मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

संकटातही एका बाणात अनेक निशाण भेदण्याची कला फ़क्त छत्रपती शिवरायांतच ( भाग १)


 छत्रपती  शिवरायांच्या अदिलशाही विरुद्ध चाललेल्या कार्यवाही बघितल्यावर शिवरायांनी ज्यावेळी चाकण घेतला. त्याशेजारीच असलेले अदिलशाहीचे शिरवळचे ठाणे या ठिकाणी  असलेल्या अमिनाने अदिलशाही मध्ये शिवराया विरुद्ध तक्राळ केली. त्यांनतर अमिनाच्या तक्रारीने व दरबारातील शिवरायांच्या विरुद्ध कानपिचक्या ऐकल्यावर नशेत धुंद अदिलशाहा काहीसा जागा झाला. त्याने ताबडतोब शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखानाला पाठवले. 

     ही खबर जेव्हा शिवरायांना समजली, त्यावेळी शिवराय काहीसे हर्ष भरीत झाले. पण दरबारातील जिजाऊ महासाहेब,बाजी पासलकर ,तानाजी सर्व अचर्यचकीत झाले. जिजाऊंनी विचारल्यावर शिवराय म्हणाले की "आम्ही विचार केला त्यापेक्षा अदिलशाही काहीशी उशिरा जागी झाली. मुळात खर पाहिलेतर हे आपल्याला संकट नाही तर संधीचं आहे. कसे काय या विषयी बाजी पासलकर यांनी शिवरायांना विचारल्यावर शिवराय म्हणले "सर्वात आधी आपण फत्तेखानाला अडवू बाकी आई भवानी बळ देईलच.

    ठरल्या प्रमाणे शिवारायनी चाकण किल्यावर आले. तो पर्यंत फत्तेखान खळत- बेलसरला तळ देऊन बसला होता. शिवराय चाकणला आल्याचे समजताच खानाने आपला प्रमुख सरदार बाळाजी हैबताला शिवरायावर पाठवले. बाळाजी हैबत अधीक कुमक मिळवण्यासाठी अदिलशाहीचा शिरवळचा गड सुभान मंगल यावर पोहोचला. 

     शिवरायांना ही बातमी समजताच बाळाजी हैबत व सुभानमंगळ जागा होण्याच्या आत त्यांनी बाजी पासलकर यांना अमावसेच्या रात्रीच सुभानमंगळ गड घ्यायचे ठरवले. बाजी पासलकर हर्ष भरीत झाले. रात्रीच बाजी पासलकर फौजघेऊन सुभानमंगळ गडाखाली आले. गनिमी कावा वापरत गडाच्या दरवाज्याच्या भिंतीना खिंडार पडण्यास सुरुवात झाली. गडावर लक्षात येई पर्यंत अर्धी भिंत पोखरून झाली होती. 

    गडावरील गडकरी आणि बाळाजी हैबत  जागे झाले. गडकरीला काही कळेनाच, काही सुचून देण्याचा आत बाजी पासळकरांनी दरवाजा फोडला. अमावास्याची रात्र असल्याने गडातील सैनिकांना बाजी पासलकरांची फौज दिसेनात. बाजी पासळकरांनी शर्यत लावून गडकऱ्याला आणि बाळाजी हैबतच्या मुसक्या आवळल्या. गड रात्री काही कालावधी बाजी पासलकरांचा ताब्यात आला.


क्रमशः...

अधिक पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...