच्या हाती होता ,आणि किल्लेदार शहाजी महाराजांचे ,व दादोजींचा स्नेही निळकंठराव होते. त्यामुळे सुरुवातीला शिवरायांनी या किल्ल्याकडे फक्त नजर ठेवली .पण जेव्हा निळकंठराव यांच्या मृत्यू झाला, त्यावेळेस मात्र निळकंठराव यांच्या तीन मुलांमध्ये किल्याच्या महसुलीवरून वाद निर्माण झाला, आणि यातच नीलकंठराव यांच्या मोठा मुलगा निळोजी याने किल्यावर कबजा मिळवला. व लहाने दोन भाऊ संक्राजी व पिलाजी या दोघांनाही अधिकार देण्यास नकार दिला.  शिवराय किल्यावर चाललेल्या या  सर्व घडामोडी जाणत होते. निळोजी, संक्राजी व पिलाजी शिवरायांना मनापासून मानत होते. पण निळोजी आदिलशाहीची चाकरी सोडण्यास तयार नव्हता, तिघा भावमधील वाद आदिलशाहीची चाकरी , आणि संक्राजी व पिलाजी यांच्यावरील अन्याय . शिवरायांना पुरंधर न युद्ध करता वाटाघाटी करून स्वराज्यात आणण्यासाठी नामी संधी सारखा वाटला. शिवाय संक्राजी व पिलाजी दोघेही आपला स्वतःचा अधिकार किल्यावर मिळावा म्हणून शिवरायांना भेटत होते, शिवरायांकडे त्यांनी मागणी केली, की किल्यावर तिघंही भावांचा समान अधिकार असायला हवा . शिवरायांनी आश्वासन दिले की किल्ला सामना वाटप केला जाईल, पण त्यासाठी तुम्हा दोघांना स्वराज्यात यावे लागेल ,संक्राजी व पिलाजी यांनी शिवरायांना स्वराज्यात आल्याचे आश्वासन दिले .

       आणि इकडे आपल्या बरोबर दोघे भाऊ दगा फटका करतील म्हणून निळोजी किल्ला उतरण्यास तयार नव्हता,आणि जोपर्यंत किल्ल्यावर स्वतःहून निळोजी  बोलावत नाही तो पर्यंत शिवराय किल्यावर जाऊ शकत नव्हते 

        शेवटी यावर उपाय म्हणून संक्राजी व पिलाजी यांनी दिवाळीच्या दरम्यान निळोजी ला सांगून शिवरायांना किल्यावर येण्यासाठी निमंत्रण पाठवले

   क्रमशः.....

पुढील भागात शिवारायांनी किल्ला कपाटाने घेतला की गनिमी काव्याने ते पाहू 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...