२६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
प्रत्येक पित्याला वाटते की आपल्या पुत्राने आपल्या आज्ञात रहावे. पण शिवराय असे कसे की ज्या वेळी आदिलशहाने शहाजीराजांना कपटाने कैद केले, आणि त्यांना खाल्या मिठाची आन देऊन बळजबरीने शिवरायांना सर्व जिंखलेले किल्ले देऊन समर्पण करण्यास ये असा मजकूर लिहिण्यास शहाजीराजांना सांगितले. आणि नाईलाजाने शहाजीराजांना ही तसे करावे लागले. आणि एवढे शहाजीराजांचे पत्र आल्यावरही शिवरायांनी आपले हल्ले आदिलशाही किल्यावर चालूच ठेवले. त्याचे कारण असे होते की, शहाजीराजांना ही आंतरिक मनातून शिवरायांच्या कार्याचे कौतुक वाटत होते. व ते आशीर्वाद ही देत होते. कारण जे शहाजीराजांना करायचे होते. पण फंद फितुरीमुळे झाले नाही ते स्वराज्याचे स्वप्न आपला पुत्र करत होता ,याचा त्यांना अभिमानच होता. आणि शिवराय मनातून हे जाणतच होते. आणि शहाजी राजांनी ही त्या पत्रातून सांकेतिक भाषेत शिवरायांना आदेशच दिला होता. शिवराय किती आज्ञाधारक होते याचे अजून एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी नेस्तनाबूत झालेले पुणे शिवरायांना पुन्हा बसवायला सांगितले...