मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

छत्रपती शाहू महाराजांच्या कालावधीत श्रीमंत पेशवा पदास अधिक ताकद का प्राप्त झाली?


 


      छत्रपती  संभाजी महाराज सत्तेवर होते, त्याच कालावधीत औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला. तब्बल नऊ ते दहा वर्षे मुघलांना अडवल्या नंतर फंद फितुरीला ते बळी पडले, व मुघलांच्या कैदेत गेले. शंभूराज्यांचे पुत्र शाहू महाराज लहान असल्या मुळे शंभू राज्यांच्या पत्नी येशुबाई यांनी काही दिवस करोभार बघितला ,पण रायगडाचा किल्लेदार  खंडोजी पिसाळ मुघलांना जाऊन भेटला, त्यामुळे शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई मुघलांच्या ताब्यात गेले.यानंतर गादीवर आले ते शिवरायांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज भरपूर दिवस मुघलांचा सामना केल्यानंतर ते ही वीर गतीला प्राप्त झाले.

    शेवटी गादीवर आल्या त्या ताराबाई, भरपूर दिवस मुघलांना आडवणाऱ्या त्या महाराणी बनल्या. वृद्ध झालेला औरंगजेब शेवटी महाराष्ट्रातच त्याने आपली कबर खोदली . औरंगजेबांनंतर बादशहा कोण होणार यासाठी मुघलांमध्ये आप आपसात युद्ध होऊ लागले. याच दरम्यान शाहू महाराज व येसूबाई यांना मुक्त करण्यात आले. हक्काने वारसदार शाहू महाराज होते. पण ताराबाई स्वतः निर्माण केलेल राज्य  शाहू महाराजांना  देण्यास नकार दिला . शेवटी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात तुंबळ युद्ध झाले. स्वराज्यातील अनेक निष्ठावंतांनी शाहू महाराजांना सहकार्य केले, ज्या मध्ये शाहू महाराजांचा विजय झाला.

     पण जेव्हा शाहू महाराज सत्तेवर बसले, त्यावेळी त्यांच्याकडे कोठल्याही प्रकारचे राज्य चालवण्याचे ज्ञान नव्हते. शेवटी सहकाऱ्यांनी शाहू महाराजांना उपदेश केला की, तुम्ही फक्त राज्याचे महाराज व्हा व निर्णय घेण्याचा अधिकार पंत प्रतिनिधींकडे द्या. शाहू महाराजांनी या निर्णयास मान्यता दिली .ज्या मध्ये श्रीमत पेशवा या पदास मोठी शक्ती प्राप्त झाली .

      शाहू महाराजानी पहिले पेशवा बालाजी विश्वनाथ भट्ट यांना निवडले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.