मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

छत्रपती शिवरायांच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या जयंती का ?


 

छत्रपती शिवरायांची  सर्वात प्रथम जयंती साजरी केली असेल तर ती म्हणजे महात्मा जोतीराव फुलेंनी. त्यांनीच सर्वप्रथम शिवरायांची समाधी शोधली. व 1869 रोजी जयंती साजरी केली. पण त्यांनी जी जयंती साजरी केली, ती शिवकालीन बखरींनी नमूद केलेली तारीख होती. यानंतर जेव्हा लोकमान्य टिळकांनी पुण्यात एप्रिल 1900 च्या दरम्यान शिवरायांची जयंती साजरी केली. याचा सविस्तर उहापोह त्यांनी केसरी वृत्तपत्रात 14 एप्रिल 1900 रोजी केला आहे. 

      यात मुख्य कारण जर पाहिले तर शिवरायांचा जन्म ज्या कालावधीत झाला. तो कालावधी धामधुमीचा होता. शहाजीराजे आदिलशीहीशी बंड करून बंगळूरला होते. व जिजामाता या शिवनेरी किल्यावर होत्या. जिजाऊंच्या रक्षणासाठी किल्लेदराने किल्ला पूर्ण कडे कोट बंद केला होता. या धामधुमीच्या कालावधीत बखरी यांच्या कडून योग्य तारीख बखरीत लिहिणे राहून गेली असेल असे एक कारण आढळते. शिवाय शिवरायही स्वतःचाच महिमा गुणगान किंवा इतिहास लिहून घेणाऱ्यामधले राजे नव्हते. स्वराज्याच्या कार्यात ते इतके व्यस्त होते, की त्यांच सार आयुष्य मुघल ,आदिलशाही  यांच्याशी संघर्षात व स्वराज्य स्थापन करण्यात गेले. 

    दुसरे कारण जर पाहिले तर इंग्लिश कालगणना आणि मराठी कालगणना यांतील साम्य. शिवरायांचा जन्म मराठी कालगणनेनुसार सध्याच्या 19 फेब्रुवारी 1630 या तारखेच्या म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551 शुक्ल संवत्सर या तिथीच्या ऐवजी पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके 1549 मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता 6 एप्रिल 1627.


(त्यामुळे जेथे शके 1549 येते तेथे इसवी सन 1627 आणि शके 1551 येते तेथे इसवी सन 1630 साल स्मरणात ठेवावे. शालीवाहन शक आणि इसवी सन यांच्यामध्ये 78 वर्षांचा फरक आहे.)

   भारत व महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही तारीख स्वीकारली आहे. तर काही जण ही 13 मे या दिवशी साजरी करतात. 

     याठिकाणी छत्रपती शिवरायांची जन्म तारीख कोणती असेल हे सांगण्या एवढी माझी क्षमता नाही . पण शिवरायांच्या वर्षातील प्रत्येक दिवसाला जन्मतारीख मानून त्या दिवशी शिवरायांकडून एक गुण जरी घेतला तरीही ती शिवरायाच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादनच असेल

   

                 जय शिवराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...