मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

प्रत्येक किर्तीवान पुरुषा मागे एका धेर्य वाण मातेचाच हात । जागतिक मातृदिन




 

    मित्रांनो आपण जर पाहिले तर अनेक कीर्तीवाण मातानी इतिहासात आपली नावे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली आढळून येते. ज्यांनी आपल्या पोटी एका शूरविरास जन्म दिला. 

    भारत भूमी तर अनेक वीरांनी भरली आहे पण त्यांना घडवण्यासाठी एक माताच होती, हेही आपण लक्षात घ्यायला हवे, 

     माता कौसल्या यांनी प्रभू राम यांना जन्म दिला आणि आपल्याला एक मर्यादा पुरुषोत्तमाचे चरित्र बघण्यास मिळाले. यावरून माता कैसाल्या यांनी श्री रामाला जी शिकवण दिली असेल, ती  श्री रामच्या कीर्ती यावरून लक्षातच येते. 

    माता देवकी यांनी श्रीकृष्ण रक्षणासाठी जे प्रयन्त केले ते फक्त एक माताच करू शकते, तर माता यशोदेने श्रीकृष्ण यांना ज्या प्रेमाने वाढवले, यातून ऐका प्रेमळ मातेचे जीवापाड प्रेम दिसून येते.

   कुंती मातेने पांडवांना धर्माविषयी जागृत केले नसते, तर महाभारतातील धर्मयुद्ध झालेच नसते. 

    राजमाता  जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवले नसते. शिवरायांनी ज्या ठिकाणी स्वराज्य मिळवले, त्याठिकाणी काय अवस्था असती ते वेगळे सांगायला नको.

    सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर अशा अनेक माता आणि कीर्तीवाण स्त्रिया भारत भूमीत होऊन गेल्या.

     माता रखमाबाई आणि वडील विट्टल यांनी तर निवृत्तीनाथ ज्ञाना, सोपान, मुक्ताबाई यांच्यासाठी जीव त्यागला होता.

    पण आता येतून पुढे काय, टीव्ही वरील विचित्र मालिका बघणाऱ्या आताच्या माता, मुल त्रास देऊ नये म्हणून हातात मोबाईल देणाऱ्या आत्ताच्या माता कशा आत्ता महासत्ता बनणाऱ्या भारताला वीर देऊ शकतील हा प्रश्न आपल्या सर्वांवर अवलंबून आहे.

    त्यामुळे आवश्यकता आहे भारताला फक्त वीरांची नाही तर वीरांगना व वीर मतांची त्याच फक्त भारताला महासत्ता बनवू शकतील.

   मातृदिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा

अधीक पोस्ट वाचण्यासाठी येते क्लिक करा



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...