मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

श्रीरामाच्या चरित्रातुन घ्या ५ मौल्यवान गुण



    भारतात रामायण घडून गेले ,ही काही सामान्य बाब नव्हे,किंवा रामयनाकडे फक्त एक सामान्य धार्मिक, व सांस्कृतिक ग्रंथ म्हणून बघण्या पेक्षा जीवन सांगण्याचा जो मूळ मंत्र श्री यांनी सांगितले आहे ,त्याचे पालन करून आपण स्वतः आपले जीवन समृद्ध करू शकतो .

     मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम

    श्री राम कोणतेही कार्य करताना ते कार्य एका मर्यादेत राहून करत. त्या कार्याचा अतिरेक किंवा अधिक मिळवण्याची हवस श्री रामात नव्हती. त्यामुळेच श्री रामाला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम म्हटले जाते.

   आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींची अपेक्षा तेवढीच बाळगा जी आपल्या मर्यादेत आहे.तिची अधिक अपेक्षा बाळगली तर त्या गोष्टीची माती होण्यास जास्त वेळ लागत नाही.

  संयम

   संयमी म्हणजे ज्या मध्ये उतावळे स्वभाव म्हणजे कुठलीही गोष्ट ताबडतोब मिळावी ही अपेक्षा नाही असा , श्री राम संयमी होते,कुठलेही कार्य ते संयमी राहून करत. तापत स्वभाव लक्ष्मणाला होता पण राम सतत लक्ष्मणाला संयम बागळण्यास सांगत .

    आदर

   संपूर्ण रामायणात श्री राम हे मोठ्या व्यक्तीचा आधार ठेवताना दिसतात. मग ते माता पिता असोत किंवा गुरुजन श्री राम सर्वांचे दर्शन घेऊन त्यांचा आदर करत.

   आवश्यकता आजच्या कालावधीत युवकांमध्ये अधिक गरजेची आहे फक्त राम भक्त किंवा शिवभक्त म्हणून काही होत नाही छत्रपती शिवराया सारखे मोठ्यांचा आदर ठेवणे गरजेचे आहे.

   नेतृण

  नेतृण हा मौल्यवान गुण जर बघितला तर श्री राम यांच्यात प्रखरते दिसतो .श्री राम जेव्हा वनवासात गेल्यावर रावणाने सीता मातेचे हरण केले ,त्या वेळेस श्री राम यांनी फक्त वक्तृत्व आणि नेतृव या क्षमते च्या बळावर अयोद्धेतून कोणतीही मदत न मागता एक भव्य वानरसेना उभी केली.

  युद्ध योजना 

रावांची सेना मायावी होती, तर श्री राम घेऊन गेलेली वानरसेना एक सामान्य मानवी क्षमता असलेली सेना होती .पण श्री राम यांच्या नेतृत्वाखाली व युद्ध नियोजन यामुळे श्री राम विजयी झाले

   आपणही राबवलेल्या योजना विवेकी व नियोजित हच्या जेणेकरून विरोधक कितीही क्षमता वाण असला तरीही  विजय आपलाच व्हायला हवा.

  

या सारखे अनेक गुण आपण राम चरित्रातून शिकू शकतो त्यामुळे प्रत्येक घरात राम चरित्र वाचन पठण व्हायलाच हवे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...