मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

आपल्या मराठ्यांना हाच शाप विचारानं पेक्षा भावनाच बलवत्तर,।शिवरायांचे प्रतापरावाना वैचारिक बोल

      छत्रपती  शिवरायांच्या कालावधीतील इतिहास जर पहिला तर शिवरायांचे अनेक साथीदार, मावळे,सरदार शिवरायांसाठी जीव की प्राण देण्यास तयार होते. खरे पाहिले तर मराठे खाल्या मिठाला जगात, आणि एकदा वचन दिले तर ते तोडणे म्हणजे मराठ्यांना मृत्यू समान वाटत. शिवाय जुने व काही चुकीच्या  धार्मिक परंपरेत अडकलेल्या आपल्या हिंदूंवर पौराणिक कालावधीतील अनेक गोष्टींचा प्रभाव होता.भावनांच्या भरात अनेक वेळा शक्तीचा वापर अधिक होत होता. त्यामुळे कलियुगातील अनेक राजपटवरील डाव मराठे भावनांच्या बळावरच लढत .ज्याच्या मध्ये भावना बलवत्तर आहे ,तो विचारांचा  वापर करत नाही हे अनेक इतिहासातील उदाहरणावरून लक्षात येते. 

       राकट स्वभावाचे लक्ष्मण हे  श्री रामाच्या भक्तीती मध्ये राहत ,त्यामुळे अनेक वेळा युद्धच्या वेळी ते भावांच्या भारत युद्ध करत.

  (रावणाचा पुत्र इंद्रजित मायावी होता, हे रामाने समजून सांगितले होते ,तरीही श्री रामाला लालकरल्यामुळे भावनांच्या भरात लक्ष्मण इंद्रजित बरोबर युद्धास गेले, नंतर मायावी शक्तीचा वापर करून लक्ष्मणाला मूर्च्छित होण्याच्या स्तिथी पर्यंत जावे लागले नंतर हनुमान आणि संजीवन बुटी हा कथा भाग तर आपण जाणतातच.)

    महाभारतातही भीम भावनेच्या भरात युद्ध करत पण श्री कृष्ण अनेक वेळा भीमाच्या मदतीला धावून येत .

     मिर्झाराजे ही औरंगजेबाच्या याच कचाट्यात अडकलेले होते.

      छत्रपती शिवरायांना ही हिंदू मधील ही चूक लक्षात आली. धार्मिक व भावनिक गोष्टीवर विश्वास एखादया मर्यादे पर्यंत हवा ,पण तो अति जास्त नसावा की भावनवच्या आवेशात आपले मूळ कर्तव्यच विसरून जावे लागेल, असे शिवरायांचे मत होते .

      प्रतापराव गुजर हे छत्रपतींचे सर्वात विश्वासु मधील एक ,शिवरायांसाठी  मृत्यूलाही सामोरे जाणारे, पण भावनेच्या भरात स्वतःचे मूळ कर्तव्य मात्र ते विसरून जात .

      छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी सरसेनापती प्रतापराव  यांना बहलोलखानास पकडण्यास पाठवले त्यावेळी प्रतापराव शिवरायांसाठी युद्ध तर जिंखले, पण बहलोलखानाने विनंती केल्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन खानाला माफ करून सोडून दिले .

     पुढील भागात प्रतापराव  व बहलोलखान यांच्यातली युद्धाचा थोडक्यात मागोवा घेऊ .

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...