मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

संकटातही एका बाणात अनेक निशाण भेदण्याची कला फ़क्त छत्रपती शिवरायांतच (भाग २)


 

छत्रपती  शिवरायांनी आपल्या सरदारांना आणि मावळ्यांना मातृभूमी विषयी एवढं जागृत केलं होतं की दुष्मन कितीही मोठा असोत पण त्याचा सामना करायचाच.  त्यामुळेच बाजी पासळकरांनी दोन मोठे विरोधक सुभानमंगळ गडावर असूनही त्यांचा सामना केला. 

     शिवरायांना गड ताब्यात आल्याची वर्दी बाजीनी दिली. गड फत्ते झाल्याचे समजतात. शिवरायांना खुप आनंद झाला. पण जेव्हा ही बातमी आधीलशाहाने पाठवलेल्या फत्तेखानाला समजली तो चवताळून उठला. त्याने सरळ चाकण वर चढाई करायचे ठरवले. 

    इकडे बाजी पासळकरांनी सुभानमंगळ गडातून मोठी लूट मिळविली. घोडे आणि दारुगोळा मोठया प्रमाणात मिळाल्यावर ती सर्व कुमक घेऊन शिवरायांनी बाजींना चाकण ला बोलावले. आदिलशाहीचा दारुगोळा अदिलशाही वर वापरायचा असे शिवरायांनी ठरवले. 

       फक्त मोठ्या फौजेच्या भरोश्यावर आलेला फत्तेखान शिवरायांच्या योजनेला समजू शकला नाही त्याने सरळ किल्यावर हल्ला चढवला. शिवरायांनी सर्वात आधी खानाला तोफांच्या गोळ्यांच्या सीमेत आणले, व त्यानंतर बेसावध खानावर गोळे डागण्यास सुरुवात केली. तोफेच्या गोळ्यांच्या तडाख्यातून सावध होण्याच्या आत किल्ल्यातून हर हर महादेव म्हणत शिवरायांची फौज तुटून पडली. 

    शिवरायांनी सर्वात आधी खानच्या फौजेच्या सेनापतीला फडशा पडण्यास तानाजीला संगितले. ठरल्या प्रमाणे सर्वांनी आधी खानचा सेनापती व सर्व मत्वाचे अधिकारी पडले. सेनापती पडलेला दिसताच खानाचे सैनिक व स्वतः खान पळ काढण्यास सुरुवात झाली. 

   बाजी पालकरांनी पळून चाललेल्या खानाचा पाठलाग केला. व फत्तेखान्याच्या मुसक्या आवळल्या. पण यामध्ये वयोवृद्ध बाजी पासलकर जखमी झाले. शिवरायांना जेव्हा समजले तेव्हा ते ताबडतोब बाजींना सामोरे गेले. आणि बाजींना म्हणाले की बाजी काका खानाच्या मुसक्या अवळण्या पेक्षा तुम्ही स्वराज्यासाठी अधिक मोलाचे आहे. हे ऐकल्यावर बाजींच्या डोळ्यात अश्रू आले. आणि हे बघितल्यावर शिवरायांनी बाजींना मिठी मारली.

 शिवरायांनी संकटातही संधी शोधण्याचा प्रयन्त केला. हे या युद्धातून लक्षात येते. येथे शिवरायांनी दोन महत्वाचे फायदे मिळवले एक म्हणजे फत्तेखाना बरोबर झालेल्या युद्धात घोडे व दारुगोळा शिवाय सुभानमंगळ हा गड ही सर केला. तर दुसरे म्हणजे अदिलशाहीच्या दरबारात शिवरायांनी आपला दरारा निर्माण केला.

   मित्रांनो आपल्याही जीवनात अनेक संकटे येतात जर त्यामध्ये शिवरायाप्रमाणे संकटात संधी शोधली तर यश फार दूर नाही.


भाग १







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...