२६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
भारतीय नुतून वर्ष जर मूळ संस्कृती नुसार पाहिले तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच इंग्रजी महिन्या नुसार एप्रिल किंवा मे महिन्यात आपल्या महाराष्ट्राचा लाडका सण गुढीपाडवा आहे ,असे महाराष्ट्रातील जनते वरून दिसून येते .महाराष्ट्रात दिवाळी नंतर या सणाला महत्व आहे .
ह्या सणाचा प्रथम सभंधं जर पहिला तर इंद्र जेव्हा भूतलावर आले.तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक काठी व त्यावर नवीन कापड टाकून त्यांचें स्वागत केले, खर म्हणजे इंद्र हा पाऊस, वर्षा याचा देवता त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी शेतकऱ्यांनी असे स्वागत केले होते. आणि त्यानंतर ही एक परंपराच झाली .
म्हणजे पुराण कथेवरून ही गोष्ट स्पष्ठ होते की हा सण खरा शेतकऱ्यां पासून सुरू झाला असावा .
यानंतर एक पौराणिक कथा ज्यामध्ये असा उल्लेख येतो की श्री राम जेव्हा वनवासातुन पुन्हा अयोध्येत आले , तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या वासींनी गुढी उभारली व रामाचे स्वागत केले .
गुढी हा शब्द खरा तामिळ मधून आला आहे .गुढी म्हणजे तामिळ मध्ये काठी म्हणून गुढी पाडवा हा शब्द रूढ झाला.
त्याच बरोबर जेव्हा छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते .आणि ज्यावेळी संभाजी राज्यांची निर्घृण रित्या हत्या केली .त्यावेळी मानले जाते की गुढी पाडवा हा सण होता .आणि याच दिवशी भारतीय संस्कृती तोडावी म्हणून संभाजी महाराजांच्या शिरा बरोबर अनधिकृत कृत्य केले ,ते शीर मुघलांनी काठीला लटकावले आणि त्यावेळीच्या शंभू राज्यांच्या विरोधक ब्राम्हणांनी याला सणा प्रमाणे संभोदण्याचा प्रयत्न केला.
वरील छत्रपती शंभू राज्या विषयी काही माहिती शंभु राजे प्रेमीना वाईट वाटले असेल तर क्षमस्व कारण आपण सर्वच शंभु राज्याचां आदर करतो .पण इतिहासात काही अशीही माहिती आहे जी वाचक प्रेमी पुढे येत नाही. ती आणण्याचा छोटासा प्रयत्न .
सर्व भारतीयांनी आपल्या संस्कृती सण यांचा आदर केला हवा, कारण अलीकडे पाश्चिमात्य संस्कृती मुळे आपल्या सणा कडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आपण गुढीपाडवा का साजरा करीतो या मागील शास्त्रीय अर्थ समजून घेतला हवा . आरोग्य व शिलता विवेक या दिवसाचे प्रमुख गुण याच रित्या आपण प्रत्येक सणा विषयी समजून घेतले हवे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा