मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

छत्रपती शिवराय नवीन मोहीम हाती घेण्या अगोदर घेत होते या पद्धतीची सुरक्षा व काळजी


 

      छत्रपती शिवराय बालपणापासूनच शांत व विचारी स्वभावाचे होते, कोणताही नवीन निर्णय घेण्या अगोदर ते अनेक बाजुंनी त्या गोष्टीचा विचार करत. पूर्ण गुप्तचरां कडून योग्य माहिती मिळाल्यावर ते पुढची योजना राबवत.

       कोणत्या किल्यावर ते हमला करणार आहे. याविषयी काही वेळा जिजाऊ महासाहेब यांना सुद्धा माहीत नसतं. एवढंच काय तर जे सैनिक शिवराया बरोबर कामगिरीवर जात त्यांना सुद्धा शिवराय कोणता किल्ला, व कोणती कामगिरी बजावणार आहे याचा पत्ता सुद्धा लागत नसे. अफजलखान वधाच्या वेळी शिवरायांनी कोणती योजना बनवली आहे याची माहिती जिजामाता सह बाकी इतर कोणालाही नव्हती. एवढी छत्रपती शिवराय गुप्तता राखत. 

    याचे मूळ कारण बघितले तर दुष्मणाला  कुठल्याही पद्धतीने आपण घेणारे निर्णय कळू न देने. अदिलशाही किंवा मुघलशाही असो या शाही मध्ये सुद्धा गुप्तचर ठेवत. त्यामुळे नव उमळलेलं हे स्वराज्य बघण्यासाठी शिवरायांना अधिक सावधगिरी बागळणे आवश्यक होते. शिवाय शिवरायांचेच अनेक नातेवाईक शरीराने शिवरायनकडे आणि जहागिरीसाठी मनातून आधीलशाही मुघलशाही यांच्याकडून होते.

    शिवाय गुप्तता ठेवल्या मुळे किल्ल्यावर हल्ला चढवल्या वर अधिक रक्त सांडवण्याची गरज पडत नसे.याला एकप्रकारे शिवरायांचा गनिमीकावाच म्हटले हवे.


अधीक पोस्ट वाचण्यासाठी येते क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.