मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

स्वतंत्रवीर म्हणून नावाजलेले विनायक दामोधर सावरकर


 

ने मजसी ने परत मातृभूमीला । 

सागरा, प्राण तळमळला

   भारत भूमीच्या स्वातंत्रतेसाठी कोठलीही किंमत मोजू पण स्वातंत्र्याची देवता आम्ही प्रसंन्नच करू ही जिद्दीची असा ठेवणारे विनायक दामोधर सावरकर 

   स्वतंत्र वीर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर यागावी राधाबाई यांच्या पोटी झाला.  वडील दामोधर सावरकर यांना एकूण तीन अपत्य त्या पैकी विनायक हे दुसऱ्या क्रमांकाचे. विनायक यांचे वडील हे व्यवसायाने सावकार. विनायक नऊ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे छत्र त्यांच्या पासून हिरावले. मोठया काकूने त्यांचा सभांळ केला. पुढे इंग्रजांच्या अत्याचारमुळे त्यांची सावकिरी गेली. आणि त्यातच प्लेग रोगाच्या साथी मध्ये वडीलही वारले. मोठया काकांना इंग्रजांनी एका आंदोलनात गोळी झाडली, असे अनेक संकटे भघितल्यावर तुळजा माते पुढे शिवराया प्रमाणे प्रण घेतला की शेवटच्या स्वासा पर्यंत इंग्रजां बरोबर संघर्ष करत राहील.

    स्वातंत्रवीर सावरकर हे बालपणापासूनच हुशार होते. सावरकर हे छत्रपती शिवराय यांच्याकडून प्रेरित होते. काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यावर इंग्लड मधून पळताना त्यांनी शिवरयांच्या आग्रा मधून पाळण्याच्या योजनेचाच वापर केला होता. यासाठी त्यांनी सर्व योजनाही बनवली होती.

    आज जे स्वातंत्र्य आपण बगतोय त्यात या भारतीय वीरांचा मोलाचा वाटा आहे हे आपण विसरता कामा नये. शिक्षा भोगन्यासाठी सावरकर अंदमान निकोबरला गेले होते. तेव्हा किती अत्याचार झेलला होता. या विषयी वाचल्यावर अंगावर काटाच येतो.

   सावरकरांनी भारत भूमी साठी केलेले कार्य युवा पिढी साठी सतत प्रेरणादायी असेल. 

   स्वातंत्रवीर विनायक दामोधर सावरकर यांच्या जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.