मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

संकटातही एका बाणात अनेक निशाण भेदण्याची कला फ़क्त छत्रपती शिवरायांतच (भाग २)


 

छत्रपती  शिवरायांनी आपल्या सरदारांना आणि मावळ्यांना मातृभूमी विषयी एवढं जागृत केलं होतं की दुष्मन कितीही मोठा असोत पण त्याचा सामना करायचाच.  त्यामुळेच बाजी पासळकरांनी दोन मोठे विरोधक सुभानमंगळ गडावर असूनही त्यांचा सामना केला. 

     शिवरायांना गड ताब्यात आल्याची वर्दी बाजीनी दिली. गड फत्ते झाल्याचे समजतात. शिवरायांना खुप आनंद झाला. पण जेव्हा ही बातमी आधीलशाहाने पाठवलेल्या फत्तेखानाला समजली तो चवताळून उठला. त्याने सरळ चाकण वर चढाई करायचे ठरवले. 

    इकडे बाजी पासळकरांनी सुभानमंगळ गडातून मोठी लूट मिळविली. घोडे आणि दारुगोळा मोठया प्रमाणात मिळाल्यावर ती सर्व कुमक घेऊन शिवरायांनी बाजींना चाकण ला बोलावले. आदिलशाहीचा दारुगोळा अदिलशाही वर वापरायचा असे शिवरायांनी ठरवले. 

       फक्त मोठ्या फौजेच्या भरोश्यावर आलेला फत्तेखान शिवरायांच्या योजनेला समजू शकला नाही त्याने सरळ किल्यावर हल्ला चढवला. शिवरायांनी सर्वात आधी खानाला तोफांच्या गोळ्यांच्या सीमेत आणले, व त्यानंतर बेसावध खानावर गोळे डागण्यास सुरुवात केली. तोफेच्या गोळ्यांच्या तडाख्यातून सावध होण्याच्या आत किल्ल्यातून हर हर महादेव म्हणत शिवरायांची फौज तुटून पडली. 

    शिवरायांनी सर्वात आधी खानच्या फौजेच्या सेनापतीला फडशा पडण्यास तानाजीला संगितले. ठरल्या प्रमाणे सर्वांनी आधी खानचा सेनापती व सर्व मत्वाचे अधिकारी पडले. सेनापती पडलेला दिसताच खानाचे सैनिक व स्वतः खान पळ काढण्यास सुरुवात झाली. 

   बाजी पालकरांनी पळून चाललेल्या खानाचा पाठलाग केला. व फत्तेखान्याच्या मुसक्या आवळल्या. पण यामध्ये वयोवृद्ध बाजी पासलकर जखमी झाले. शिवरायांना जेव्हा समजले तेव्हा ते ताबडतोब बाजींना सामोरे गेले. आणि बाजींना म्हणाले की बाजी काका खानाच्या मुसक्या अवळण्या पेक्षा तुम्ही स्वराज्यासाठी अधिक मोलाचे आहे. हे ऐकल्यावर बाजींच्या डोळ्यात अश्रू आले. आणि हे बघितल्यावर शिवरायांनी बाजींना मिठी मारली.

 शिवरायांनी संकटातही संधी शोधण्याचा प्रयन्त केला. हे या युद्धातून लक्षात येते. येथे शिवरायांनी दोन महत्वाचे फायदे मिळवले एक म्हणजे फत्तेखाना बरोबर झालेल्या युद्धात घोडे व दारुगोळा शिवाय सुभानमंगळ हा गड ही सर केला. तर दुसरे म्हणजे अदिलशाहीच्या दरबारात शिवरायांनी आपला दरारा निर्माण केला.

   मित्रांनो आपल्याही जीवनात अनेक संकटे येतात जर त्यामध्ये शिवरायाप्रमाणे संकटात संधी शोधली तर यश फार दूर नाही.


भाग १







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...