मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

अखेर वेडात मराठे वीर दाऊडले सात। वीरांची म्हण प्रचलित


 

     प्रतापराव  यांनी बहलोलखानास सोडल्यामुळे शिवरायांचे जे खरखरीत पत्र रावांनी वाचले त्यामुळे त्यांचे मन दुःखी झाले  .

     शिवरायांनी कल्पना केल्या प्रमाणे खानाने जखमी सर्पप्रमाणे पुन्हा ताकद जुटाऊन स्वराज्यकडे वाटचाल सुरू केली, प्रतापराव यांना खान चालून येत असल्याची वार्ता कळली तेव्हा त्यांना पाश्चाताप ही झाला ,आणि रागही आला .

  खान चालून येताना आता मोठी फौज घेऊन येत होता, तो पूर्ण चौताळलेला होता. स्वराज्यातील सर्व गाव तो उध्वस्त करत चालला होता ,मोठी फौज असल्यामुळे ताबडतोब खानाला थांबावं आता प्रतापरावांना अशक्य होतं ,कारण पहिल्या युद्धात  अर्धी सेना दमलेली होती, व नव्या व ताज्या दमाची फौज येण्यास किमान १५ एक दिवस लागणार होते ,प्रतापरावांच्या सहकाऱ्यांनी अत्ता थोडा धीर धरण्यास सांगितलं, पण शिवरायांचे खरखरीत पत्र व बहलोलखानाचा उर्मट पना रावा ना पाहवेना .

    खान आला त्यावेळी शेजारच्या जंगलामध्ये राव शिकार करत होते, गुप्तचरणी जेव्हा ही खबर राव याना दिली तेव्हा प्रतापरावांचे रक्त खानाला पाहून सळसळू लागले पुढचा कोणताही विचार न करता समशेर घेऊन त्यांनी घोड्यावर टाच मारली, रावांच्या सहकाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा खुप प्रयत्न केला ,पण रावमध्ये जशी रणचण्डिकाच अवतरली होती .

      प्रतापराव मोठ्या तेजीत घोडयावर बसून समोरून येणाऱ्या खाण्याच्या फौजेत घुसले, रावांचे जे इतर साथीदार होते ,धनी मृत्यूच्या घरात गेल्यावर ते थांबणार कसे राव आणि रावांचे सहा साथीदार असे एकूण सात जण त्या मृत्यूच्या दरबारात घुसले अमर होण्यासाठी.

   काही अंतरावर असलेल्या रावांच्या फौजेला ही बातमी समजली त्यांनी तंबोडतोब शिवरायांना पत्र पाठवले शिवरायांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांना खुप वाईट वाटले.शिवराय विचार करू लागले की ,आम्ही तरी प्रताप रावांचा तापट स्वभाव समजून घ्यायला हवा होता.

या नंतर या घटनेला शिवराय वेडात वीर दौडले सात असे संभोधले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.