मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

जगायचं तर वाघ होऊन, शेळी होऊन आता जगू वाटत नाही। दादोजींचे आणि मावळ्यांचे शिवरायांना बोल


 

      छत्रपती  शिवरायांनी ज्या वेळी रारारेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, त्यावेळी मुघलांचे अत्याचार पाहून मावळ्यांच्या मनात राग उफळत होता. परकीय निजाम केव्हाही काहीही आदेश देतील आणि आपली गाव लुटली जातील ,आया बायांच्या अब्रू लुटल्या जातील, हे मावळे शतकानुशतके बघतच होते. त्यात आपले काही हिंदू राजे जहागिरी साठी केव्हाही आपला मान या निजामान पुढे झुकवत. ज्याचा राग सामान्य जनतेत आणि मावळ्यांच्या मनात होताच, फक्त त्याला आग लागने गरजेचे होते. जे शिवरायांनी केले, देशभक्ती मातृभूमी प्रेम जागृत करून.

      दोदोजीं कोंडदेव ही शहाजी राज्या सह निजामाची गुलामगिरी करण्यास राग येत होता, शहाजीराज्यानी  निजामविरुद्ध बंड पुकारला, त्यात दादोजींची मदत होती. पण ज्यावेळी बंड मोडून काढला, त्यावेळी दादोजींचे मन हिरमुसले होते. ज्यावेळी शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. सुरुवातीला शहाजीराजेना आलेले अपयश शिवरायांना ही येते की काय? असे दादोजींना वाटायचे, पण जेव्हा शिवरायांचा स्वराज्या प्रति उत्साह ,आणि जोश पाहिल्यावर त्यांचीही खात्री पटली होती.

     ज्या कालावधीत दादोजीं सह मावळे आणि शिवराय यांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतल्या त्या नंतर मावळे शिवरायांना म्हणाले होते की " जगायचं तर वाघ होऊन जगायचं ,शेळी होऊन या परकीयांची गुलामगिरी आता करू वाटत नाही ,राजे आता फक्त आदेश करा".  

     मित्रानो आज छत्रपती शिवरायांनी उभे केलेलं स्वराज आणि इतिहास जग प्रसिद्ध आहे.  शेळीच जीवन जगण्या पेक्षा त्यांनी वाघाच जीवन निवडलं. महत्व आता आपल्याला आहे की आपन कसे जीवन निवडतो !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.