जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
सरनोबत प्रतापराव गुजर यांकडे बहलोलखानास पकडण्यास पाठवले यावरून शिवरायांना प्रतापराव यावर पूर्ण विश्वास होता, की ते नक्की ही कामगिरी पार पडतील आणि प्रतापराव यांनीही मोठ्या शौर्याने बहलोलखानास परास्त केले ही वार्ता ऐकून शिवराय फार आनंदीत ही झाले होते,
येथ पर्यंत सर्व ठीक होते पण जेव्हा भावनांच्या आहारी जाऊन सारनोबत यांनी खानास जीवदान दिले ही गोष्ट शिवरायांना कळली तेव्हा त्यांची तळ पायची आग मस्तकात गेली .त्यांनी एक खरखरीत पत्र प्रतापराव यांना लिहिले, ज्यामध्ये ते प्रतापराव यांना म्हणाले की "तुम्ही स्वराज्याचे सरनोबत तुम्ही तरी अशी चूक करायला नको होती हाती, आलेला शत्रू तुम्ही जाऊ दिला कोणाच्या परवानगीने एकदा आमची रजामंदी घेणं आवश्यक वाटले नाही. हातून सुटलेला शत्रू हा जखमी सापसारखा आहे जो पुन्हा वार करण्यास नक्की येईल सला काय निमित्त केला .आता जो पर्यंत तुम्ही त्या बहलोलखानास पकडून आणत नाही तोपर्यंत आपले मुख सुद्धा आम्हाला दाखवू नका.
खरे पाहिले हातात आलेला शत्रू जर सुटला तर दुसऱ्या वेळेस वार करताना तो पूर्ण चिडून व क्षमता लावून हमला करत असतो ,शत्रूला पुन्हा संधी देणे म्हणजे आत्मघातच होय असे छत्रपती चे मत होते.
शिवरायांचे खरखरीत शब्द वाचून प्रतापरावाना वाईट वाटले आणि शिवरायांचे ही म्हणने खरे ठरले काही दिवसां नंतर बहलोलखानाने दिलेरखानासह स्वराज्यात कूच केली.
या नंतरच्या भागात वेडात मराठे वीर दौडले सात ही म्हण का प्रसिद्ध झाली ते पाहू,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा