मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

छत्रपती शिवरायांच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या जयंती का ?


 

छत्रपती शिवरायांची  सर्वात प्रथम जयंती साजरी केली असेल तर ती म्हणजे महात्मा जोतीराव फुलेंनी. त्यांनीच सर्वप्रथम शिवरायांची समाधी शोधली. व 1869 रोजी जयंती साजरी केली. पण त्यांनी जी जयंती साजरी केली, ती शिवकालीन बखरींनी नमूद केलेली तारीख होती. यानंतर जेव्हा लोकमान्य टिळकांनी पुण्यात एप्रिल 1900 च्या दरम्यान शिवरायांची जयंती साजरी केली. याचा सविस्तर उहापोह त्यांनी केसरी वृत्तपत्रात 14 एप्रिल 1900 रोजी केला आहे. 

      यात मुख्य कारण जर पाहिले तर शिवरायांचा जन्म ज्या कालावधीत झाला. तो कालावधी धामधुमीचा होता. शहाजीराजे आदिलशीहीशी बंड करून बंगळूरला होते. व जिजामाता या शिवनेरी किल्यावर होत्या. जिजाऊंच्या रक्षणासाठी किल्लेदराने किल्ला पूर्ण कडे कोट बंद केला होता. या धामधुमीच्या कालावधीत बखरी यांच्या कडून योग्य तारीख बखरीत लिहिणे राहून गेली असेल असे एक कारण आढळते. शिवाय शिवरायही स्वतःचाच महिमा गुणगान किंवा इतिहास लिहून घेणाऱ्यामधले राजे नव्हते. स्वराज्याच्या कार्यात ते इतके व्यस्त होते, की त्यांच सार आयुष्य मुघल ,आदिलशाही  यांच्याशी संघर्षात व स्वराज्य स्थापन करण्यात गेले. 

    दुसरे कारण जर पाहिले तर इंग्लिश कालगणना आणि मराठी कालगणना यांतील साम्य. शिवरायांचा जन्म मराठी कालगणनेनुसार सध्याच्या 19 फेब्रुवारी 1630 या तारखेच्या म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551 शुक्ल संवत्सर या तिथीच्या ऐवजी पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके 1549 मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता 6 एप्रिल 1627.


(त्यामुळे जेथे शके 1549 येते तेथे इसवी सन 1627 आणि शके 1551 येते तेथे इसवी सन 1630 साल स्मरणात ठेवावे. शालीवाहन शक आणि इसवी सन यांच्यामध्ये 78 वर्षांचा फरक आहे.)

   भारत व महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही तारीख स्वीकारली आहे. तर काही जण ही 13 मे या दिवशी साजरी करतात. 

     याठिकाणी छत्रपती शिवरायांची जन्म तारीख कोणती असेल हे सांगण्या एवढी माझी क्षमता नाही . पण शिवरायांच्या वर्षातील प्रत्येक दिवसाला जन्मतारीख मानून त्या दिवशी शिवरायांकडून एक गुण जरी घेतला तरीही ती शिवरायाच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादनच असेल

   

                 जय शिवराय

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.