मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रेरक जीवन


        ग्रामविकास  हा देश विकासाचा पाया आहे, हा दुरदृष्टीकोन ज्या संतांचा होता असे तुकडोजी महाराज. भारतात ग्रामीण भाग सर्वात जास्त आहे. तो जर सुजलाम सुफलाम झाला. तर देश प्रगती पथावर जाण्यास कोणीही रोखु शकणार नाही.

हे भविष्यातील स्वप्न ही तुकडोजी महाराज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते.

    युवाच भविष्यात भारत विकासात सर्वात महत्वाची भूमिका आहे, ही बाब सुद्धा तुकडोजी महाराजांच्या लक्षात आली होती. पण त्या अगोदर महिला सुशिक्षित होणं ही आवश्यक आहे कारण त्याच अशा युवकांना घडवू शकतील हे विचार सुद्धा तुकोडजी महाराजानी इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हाच विचार केला होता. आणि यासाठी त्यांनी प्रयन्त ही केले होते. 

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. वडिलांचे नाव बंडोजी तर आईचे नाव मंजुळा बाई. 

    तुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिक बेंडोजी इंगळे. पण तुकडोजी हे नाव महाराजांना त्यांच्या गुरूंनी दिले.

     समाज प्रभोधनासाठी तुकडोजी महाराज ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. तर ते खंजिरी या आपल्या काव्यरचनेतून महाराजानी समजला मोलाचे संदेश दिले.

     इंग्रज शासन काळात महाराजानी स्वातंत्रतेसाठी पर्यंत केले. यासाठी त्यांना कारावास सुद्धा भोगावा लागला. 

   भारत स्वतंत्र झाल्या नंतर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी त्यांच्या कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रसंत हे पहिल्यांदा संभोधले. 

     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दुरदृष्टीकोन ठेवणारे होते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातीप्रथा, नशाबंधी या सारखे अनेक महत्वाचे कार्य महाराजानी केले . भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले. 

      तुकडोजी महाराज यांचे कार्य अजच्याही कालावधीत प्रेरक राहील.

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

टिप्पण्या