मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

या योजनेने सरनोबत प्रतापराव यांनी बहलोलखानास परास्त केले


 

      छत्रपती  शिवरायांच्या शूर वीरांच्या तिजोरीत अनेक कल्पक ,धीर जिद्दी सरदार होते जे छत्रपती कडून एखादी कामगिरी मिळाल्यावर उसंत घेत नव्हते .

     छत्रपतींचा राज्याभिषेक काही दिवसांवर येऊन ठेपला होता. आणि त्याच मुळे आदिलशाही आणि मुघलशाही एकत्र येणे लाजमी आणि शिवरायांचा प्रताप दाखवण्यास पुरेसे आहे. त्याच मुळे निजामाने बहलोलखानास १२ हजाराच्या फौजेसह छत्रपतीवर चालून जाण्यास सांगितले .ही खबर जेव्हा शिवरायांना कळली .तेव्हा त्यांनी ताबडतोब सरनोबत प्रतापरावांची भेट घेतली. खान उंबरणीत आपला तळ ठोकून बसला होता. आणि मुघलांकडून येणाऱ्या फौजेची वाट पाहत बसला होता. शिवरायांना ही नामी संधी वाटली .आणि प्रतापरावाणी शिवरायांच्या मनातील ही गोष्ट हेरली.

 दुष्मन खाऊ द्यायच बलाढ्य होऊ द्यायच इतका वेळ दिल्यावर अंगावर घ्यायचं हे शिवरायांचे तत्व मुताळतच नव्हते .अंगावर येणारच आहे ,तर त्या आधीच दुष्मन ठेचायचा म्हणजे समोरच्याला पुढील हमला करता धाक पडायला हवा .

      छत्रपती शिवरायांचा आदेश मिळताच प्रतापरावयांनी  खान जेथे तळ ठोकून बसला होता .त्या पूर्ण प्रदेशालाच रात्रीचे मराठ्यांनी वेढा घातला. खान विचार करूनच उंबरणीत थांबला होता ,कारण उंबरणी पासून मुघल जवळ होते ,शिवाय निजामाची कुमक हळूहळू येतच होती. शिवाय हा परिसर हिरवळ होता ,जागा बघून खानाने नदी  जवळच आपला तळ टाकला होता .हीच गोष्ट प्रतापरावाणी हेरली काही सैनिक नदी पात्रा लगत घात देऊन बसले. सकाळी जेव्हा खानाचे माणसे उठली तेव्हा रानडुकराला चारही बाजूने वाघाने गेरल्यावर जसा मृत्यू समोर दिसतो तसा मृत्यू खानास दिसू लागला .

     प्रतापराव या ठिकाणी गनिमी कावा कशाला सोडणार खानाला चारही बाजूने घेतल्यावर प्रतापराव घिधडा सारखे खानाचे लचके घेत होते .

      खानाला प्रतापरावांचा स्वभाव महित होता. केविलवाने शाब्दिक पत्र लिहून आपल्या वकीलासह त्याने प्रतापराव यांकडे पाठवले." आम्हाला क्षमा करावी आपण थोर आदिल शाईच्या मर्जीने आम्ही येथवर आलो यात आमचा काही दोष नाही आम्हाला जाऊ द्यावे".

    भावनिक असणारे प्रतपरावांचे मन पत्र वाचून विरघळते आणि त्यांनी बहलोल खानास सोडून दिले.

        या पुढील भागात छत्रपती शिवराय बहलोल खानास सोडल्यामुळे प्रतापरावावर का रागावले याविषयी क्रमशः.....

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...