मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

आठव्या वर्षीच रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली होती कविता शिवराया कडून झाले होते प्रेरित


 

  ज्या वयात आपल्याला शाळेतील बाराखडी व्यवस्थित येत नाही, त्या वयात रवींद्र नाथ टागोर यांनी कविता लिहिणे चालू केले होते.

      रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकात्यातील जोराशनग येथील पिराली या ब्राम्हण कुटुंबात झाला. वडिलांचे नाव देवेंद्रनाथ तर आईचे नाव शारदा देवी. देवेंद्रनाथ यांना एकूण १४ अपत्य होती. त्यात रवींद्रनाथ १३ वे. लहानपणापासूनच रवींद्रनाथ यांना काव्य लेखन कथा लेखन यात रस होता. वयाच्या  १६ व्या वर्षीच त्यांनी भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला.

    पुढे ब्यारिस्टर होण्यासाठी ते लंडनला गेले.पण कोठलीही पदवी न घेता ते भारतात परतले. बंगालला परतल्यावर त्यांनी मृणाली देवी यांच्याशी विवाह केला. रवींद्रनाथ यांना एकूण ५ अपत्य झाली. पण त्यातील २ अपत्य  वारली. 

    पुढे रवींद्र नाथाच्या वडिलांचे निधन झाल्यावर ते आपली घरची मालमत्ता सभाळण्यासाठी जन्म गावी परतले. पण येथेच त्यांच्या पत्नी व तीनही अपत्याचा मृत्य झाला.

      अनेक दुःख झेलण्या नंतरही त्यांनी गीतांजली हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार ही मिळाला.भारतात त्या वेळी इंग्रजी सत्ता असल्याने त्यांच्या पुरस्कारासाठी इंग्रजांनी सर ही पदवी दिली. पण पुढे जालियनवाला हत्याकांडात व्यथित होऊन ही पदवी सोडून दिली.

    महात्मा गांधी बरोबर त्यांच जवळच नात महात्मा गांधीही रवींद्रनाथ यांना मनापासून मानत.

   रवींद्रनाथ टागोर यांनी महाराष्ट्राला भेट दिल्यावर त्यांना तुकोबारायांचे अभंग मनापासून आवडले. त्यांनी अनेक महाराष्ट्रातील संतांचे अभंग,ओव्या, भारुड यांना विविध भाषेत भाषांतरित केले. छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचल्यावर रवींद्रनाथ खूप प्रेरित झाले होते. 

    वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी चित्र कलेला प्रारंभ केला. यातून त्यांनी दर्शवले की कलेला व कर्तव्याला वयाचे बंधन नसते.

   अशा थोर व्यक्तिमत्वाच्या जन्म दिनी त्यांना विनम्र अभिवादन.


अधिक पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.