मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

आपल्या मराठ्यांना हाच शाप विचारानं पेक्षा भावनाच बलवत्तर,।शिवरायांचे प्रतापरावाना वैचारिक बोल

      छत्रपती  शिवरायांच्या कालावधीतील इतिहास जर पहिला तर शिवरायांचे अनेक साथीदार, मावळे,सरदार शिवरायांसाठी जीव की प्राण देण्यास तयार होते. खरे पाहिले तर मराठे खाल्या मिठाला जगात, आणि एकदा वचन दिले तर ते तोडणे म्हणजे मराठ्यांना मृत्यू समान वाटत. शिवाय जुने व काही चुकीच्या  धार्मिक परंपरेत अडकलेल्या आपल्या हिंदूंवर पौराणिक कालावधीतील अनेक गोष्टींचा प्रभाव होता.भावनांच्या भरात अनेक वेळा शक्तीचा वापर अधिक होत होता. त्यामुळे कलियुगातील अनेक राजपटवरील डाव मराठे भावनांच्या बळावरच लढत .ज्याच्या मध्ये भावना बलवत्तर आहे ,तो विचारांचा  वापर करत नाही हे अनेक इतिहासातील उदाहरणावरून लक्षात येते. 

       राकट स्वभावाचे लक्ष्मण हे  श्री रामाच्या भक्तीती मध्ये राहत ,त्यामुळे अनेक वेळा युद्धच्या वेळी ते भावांच्या भारत युद्ध करत.

  (रावणाचा पुत्र इंद्रजित मायावी होता, हे रामाने समजून सांगितले होते ,तरीही श्री रामाला लालकरल्यामुळे भावनांच्या भरात लक्ष्मण इंद्रजित बरोबर युद्धास गेले, नंतर मायावी शक्तीचा वापर करून लक्ष्मणाला मूर्च्छित होण्याच्या स्तिथी पर्यंत जावे लागले नंतर हनुमान आणि संजीवन बुटी हा कथा भाग तर आपण जाणतातच.)

    महाभारतातही भीम भावनेच्या भरात युद्ध करत पण श्री कृष्ण अनेक वेळा भीमाच्या मदतीला धावून येत .

     मिर्झाराजे ही औरंगजेबाच्या याच कचाट्यात अडकलेले होते.

      छत्रपती शिवरायांना ही हिंदू मधील ही चूक लक्षात आली. धार्मिक व भावनिक गोष्टीवर विश्वास एखादया मर्यादे पर्यंत हवा ,पण तो अति जास्त नसावा की भावनवच्या आवेशात आपले मूळ कर्तव्यच विसरून जावे लागेल, असे शिवरायांचे मत होते .

      प्रतापराव गुजर हे छत्रपतींचे सर्वात विश्वासु मधील एक ,शिवरायांसाठी  मृत्यूलाही सामोरे जाणारे, पण भावनेच्या भरात स्वतःचे मूळ कर्तव्य मात्र ते विसरून जात .

      छत्रपती शिवरायांनी ज्यावेळी सरसेनापती प्रतापराव  यांना बहलोलखानास पकडण्यास पाठवले त्यावेळी प्रतापराव शिवरायांसाठी युद्ध तर जिंखले, पण बहलोलखानाने विनंती केल्यामुळे भावनेच्या आहारी जाऊन खानाला माफ करून सोडून दिले .

     पुढील भागात प्रतापराव  व बहलोलखान यांच्यातली युद्धाचा थोडक्यात मागोवा घेऊ .

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.