मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

श्रीरामाच्या चरित्रातुन घ्या ५ मौल्यवान गुण



    भारतात रामायण घडून गेले ,ही काही सामान्य बाब नव्हे,किंवा रामयनाकडे फक्त एक सामान्य धार्मिक, व सांस्कृतिक ग्रंथ म्हणून बघण्या पेक्षा जीवन सांगण्याचा जो मूळ मंत्र श्री यांनी सांगितले आहे ,त्याचे पालन करून आपण स्वतः आपले जीवन समृद्ध करू शकतो .

     मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम

    श्री राम कोणतेही कार्य करताना ते कार्य एका मर्यादेत राहून करत. त्या कार्याचा अतिरेक किंवा अधिक मिळवण्याची हवस श्री रामात नव्हती. त्यामुळेच श्री रामाला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम म्हटले जाते.

   आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींची अपेक्षा तेवढीच बाळगा जी आपल्या मर्यादेत आहे.तिची अधिक अपेक्षा बाळगली तर त्या गोष्टीची माती होण्यास जास्त वेळ लागत नाही.

  संयम

   संयमी म्हणजे ज्या मध्ये उतावळे स्वभाव म्हणजे कुठलीही गोष्ट ताबडतोब मिळावी ही अपेक्षा नाही असा , श्री राम संयमी होते,कुठलेही कार्य ते संयमी राहून करत. तापत स्वभाव लक्ष्मणाला होता पण राम सतत लक्ष्मणाला संयम बागळण्यास सांगत .

    आदर

   संपूर्ण रामायणात श्री राम हे मोठ्या व्यक्तीचा आधार ठेवताना दिसतात. मग ते माता पिता असोत किंवा गुरुजन श्री राम सर्वांचे दर्शन घेऊन त्यांचा आदर करत.

   आवश्यकता आजच्या कालावधीत युवकांमध्ये अधिक गरजेची आहे फक्त राम भक्त किंवा शिवभक्त म्हणून काही होत नाही छत्रपती शिवराया सारखे मोठ्यांचा आदर ठेवणे गरजेचे आहे.

   नेतृण

  नेतृण हा मौल्यवान गुण जर बघितला तर श्री राम यांच्यात प्रखरते दिसतो .श्री राम जेव्हा वनवासात गेल्यावर रावणाने सीता मातेचे हरण केले ,त्या वेळेस श्री राम यांनी फक्त वक्तृत्व आणि नेतृव या क्षमते च्या बळावर अयोद्धेतून कोणतीही मदत न मागता एक भव्य वानरसेना उभी केली.

  युद्ध योजना 

रावांची सेना मायावी होती, तर श्री राम घेऊन गेलेली वानरसेना एक सामान्य मानवी क्षमता असलेली सेना होती .पण श्री राम यांच्या नेतृत्वाखाली व युद्ध नियोजन यामुळे श्री राम विजयी झाले

   आपणही राबवलेल्या योजना विवेकी व नियोजित हच्या जेणेकरून विरोधक कितीही क्षमता वाण असला तरीही  विजय आपलाच व्हायला हवा.

  

या सारखे अनेक गुण आपण राम चरित्रातून शिकू शकतो त्यामुळे प्रत्येक घरात राम चरित्र वाचन पठण व्हायलाच हवे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिवरायांच्या बालपणीचे गुण

शिवरायांचे बालपण  शिवरायांच्या बालपनाचा विचार करण्यापूर्वी जिजाऊचां विचार करणं महत्वाचं आहे  जिजाऊंनी लहानपनीच शिवरायांना  रामायण महाभारतल्या कथा सांगीतल्या ( पण आजचा विचार केला तर पालकांना मुलांशी बोलण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये) शिवरायांचे लहानपणापासूनच युध्द कलेचे प्रशिक्षण सुरु झाले होते  . (पण आजचा विचार केलातर मुलांचा जास्त वेळ मोबाईल टीव्ही वरच जातोय) शिवराय लहानपणापासूनच उत्साही होते नवीन गोष्टी शिकण्यासाठी दूरवर फिरत गड किल्ले पाहत मित्र बनवट नवीन डावपेच शिकत. ( पण आजचा विचार केलातर युवकांमध्ये उत्साह नाही घरात मोबाइला चटकून राहतात) शिवराय बालपनापासून स्वराज्याचा विचार करत होते.   ( पण आजचे तरुण नोकरीचाच विचार करतोय ) शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच शरीराबरोबर मन व बुद्धीलाही बळकट केलं  (पण आजचा तरुण शरीर तर बळकट बनवतोय पण मन विवेकी बनवट नाहीये). शिवराय सात भाषेत प्रवीण होते अनेक युद्धकला गणित ग्रंथात प्रवीण होते.   ( पण आजचा तरुण दहावी पास करण्याआधी सुद्धा कॉप्या करतोय) वरील मत खर असेल तर खाली कंमेन्ट करा.

शिवरायांचा पुरंधर किल्ल्यावरील विजय कपट की गनिमी कावा भाग १

      तोरणा   किल्यांनंतर शिवरायांना थांबणे घातक होते. मागरीच्या तलावात मोती काढण्यासाठी उतरल्यावर जसे चपळाई केल्यावर मोती हातात येतात, त्याच प्रणाने शिवरायांनी चपळाई दाखवण्यास सुरुवात केली.        मुळातच तोरणा जिंखल्यां नंतर ही विजापूरकर स्वस्थ झोपले होते ,याच गोष्टीचा शिवरायांनी फायदा घेण्याचे ठरवले. शिवरायांच्या खेपा रोहिडेश्वर, चाकण या क्षेत्रा मध्ये होऊ लागल्या ,त्याच वेळी त्यांचे लक्ष जवळच असलेल्या पुरंधर किल्यावर गेले. पुरंधर निजामाच्या हाती होता ,आणि किल्लेदार शहाजी महाराजांचे ,व दादोजींचा स्नेही निळकंठराव होते. त्यामुळे सुरुवातीला शिवरायांनी या किल्ल्याकडे फक्त नजर ठेवली .पण जेव्हा निळकंठराव यांच्या मृत्यू झाला, त्यावेळेस मात्र निळकंठराव यांच्या तीन मुलांमध्ये किल्याच्या महसुलीवरून वाद निर्माण झाला, आणि यातच नीलकंठराव यांच्या मोठा मुलगा निळोजी याने किल्यावर कबजा मिळवला. व लहाने दोन भाऊ संक्राजी व पिलाजी या दोघांनाही अधिकार देण्यास नकार दिला.  शिवराय किल्यावर चाललेल्या या  सर्व घडामोडी जाणत होते. निळोजी, संक्राजी व पिलाजी शिवराया...