मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिवरायांचा पुरंधर किल्ल्यावरील विजय कपट की गनिमी कावा भाग २


 


    छत्रपती  शिवरायांना आवश्यक होतं, ते प्रथम किल्ल्यामध्ये प्रवेश करण, कारण त्याशिवाय पुढील योजना आखण अवघड होतं, शिवाय निळोजीला थोडा जरी अविश्वास निर्माण झाला, तर किल्ल्यावर जाण अवघड होते. त्यामुळे शिवरायांनी योग्य संधीची वाट पाहिली.

      संक्राजी ,व पिलाजी यांनी निळोजीची समजूत घालून, शिवरायांना दिवाळी सणाच्या दरम्यान निमंत्रण पाठवलं.निळोजीचा ही विश्वास शिवरायांवर होता, त्यामुळे त्याने निमंत्रिनाचे ताबडतोब पत्र पाठवले. आणि हीच संधी शिवरायांना नामी वाटली. शिवराय ताबडतोब तानाजी, जिवाजी या सवंगडया सह किल्यात दाखल झाले.

     निळोजी तसा लोभी व भोगी पद्धतीचा होता. मद्य पिणं महिलांचे नृत्य बगण यातच तो आपलं आयुष्य घालवत होता. संध्याकाळी महिफिल बसल्यावत दिवाळी असल्यामुळे निळोजी ने शिवरायांना घाबरत मद्य देण्याचा पर्यंत केला.पण मात्र शिवारायनी हसत म्हणाले की मद्य आम्हाला वर्ज्य आहे ,पण आम्ही त्या जागी सरबत घेऊ .निळोजी ने ही सरबत आणण्यास आदेश दिला.

    संक्राजी व पिलाजी याच दरम्यान शिवरायांकडे बघत होते. योजना आधीच ठरली होती. निळोजी मद्यपाना मध्ये पूर्ण दुबल्या नंतर ठरल्या प्रमाणे शिवरायांनी रात्री किल्ला ताब्यात घेतला. जेव्हा ही गोष्ट निळोजीला भानावर आल्यावर लक्षात आली, तेव्हा तो शिवरायांच्या कैदेत होता. 

      "धोका शिवाजी राजे तुम्ही आमच्या बरोबर धोका केला ,आम्ही तुमच्या वर विश्वास ठेवला ,आणि तुम्ही आमचा विश्वास घात केला. यावर शिवराय कडाडले. "आम्ही विश्वास घात केला की तुम्ही. तो निजाम आपल्या आई बहिणीची आबरू लुतोय आणि तुम्हीही त्यांच्यातच शामिल झाला. भावांचा अधिकार काढून घेतला हे कोणत पुण्याच काम केलं.आम्ही तुम्हाला स्वराज्यकडून या यासाठी विनंती ही केली,ती सोडून तुम्हीही त्या निजामा सारखे वागू लागल्यावर हिंदू भूमीच काय होईल"

     निळोजी कडून किल्ला काढून घेतल्यावर शिवरायांनी किल्यावर दोघांना समान अधिकार दिला. व दोघा कडूनही स्वराज्यासाठी कार्यरत राहण्याची  आश्वासने घेतली. 

     या द्वारे निजामाला कुठलीही भनक न लागता शिवारायनी पुरंधर स्वराज्यात आणला.

       शिवरायांनी पुरंधर स्वराज्यात आणताना कोठलेही कपट वापरले नाही, कारण श्री राम यांनीही जर पाहिले तर दृष्ट् बालीला झाडा मागूनच वार केला होता, कारण बालीने सुग्रीवाच्या पत्नीला बंदी बनवून ठेवले होते. आणि येथे निळोजी नेही हिंदूंचे रक्षण करण्याचे सोडून स्वतःच्या भोगामध्ये लिप्त झाला होता. शिक्षा होणं तर आवश्यकच होत.

   न युद्ध करता किल्ला जिंखन हा शिवरायांचा गनिमी कावाच होता.

    आणि जे लोक सुरुवातिच्या अपयशाचे रडगाणे गातात, त्यांनी शिवारायनी सुरुवातीला कोणत्या योजनांची यश मिळवलं ते जाणुन घेत आवश्यक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...