मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

शहाजीराजांचे आज्ञाधारक पुत्र शिवराय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शहाजीराजांचे आज्ञाधारक पुत्र शिवराय

               प्रत्येक पित्याला वाटते की आपल्या पुत्राने आपल्या आज्ञात रहावे. पण शिवराय असे कसे की ज्या वेळी आदिलशहाने शहाजीराजांना कपटाने कैद केले, आणि त्यांना खाल्या मिठाची आन देऊन बळजबरीने शिवरायांना सर्व जिंखलेले किल्ले देऊन समर्पण करण्यास ये असा मजकूर लिहिण्यास शहाजीराजांना सांगितले. आणि नाईलाजाने शहाजीराजांना ही तसे करावे लागले. आणि एवढे शहाजीराजांचे पत्र आल्यावरही शिवरायांनी आपले हल्ले आदिलशाही किल्यावर चालूच ठेवले. त्याचे कारण असे होते की, शहाजीराजांना ही आंतरिक मनातून शिवरायांच्या कार्याचे कौतुक वाटत होते. व ते आशीर्वाद ही देत होते.  कारण जे शहाजीराजांना करायचे होते. पण फंद फितुरीमुळे झाले नाही ते स्वराज्याचे स्वप्न आपला पुत्र करत होता ,याचा त्यांना अभिमानच होता. आणि शिवराय मनातून हे जाणतच होते. आणि शहाजी राजांनी ही त्या पत्रातून सांकेतिक भाषेत शिवरायांना आदेशच दिला होता.            शिवराय किती आज्ञाधारक होते याचे अजून एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी नेस्तनाबूत झालेले पुणे शिवरायांना पुन्हा बसवायला सांगितले...