मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

हनुमान जयंती निमित्त बलशाली बजरंगा कडून घ्या ५ अतिमोलाचे गुण


 

जय हनुमान ज्ञान गुण सागर ।
जय कपीस तिहु लोक उजागर।

   संत तुलसी दास यांनी लिहलेला हा बजरंगाचा चालिसा सर्वश्रुत प्रसिध्द आहे. ४० कडवे असल्यामुळे चालिसा हे नाव प्रसिद्ध झाले.

     नाशिक जिल्यातील अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला. वडील केसरी जे वानरांचे महाराज होते. 

     बालपणात सूर्याला जेव्हा फळ म्हणून खाण्यास उड्डाण केलेल्या वायुसुता ला इंद्राने बघितल्यावर वज्रचा मारा केला, ज्यामध्ये हनुमानाच्या हनुवटीला मार लागला, वायू देवला याचा खूप राग आला. तो राग शांत करण्यासाठी अनेक देवांनी हनुमंताला शक्ती प्रदान केली, कुबेराने गदा दिली, तर इंद्राने हनुवटीला मारा लागल्या मुळे हनुमान हे नाव प्रदान केले.

   

  बलशाली हनुमंत 

  शक्ती आणि सामर्थ्य या दोन्हीचा जेथे संगम आढळतो, असे हनुमंतराया. कुस्ती खेळणारे पहिलवान डाव खेळताना पहिल्यांदा हनुमंताचे स्मरण करतात. 

 बुद्धिवंत मारुतीराय

  सूर्याच्या प्रतिक्रम चालू असताना हनुमंताने सूर्याकडून ज्ञान घेतले. हनुमंत ज्ञान घेण्यासती सतत तत्पर असत. हनुमंत बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते.

   भक्तीची मूर्तिमंत देवता बजरंगबली

    भगवान श्री रामाचे लाडके भक्त बजरंगबली यांनाच ओळखलं जातं. भक्ती हा योग, कर्म,ज्ञान या मार्गापेक्षा श्रेष्ठ आहे.श्री रामाची जो भक्ती करतो त्याचे मारुती राया रक्षण करतात.

   किर्तीवाण मारुतीराया

   बजरंगबलीची कीर्ती सर्व जगात प्रसिद्ध आहे, हनुमंताची भक्ती केल्यावर व विवेकी कर्म केल्यावर आपली ही कीर्ती सर्वदूर पसरते.

    चाणाक्ष आणि चतुर मारुतीराय

मनोजव्यं मारूती तुल्य वेगं,

 जितेंद्रीयं बुद्धी मत्ता वरिष्ठं 

  मारुतीराय किती चतुर आणि चपळ होते, हे समर्थ रामदास ह्यांच्या श्लोकातून लक्षात येते. मनाच्या गतीपेक्षा मारुतीरायची गती जास्त होती. आणि चतुर एवढे की शनी अजून ही मारुती रायावर लागला नाहीये.

   मारुती रायची  भक्ती फक्त संकट निवारण्यासाठी करण्या पेक्षा मारुती रायची भक्ती सह त्यांचे गुण घेतले तर आजच्याही कालावधीत यशस्वी होण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

        

          जय बजरंग बली



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.