मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

समर्थ रामदासस्वामीचे छत्रपती शिवरायांना व समाजाला मौल्यवान उपदेश


 यज्ञ तो देव जाणावा,

 किंवा,

वाळूचे कण रगडीता तेलही गळे,

    असे संसारात न राहूनही समाजाला मौल्यवान उपदेश देणारे रामदास स्वामी, भक्ती ,धेर्य आणि हिम्मत या बळावर आपण कोणतेही लक्ष्य साध्य करू शकतो. समर्थ रामदासस्वामीनी जगप्रसिध्द ग्रंथ दासबोध मध्ये तर अनेक तात्विक विचारणा मांडले आहे. हे वरील काही उपदेशावरून लक्षातच आले असेलच.

    जागी सर्व सुखी असा कोण आहे,

    विचारी मना तूचि शोधूनि पाहे ,

  त्यामुळे कर्तव्य महत्वाचे .जन्म का मिळाला? आपले मूळ कर्तव्य काय? तर समाजहित ,समाजासाठी कार्य ,कर्तव्य केले. तर ते ईश्वराला जाऊन मिळते असे अनेक उपदेश समर्थानी छत्रपती शिवरायांना सह छत्रपती संभाजी महाराजांना ही केले आहे. 

     समर्थांचा जन्म २४ मार्च १६०८ जालना जिल्यातील जांब या गावी झाला. वडिलांचे नाव सूर्याजी ठोसर तर आईचे नाव रेणुबाई, समर्थ लहानपणापासून खोडकर होते .पण एका निश्चित कालावधी नतंर त्यांच्यात बदल होऊ लागला .एकाच जागी निपचित राहून सम्पूर्ण जगाचा विचार करत, आई रेणुबाईना समर्थांचा हा स्वभाव लग्न झाल्यावर ताळ्यावर येईल, असे वाटून लग्न लावले .पण पंडित जेव्हा सावधान म्हणाले त्यावेळी समर्थानी जी धूम ठोकली तेथून ते नाशिकला आले.१४ कोटी रामनामाचा जप केल्यावर समर्थानी देशाटन केले.

    समर्थांची आणि शिवरायांची भेट झाली, तेव्हा शिवरायांच्या कार्याने समर्थ खुप आनंदीत होते.हिंदू धर्म टिकून रहावा ,यासाठी समर्थानी महाराष्ट्रात ठीक ठिकाणी हनुमानाचे मंदिरे बांधली. शिवरायांचा देहान्त झाल्यानंतर संभाजी राजे जेव्हा छत्रपती झाले, त्यावेळेस एक बोधक पत्र समर्थानी संभाजी महाराजांना लिहिले होते. जे आजही वाचण्या सारखे आहे.

      रामाचा जन्म रामनवमी म्हणजे आजच्याच दिवशी झाला. आणि रामदासांचा जन्मही यांचा दिवशी झाला, त्यामुळे संपूर्ण आयुष्य समर्थानी राम चरणी वाहून दिले. समर्थांनी लिहिलेले मनाचे श्लोक जर स्मरण केले तर आयुष्याच्या अनेक कठीण वळणावर त्या श्लोकांचा उपयोग होऊ शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.