मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

छत्रपती शाहू महाराजांच्या कालावधीत श्रीमंत पेशवा पदास अधिक ताकद का प्राप्त झाली?


 


      छत्रपती  संभाजी महाराज सत्तेवर होते, त्याच कालावधीत औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला. तब्बल नऊ ते दहा वर्षे मुघलांना अडवल्या नंतर फंद फितुरीला ते बळी पडले, व मुघलांच्या कैदेत गेले. शंभूराज्यांचे पुत्र शाहू महाराज लहान असल्या मुळे शंभू राज्यांच्या पत्नी येशुबाई यांनी काही दिवस करोभार बघितला ,पण रायगडाचा किल्लेदार  खंडोजी पिसाळ मुघलांना जाऊन भेटला, त्यामुळे शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई मुघलांच्या ताब्यात गेले.यानंतर गादीवर आले ते शिवरायांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज भरपूर दिवस मुघलांचा सामना केल्यानंतर ते ही वीर गतीला प्राप्त झाले.

    शेवटी गादीवर आल्या त्या ताराबाई, भरपूर दिवस मुघलांना आडवणाऱ्या त्या महाराणी बनल्या. वृद्ध झालेला औरंगजेब शेवटी महाराष्ट्रातच त्याने आपली कबर खोदली . औरंगजेबांनंतर बादशहा कोण होणार यासाठी मुघलांमध्ये आप आपसात युद्ध होऊ लागले. याच दरम्यान शाहू महाराज व येसूबाई यांना मुक्त करण्यात आले. हक्काने वारसदार शाहू महाराज होते. पण ताराबाई स्वतः निर्माण केलेल राज्य  शाहू महाराजांना  देण्यास नकार दिला . शेवटी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात तुंबळ युद्ध झाले. स्वराज्यातील अनेक निष्ठावंतांनी शाहू महाराजांना सहकार्य केले, ज्या मध्ये शाहू महाराजांचा विजय झाला.

     पण जेव्हा शाहू महाराज सत्तेवर बसले, त्यावेळी त्यांच्याकडे कोठल्याही प्रकारचे राज्य चालवण्याचे ज्ञान नव्हते. शेवटी सहकाऱ्यांनी शाहू महाराजांना उपदेश केला की, तुम्ही फक्त राज्याचे महाराज व्हा व निर्णय घेण्याचा अधिकार पंत प्रतिनिधींकडे द्या. शाहू महाराजांनी या निर्णयास मान्यता दिली .ज्या मध्ये श्रीमत पेशवा या पदास मोठी शक्ती प्राप्त झाली .

      शाहू महाराजानी पहिले पेशवा बालाजी विश्वनाथ भट्ट यांना निवडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...