मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

यशवंतराव चव्हाण यांच्या या चतृर्या मुळे मुंबई महाराष्ट्रात। १ मे महाराष्ट्र दिन


      इंग्रजांनी भारताची फाळणी जाती नुसार करण्याचा भरपूर प्रयत्न केला. परिणाम भारत पाकिस्तान फाळणी होण्यास कारक ठरली.

      पण जेव्हा भारत एकसंघ राष्ट्र म्हणून उदयास आले, त्यावेळी भारताचे पाहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झाले. त्यांनी राज्य संघ म्हणजेच कुठलेही राज्य न निर्माण करण्या पेक्षा भारतात भारत एकसंघ निर्माण करण्याचे ठरवले, ज्यामध्ये क्षेत्रानुसारच भारतात फक्त ४ ते ५ राज्य सुरुवातीला होती. पण भारतातील अनेक क्षेत्रातून क्रांती घडवून आली. ही क्रांती होती भाषेवरून. महाराष्ट्र आधी गुजरात, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मधील काही भाग मिळून होता. पण येथील जनते मध्ये भाषा व संस्कृती वरून वाद निर्माण झाला. त्यावेळेस या तीनही राज्यांना सौराष्ट्र म्हटले जाई. आणि या राज्याचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. त्यावेळेस काँग्रेस पक्ष भारतातील सर्वात मोठा पक्ष होता. त्यामुळे अनेक मोठे नेते या पक्षात काम करत होते. ज्यामध्ये यशवंतराव चव्हाण पण होते. आणि महत्वाचे निर्णय हे पक्षातील मोठे नेते घेत. 

     जनतेतील भाषा व संस्कृती वरून राज्य निर्मितीची क्रांती बघितल्यावर शेवटी या तीनही राज्यांना स्वतंत्र निर्माण करण्यात आले. पण मुंबई मूळ महाराष्ट्राची असूनही तिला गुजरात मध्ये शामिल करण्याचा निर्णय झाला. यातुन महाराष्ट्र व गुजरात या दोनही राज्यात तणाव निर्माण झाला. मुंबई यासाठी एक सभा झाली ज्यात मोरारजी देसाई यांनी  मुबंई केंद्र शासीत प्रदेश बनवण्याचा निर्णय घेतला. या निर्णया दरम्यान ते म्हणाले की मुबंई महाराष्ट्राला केव्हाही मिळणार नाही. ज्याला महाराष्ट्र मुंबईतील मराठी भाषिकांनी विरोध केला. व मुंबईत एक आंदोलन झाले. ज्यावर मोरारजी देसाई यांनी पोलिसांकडून गोळीबार केला. ज्यात १०५ मराठी भाषिकानी बलिदान दिले. 

      यशवंतराव चव्हाण यांना हे सर्व भघितल्यावर वाईट वाटले ,पण पक्षा विरोधात जाऊन काहीही मिळणारं नाही लक्षात आल्यावर त्यांनी एक शक्कल लढवली. नेहरूंना महाराष्ट्रात बोलावले.आणि एका भाषणात ते म्हणाले की नेहरु व संयुक्त महाराष्ट्रात ,मला नेहरु महत्त्वाचे वाटतात असे ते म्हटले. यशवंतराव चव्हाण यांच्या या वाक्याने नेहरूंना खुश केले. पण तरीही मुबंई महाराष्ट्रात देण्यास ते तयार नव्हते. शेवटी निवडणूक घेण्याचा निर्णय झाला. ज्यात महाराष्ट्राच्या बाजूने खुप मत आली. काँग्रेस पक्ष तसाही हळू हळू ढासळत चालला होता ,भविष्यात या जनतेच्या मताना नजर अंदाज करून चालणार नाही,असा विचार करून मुंबई महाराष्ट्र आली.

     मुबंई महाराष्ट्र येण्यासाठी मराठी भाषिकांनी व यशवंतराव चव्हाण यांनी खुप लढा दिला. 

    १ मे १९६० रोजी महाराष्ट्र संयुक्त रित्या स्थापन करण्यात आला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना करण्यात आले. मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

३ एप्रिल १६८० इतिहासातील एक काळा दिवस ।शिवाजी महाराज पुण्यतिथी दिन

      इतिहासात अनेक वीर योद्धे राजे महाराजे होऊन गेले आणि काळाच्या काळ्या दरीत समाहून पण गेले .पण इतिहासाने असेही काही योद्धे बघितले आहे जे इतिहासात अजर अजरामर तर झालेच, आणि भविष्यात त्यांचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा शरीरावर क्षहारे उभे राहिल्या शिवाय राहणार नाही       त्या पैकी शिवराय आहे यात काही दुमत नाही हेच खरे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्ष मध्ये नावाजलेले अमर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वर्ग वाशी झाले तेव्हा हिंदू स्वराज्य निर्माण करणारा भारताचा खरा वीर इहलोक सोडून गेले याचा संपूर्ण भारत वर्षाला दुःख होते.     शिवराय जेव्हा मृत्यू च्या दारात होते तेव्हाही त्यांना स्वराज्य आणि सामान्य जनतेचीच काळजी होती. संभाजी महाराज नेटकेच मुघलांच्या चंगुळ मधून सुटून आले होते ,शंभूराजे बरोबर शेवटी  खुप बोलावं असही शिवरायांना वाटत होतं.      शिवराय फक्त संसारच करून नाही गेले, तर तुकाराम महाराज रामदास स्वामी च्या सानिध्यात जे परमार्थ रुपी धन तेही जोपासले होते .प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे सर्वात श्रेष्ठ तो भगवंत आहे. ब...