२६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
सरनोबत प्रतापराव गुजर यांकडे बहलोलखानास पकडण्यास पाठवले यावरून शिवरायांना प्रतापराव यावर पूर्ण विश्वास होता, की ते नक्की ही कामगिरी पार पडतील आणि प्रतापराव यांनीही मोठ्या शौर्याने बहलोलखानास परास्त केले ही वार्ता ऐकून शिवराय फार आनंदीत ही झाले होते,
येथ पर्यंत सर्व ठीक होते पण जेव्हा भावनांच्या आहारी जाऊन सारनोबत यांनी खानास जीवदान दिले ही गोष्ट शिवरायांना कळली तेव्हा त्यांची तळ पायची आग मस्तकात गेली .त्यांनी एक खरखरीत पत्र प्रतापराव यांना लिहिले, ज्यामध्ये ते प्रतापराव यांना म्हणाले की "तुम्ही स्वराज्याचे सरनोबत तुम्ही तरी अशी चूक करायला नको होती हाती, आलेला शत्रू तुम्ही जाऊ दिला कोणाच्या परवानगीने एकदा आमची रजामंदी घेणं आवश्यक वाटले नाही. हातून सुटलेला शत्रू हा जखमी सापसारखा आहे जो पुन्हा वार करण्यास नक्की येईल सला काय निमित्त केला .आता जो पर्यंत तुम्ही त्या बहलोलखानास पकडून आणत नाही तोपर्यंत आपले मुख सुद्धा आम्हाला दाखवू नका.
खरे पाहिले हातात आलेला शत्रू जर सुटला तर दुसऱ्या वेळेस वार करताना तो पूर्ण चिडून व क्षमता लावून हमला करत असतो ,शत्रूला पुन्हा संधी देणे म्हणजे आत्मघातच होय असे छत्रपती चे मत होते.
शिवरायांचे खरखरीत शब्द वाचून प्रतापरावाना वाईट वाटले आणि शिवरायांचे ही म्हणने खरे ठरले काही दिवसां नंतर बहलोलखानाने दिलेरखानासह स्वराज्यात कूच केली.
या नंतरच्या भागात वेडात मराठे वीर दौडले सात ही म्हण का प्रसिद्ध झाली ते पाहू,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा