मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

आम्हाला गड नको. तुम्ही हवे होता, शिवरायांचे फिरंगोजी नरसाळ यांना बोल


 

    छत्रपती  शिवरायांच्या आदिलशाही विरुद्ध कार्यवाही सुरूच होती.तोरणा, पुरंधर, रायरेश्वर घेतल्यानंतर शिवराय पुढील कोणती कामगिरी हातात घेतात, यासाठी लाल महालात बैठका बसू लागल्या. या बैठकीत तानाजी, येसाजी, बाळाजी, चिमणाजी वैगेरे मंडळी हजर असायची. 

    एकदा बैठकीत शिवरायांनी दर्शनासाठी अर्धी फौज घेऊन बाहेर पडायचे ठरवले. पण यातील कोणालाच काही माहीत नव्हते, सर्वाना वाटले की शिवराय पुन्हा रायरेश्वराच्या दर्शनासाठी चालले आहे. पण अर्ध्या मार्गावर शिवारायनी मार्ग बदलला आणि चाकणची वाट पकडली. सर्व चकित झाले. काहींना वाटले की शिवराय चाकण घेण्यासाठी निघाले आहेत. तानाजीने अदबीने विचारले की राज चाकण घेण्याचा विचार दिसतोय , यावर शिवराय म्हणाले की "आई भवानी जी बुद्धी देईल ते करू.

   शिवराय चाकण किल्याच्या दरवाज्या समोर फौज घेऊन उभे राहिले. हवलंदाराला काहीच कळेना. चाकण किल्याचे किल्लेदार होते   फिरंगोजी नरसाळा. फिरंगोजी स्वभावाने धार्मिक व कर्मठ होते. मातृभूमी वर त्यांना प्रेम होते. पण पिढी जात त्यांना आदिलशाहीचा किल्ला राखण करावा लागत होते.  शिवराय माणसे ओळखून होते, त्यामुळे त्यांनी फिरंगोजींचा स्वभाव आधीच जाणला होता.

      फिरंगोजी मोठ्या चिंतेत पडले, आधीलशाहिला ही भेट कळाली तर, पण मोठ्या धेर्याने त्यांनी द्वार उघडण्यास सांगितले. शिवराय त्यांच्या फौजे सह आत आल्यावर मोठया अदबीने फिरंगोजी शिवराया समोर गेले. भेटी चे कारण विचारल्यावर तुम्हास भेटण्यास आलो. फिरंगोजी जाणत होते की शिवरायांनी पुरंधर चा किल्ला कसा चलाखी ने घेतला.

     फिरंगोजीने शिवरायांना ताकीद दिली की जर तुम्ही चाकणच्या किल्यावरही दगा फटका करण्याचा प्रयत्न केला, तर खपून घेतले जाणार नाही. 

    शिवरायांनी तानाजीच्या कानात काहीतरी सांगितले, व तानाजी सारी फौज घेऊन किल्या बाहेत पडला. यावेळी शिवराय फिरंगोजीना म्हणाले की "जर आत्ता तुम्ही ठरवले तर तुम्ही आमच्या बरोबर दगा फटका करू शकता, पण तुम्ही असे करणार नाही. पुरंधरचा किल्लेदार निळोजी उपभोगी होता. पण तुम्ही तसे नाही. हिंदूचे चाललेले हाल तुम्हालाही कोठेतरी थांबवावे असे वाटते. मग तुम्ही या आदिलशीत कशाला?  ,स्वराज्यात या तुमची स्वराज्याला आवश्यकता आहे. या म्लेंच्छनी भारत भूमी पूर्ण बाटवली, येथे आपल्या आया बहिणी सुरक्षित नाही, मंदिर सुरक्षित नाही तेथे तुम्ही कितीवेळ सुरक्षित राहणार".

   शिवरायांचे शब्द फिरंगोजींच्या मानत घर करत होतेे .पण एवढ्या मोठ्या पातशाहीचा सामना करायचा तरी कसा असे शिवरायांना विचारल्यावर . शिवराय म्हणाले की "हेच मुघल आधी निर्वासित म्हणून आले आणि आपल्या डोक्यावर आत्ता नाचताय आपनही तसच करायचं, आणि तसही आदिलशाही दरबारात हिंदू सरदारा विषयी कानभरनी तेथे चालूच असते, तो पातशहा कधी तुमच्या विरोधात जाईल सांगता येणार नाही".

      शिवरायांनी अशा अनेक प्रकारे  फिरंगोजींची समजूत घातली. शिवरायांचे विचार पटल्यावर फिरंगोजी शिवरायांना म्हणले की "राजे किल्ला तुमचा तुम्ही ठरवा तस होईल "यावर शिवराय म्हणाले की "आम्हाला गड नको हवे आहेतर तुमच्या सारखे असे दहा किल्ले जिंकणारे मानस किल्ला तुमचा आणि तुमचाच राहील या शब्दांनी फिरंगोजींचे मन भरून आले व त्यांनी शिवरायांना मिठी मारली. किल्ल्यावर काही कालावधीत भगवा फडकू लागला.

      मित्रानो शिवरायांनी याच प्रकारे युद्ध न करता शांतीने व समजूतदार पणे अनेक किल्ले आदिलशाहीच्या व मुघलांच्या नाका खालून स्वतःच्या ताब्यात आणले.



समर्थ रामदास स्वामींचे शिवरायांना व समाजाला मौल्यवान संदेश



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

३ एप्रिल १६८० इतिहासातील एक काळा दिवस ।शिवाजी महाराज पुण्यतिथी दिन

      इतिहासात अनेक वीर योद्धे राजे महाराजे होऊन गेले आणि काळाच्या काळ्या दरीत समाहून पण गेले .पण इतिहासाने असेही काही योद्धे बघितले आहे जे इतिहासात अजर अजरामर तर झालेच, आणि भविष्यात त्यांचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा शरीरावर क्षहारे उभे राहिल्या शिवाय राहणार नाही       त्या पैकी शिवराय आहे यात काही दुमत नाही हेच खरे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्ष मध्ये नावाजलेले अमर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वर्ग वाशी झाले तेव्हा हिंदू स्वराज्य निर्माण करणारा भारताचा खरा वीर इहलोक सोडून गेले याचा संपूर्ण भारत वर्षाला दुःख होते.     शिवराय जेव्हा मृत्यू च्या दारात होते तेव्हाही त्यांना स्वराज्य आणि सामान्य जनतेचीच काळजी होती. संभाजी महाराज नेटकेच मुघलांच्या चंगुळ मधून सुटून आले होते ,शंभूराजे बरोबर शेवटी  खुप बोलावं असही शिवरायांना वाटत होतं.      शिवराय फक्त संसारच करून नाही गेले, तर तुकाराम महाराज रामदास स्वामी च्या सानिध्यात जे परमार्थ रुपी धन तेही जोपासले होते .प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे सर्वात श्रेष्ठ तो भगवंत आहे. ब...