मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रेरक जीवन

        ग्रामविकास   हा देश विकासाचा पाया आहे, हा दुरदृष्टीकोन ज्या संतांचा होता असे तुकडोजी महाराज. भारतात ग्रामीण भाग सर्वात जास्त आहे. तो जर सुजलाम सुफलाम झाला. तर देश प्रगती पथावर जाण्यास कोणीही रोखु शकणार नाही. हे भविष्यातील स्वप्न ही तुकडोजी महाराज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते.     युवाच भविष्यात भारत विकासात सर्वात महत्वाची भूमिका आहे, ही बाब सुद्धा तुकडोजी महाराजांच्या लक्षात आली होती. पण त्या अगोदर महिला सुशिक्षित होणं ही आवश्यक आहे कारण त्याच अशा युवकांना घडवू शकतील हे विचार सुद्धा तुकोडजी महाराजानी इंग्रज भारतावर राज्य करत होते तेव्हाच विचार केला होता. आणि यासाठी त्यांनी प्रयन्त ही केले होते.       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली येथे ३० एप्रिल १९०९ रोजी झाला. वडिलांचे नाव बंडोजी तर आईचे नाव मंजुळा बाई.      तुकडोजी महाराज यांचे खरे नाव माणिक बेंडोजी इंगळे. पण तुकडोजी हे नाव महाराजांना त्यांच्या गुरूंनी दिले.      समाज प्रभोधनासाठी तुकडोजी महाराज ग्रामगीता हा...

वीर बाजीराव पेशवे यांची वयाच्या फक्त २० साव्या वर्षी पेशवे पदावर नेमणूक

        पाहिले किंवा थोरले बाजीराव पेशवे म्हणून ओळखले जाणारे बाजीराव बल्लाळ हे चौथे छत्रपती म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शाहू महाराजांच्या कालावधीत बाळाजी विश्वनाथ यांच्यानंतर  श्रीमंत पेशवे पदावर आरूढ झाले.       बाजीराव पेशवा हे बाळाजी विश्वनाथ यांचे सुपुत्र, बाजीराव यांनी वडिलांच्या सानिध्यात अनेक युद्ध कोशल्याच्या बाबी शिकल्या. मुघलसाम्राज्य जेव्हा कमकुवत झाले. त्यावेळी  बाळाजी विश्वनाथ हे अनेक वेळा उत्तरे कडे सत्ता स्थापन करण्यासाठी मोहीम हाती घेत. त्यामुळे कोवळ्या वयात हट्ट करून बाजीराव हे सुध्दा उत्तरेकडे मोहिमेत शामिल होत. उत्तरे कडील दिल्ली, आग्रा या प्रदेशातील मारा करण्यासाठी मोक्याच्या ठिकाण बाजीरावणे बालपणीच पाहून ठेवले.       बाजीराव हे स्वभावाने तापत होते. शांत व मुत्सद्देगिरीपेक्षा तालावर बाजीराव यांना जवळची वाटायची.        त्यामुळे जेव्हा पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. त्यानंतर श्रीमंत पेशवा पद हे बाजीराव यांच्या कडे देण्यास छत्रपती शाहू महाराजांचे राजदरबारी मनाई करत होते. यांचे...

जगायचं तर वाघ होऊन, शेळी होऊन आता जगू वाटत नाही। दादोजींचे आणि मावळ्यांचे शिवरायांना बोल

        छत्रपती   शिवरायांनी ज्या वेळी रारारेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, त्यावेळी मुघलांचे अत्याचार पाहून मावळ्यांच्या मनात राग उफळत होता. परकीय निजाम केव्हाही काहीही आदेश देतील आणि आपली गाव लुटली जातील ,आया बायांच्या अब्रू लुटल्या जातील, हे मावळे शतकानुशतके बघतच होते. त्यात आपले काही हिंदू राजे जहागिरी साठी केव्हाही आपला मान या निजामान पुढे झुकवत. ज्याचा राग सामान्य जनतेत आणि मावळ्यांच्या मनात होताच, फक्त त्याला आग लागने गरजेचे होते. जे शिवरायांनी केले, देशभक्ती मातृभूमी प्रेम जागृत करून.       दोदोजीं कोंडदेव ही शहाजी राज्या सह निजामाची गुलामगिरी करण्यास राग येत होता, शहाजीराज्यानी  निजामविरुद्ध बंड पुकारला, त्यात दादोजींची मदत होती. पण ज्यावेळी बंड मोडून काढला, त्यावेळी दादोजींचे मन हिरमुसले होते. ज्यावेळी शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली. सुरुवातीला शहाजीराजेना आलेले अपयश शिवरायांना ही येते की काय? असे दादोजींना वाटायचे, पण जेव्हा शिवरायांचा स्वराज्या प्रति उत्साह ,आणि जोश पाहिल्यावर त्यांचीही खात्री पटली होती.      ज्या क...

हनुमान जयंती निमित्त बलशाली बजरंगा कडून घ्या ५ अतिमोलाचे गुण

  जय हनुमान ज्ञान गुण सागर । जय कपीस तिहु लोक उजागर।     संत तुलसी दास यांनी लिहलेला हा बजरंगाचा चालिसा सर्वश्रुत प्रसिध्द आहे. ४० कडवे असल्यामुळे चालिसा हे नाव प्रसिद्ध झाले.      नाशिक जिल्यातील अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी हनुमंताचा जन्म झाला. वडील केसरी जे वानरांचे महाराज होते.       बालपणात सूर्याला जेव्हा फळ म्हणून खाण्यास उड्डाण केलेल्या वायुसुता ला इंद्राने बघितल्यावर वज्रचा मारा केला, ज्यामध्ये हनुमानाच्या हनुवटीला मार लागला, वायू देवला याचा खूप राग आला. तो राग शांत करण्यासाठी अनेक देवांनी हनुमंताला शक्ती प्रदान केली, कुबेराने गदा दिली, तर इंद्राने हनुवटीला मारा लागल्या मुळे हनुमान हे नाव प्रदान केले.       बलशाली हनुमंत    शक्ती आणि सामर्थ्य या दोन्हीचा जेथे संगम आढळतो, असे हनुमंतराया. कुस्ती खेळणारे पहिलवान डाव खेळताना पहिल्यांदा हनुमंताचे स्मरण करतात.   बुद्धिवंत  मारुतीराय   सूर्याच्या प्रतिक्रम चालू असताना हनुमंताने सूर्याकडून ज्ञान घेतले. हनुमंत ज्ञान घेण्यासती सतत तत्पर...

छत्रपती शिवरायां सह त्यांच्या सवनगड्यांची रायरेश्वराच्या मंदिरातील शपथ

            निजाम, मुघलांचे अत्याचार बघितल्याव जिजामातेच्या मनात तसेही ज्वाला भडकत होती. आणि हीच ज्वाला जिजाऊंनी शिवरायांच्या मनात बालपणापासूनच रुजवण्यास सुरुवात केली.         त्यात शिवरायांचे विचारही बालपणापासून प्रखर व अन्यायाविरुद्ध वाचा फोडनारे होते. बालपणापासूनच निजामशाही चे अत्याचार, हिंदूंचा होणारा छळ, जनतेची लूट असे सर्व वातावरण एक निजामशाहीतील नामी सरदारांचा पुत्र असताना शिवराय पाहत होते. जेथे समोर सर्व सुख सुविधां होत्या तरीही सामान्य जनतेसाठी काही कर्तुत्व करून दाखवन्याचे शिवरायांनी ठरवले.      ज्या वयात आपण नववी,दहावी चे पेपर देत होतो. त्या वयात शिवरायांनी स्वराज्य स्थापण करण्याची शपथ घेतली. तीही बारा मावळ रानातील त्या योध्याबरोबर जे शिवराया पेक्षा वयाने मोठे होते.         छत्रपती शिवरायांनी मावळ्यामध्ये मातूभूमी, देशप्रेम या विषयी जागृत केले, आणि वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ रोजी रायरेश्वराच्या मंदिरात सर्वा समावेत एक शपथ घेतली.     शिवपिंडीवर बेलपत्र वाह...

भगवान महावीर वर्धमान यांच्या जयंती निमित्त त्यांनी सांगितले ५ अतिमोलाचे तत्व

    भगवान  महावीर हे जैन धर्माचे २४ वे तिर्थकर. ज्यांचा जन्म इ.स.पू ५९९ ते ५२६ या दरम्यान उत्तरेकडील कुंडलपूर येथे इस्वाकू वंशात झाला.वडील सिद्धार्थ जे एक क्षत्रिय राजा होते, तर आईचे नाव  त्रिशला होते.        महावीर हे खरे अविवाहित राहणार होते. पण माता पितांच्या आग्रहामुळे महावीर वर्धमांन यांचे लग्न यशोदा नामक राजकन्ये बरोबर झाला. महावीर यांना प्रियदर्शिनी नावाची मुलगी होती.         महावीर यांनी १२ वर्ष तप करून अनेक विकारावर विजय मिळवला होता.       भगवान महावीर यांनी समाजाला अनेक बोधक संदेश दिले ज्या मध्ये त्यांचे पंचतत्व सर्वत्र प्रसिद्ध आहे ते पुढील प्रमाणे -   सत्य      सर्वांशी खर बोलावं खोट बोलणे हे एक पाप आहे ,असे भगवान महावीर यांचे मनाने आहे.   अहिंसा      कुठल्याही प्राण्यांची किंवा जीवाची हिंसा न होता ,सर्वा बरोबर अहिंसेने राहावे असा संदेश महावीरांचा आहे.     अस्तेय     म्हणजेच आपला अधिकार नसता दुसऱ्याची कुठल्याही वस्तूची चोरी करणं एक प्रक...

शिवरायांचा पुरंधर किल्ल्यावरील विजय कपट की गनिमी कावा भाग २

      छत्रपती  शिवरायांना आवश्यक होतं, ते प्रथम किल्ल्यामध्ये प्रवेश करण, कारण त्याशिवाय पुढील योजना आखण अवघड होतं, शिवाय निळोजीला थोडा जरी अविश्वास निर्माण झाला, तर किल्ल्यावर जाण अवघड होते. त्यामुळे शिवरायांनी योग्य संधीची वाट पाहिली.       संक्राजी ,व पिलाजी यांनी निळोजीची समजूत घालून, शिवरायांना दिवाळी सणाच्या दरम्यान निमंत्रण पाठवलं.निळोजीचा ही विश्वास शिवरायांवर होता, त्यामुळे त्याने निमंत्रिनाचे ताबडतोब पत्र पाठवले. आणि हीच संधी शिवरायांना नामी वाटली. शिवराय ताबडतोब तानाजी, जिवाजी या सवंगडया सह किल्यात दाखल झाले.      निळोजी तसा लोभी व भोगी पद्धतीचा होता. मद्य पिणं महिलांचे नृत्य बगण यातच तो आपलं आयुष्य घालवत होता. संध्याकाळी महिफिल बसल्यावत दिवाळी असल्यामुळे निळोजी ने शिवरायांना घाबरत मद्य देण्याचा पर्यंत केला.पण मात्र शिवारायनी हसत म्हणाले की मद्य आम्हाला वर्ज्य आहे ,पण आम्ही त्या जागी सरबत घेऊ .निळोजी ने ही सरबत आणण्यास आदेश दिला.     संक्राजी व पिलाजी याच दरम्यान शिवरायांकडे बघत होते. योजना आधीच ठरली होती. निळोजी मद...

शिवरायांचा पुरंधर किल्ल्यावरील विजय कपट की गनिमी कावा भाग १

      तोरणा   किल्यांनंतर शिवरायांना थांबणे घातक होते. मागरीच्या तलावात मोती काढण्यासाठी उतरल्यावर जसे चपळाई केल्यावर मोती हातात येतात, त्याच प्रणाने शिवरायांनी चपळाई दाखवण्यास सुरुवात केली.        मुळातच तोरणा जिंखल्यां नंतर ही विजापूरकर स्वस्थ झोपले होते ,याच गोष्टीचा शिवरायांनी फायदा घेण्याचे ठरवले. शिवरायांच्या खेपा रोहिडेश्वर, चाकण या क्षेत्रा मध्ये होऊ लागल्या ,त्याच वेळी त्यांचे लक्ष जवळच असलेल्या पुरंधर किल्यावर गेले. पुरंधर निजामाच्या हाती होता ,आणि किल्लेदार शहाजी महाराजांचे ,व दादोजींचा स्नेही निळकंठराव होते. त्यामुळे सुरुवातीला शिवरायांनी या किल्ल्याकडे फक्त नजर ठेवली .पण जेव्हा निळकंठराव यांच्या मृत्यू झाला, त्यावेळेस मात्र निळकंठराव यांच्या तीन मुलांमध्ये किल्याच्या महसुलीवरून वाद निर्माण झाला, आणि यातच नीलकंठराव यांच्या मोठा मुलगा निळोजी याने किल्यावर कबजा मिळवला. व लहाने दोन भाऊ संक्राजी व पिलाजी या दोघांनाही अधिकार देण्यास नकार दिला.  शिवराय किल्यावर चाललेल्या या  सर्व घडामोडी जाणत होते. निळोजी, संक्राजी व पिलाजी शिवराया...

श्रीरामाच्या चरित्रातुन घ्या ५ मौल्यवान गुण

    भारतात रामायण घडून गेले ,ही काही सामान्य बाब नव्हे,किंवा रामयनाकडे फक्त एक सामान्य धार्मिक, व सांस्कृतिक ग्रंथ म्हणून बघण्या पेक्षा जीवन सांगण्याचा जो मूळ मंत्र श्री यांनी सांगितले आहे ,त्याचे पालन करून आपण स्वतः आपले जीवन समृद्ध करू शकतो .      मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम     श्री राम कोणतेही कार्य करताना ते कार्य एका मर्यादेत राहून करत. त्या कार्याचा अतिरेक किंवा अधिक मिळवण्याची हवस श्री रामात नव्हती. त्यामुळेच श्री रामाला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम म्हटले जाते.     आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींची अपेक्षा तेवढीच बाळगा जी आपल्या मर्यादेत आहे.तिची अधिक अपेक्षा बाळगली तर त्या गोष्टीची माती होण्यास जास्त वेळ लागत नाही.   संयम     संयमी म्हणजे ज्या मध्ये उतावळे स्वभाव म्हणजे कुठलीही गोष्ट ताबडतोब मिळावी ही अपेक्षा नाही असा , श्री राम संयमी होते,कुठलेही कार्य ते संयमी राहून करत. तापत स्वभाव लक्ष्मणाला होता पण राम सतत लक्ष्मणाला संयम बागळण्यास सांगत .     आदर     संपूर्ण रामायणात श्री र...

समर्थ रामदासस्वामीचे छत्रपती शिवरायांना व समाजाला मौल्यवान उपदेश

  यज्ञ तो देव जाणावा,   किंवा, वाळूचे कण रगडीता तेलही गळे,     असे संसारात न राहूनही समाजाला मौल्यवान उपदेश देणारे रामदास स्वामी, भक्ती ,धेर्य आणि हिम्मत या बळावर आपण कोणतेही लक्ष्य साध्य करू शकतो. समर्थ रामदासस्वामीनी जगप्रसिध्द ग्रंथ दासबोध मध्ये तर अनेक तात्विक विचारणा मांडले आहे. हे वरील काही उपदेशावरून लक्षातच आले असेलच.     जागी सर्व सुखी असा कोण आहे,     विचारी मना तूचि शोधूनि पाहे ,   त्यामुळे कर्तव्य महत्वाचे .जन्म का मिळाला? आपले मूळ कर्तव्य काय? तर समाजहित ,समाजासाठी कार्य ,कर्तव्य केले. तर ते ईश्वराला जाऊन मिळते असे अनेक उपदेश समर्थानी छत्रपती शिवरायांना सह छत्रपती संभाजी महाराजांना ही केले आहे.       समर्थांचा जन्म २४ मार्च १६०८ जालना जिल्यातील जांब या गावी झाला. वडिलांचे नाव सूर्याजी ठोसर तर आईचे नाव रेणुबाई, समर्थ लहानपणापासून खोडकर होते .पण एका निश्चित कालावधी नतंर त्यांच्यात बदल होऊ लागला .एकाच जागी निपचित राहून सम्पूर्ण जगाचा विचार करत, आई रेणुबाईना समर्थांचा हा स्वभाव लग्न झाल्यावर ताळ्यावर येईल, असे वाट...

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

छत्रपती शाहू महाराजांच्या कालावधीत श्रीमंत पेशवा पदास अधिक ताकद का प्राप्त झाली?

        छत्रपती  संभाजी महाराज सत्तेवर होते, त्याच कालावधीत औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला. तब्बल नऊ ते दहा वर्षे मुघलांना अडवल्या नंतर फंद फितुरीला ते बळी पडले, व मुघलांच्या कैदेत गेले. शंभूराज्यांचे पुत्र शाहू महाराज लहान असल्या मुळे शंभू राज्यांच्या पत्नी येशुबाई यांनी काही दिवस करोभार बघितला ,पण रायगडाचा किल्लेदार  खंडोजी पिसाळ मुघलांना जाऊन भेटला, त्यामुळे शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई मुघलांच्या ताब्यात गेले.यानंतर गादीवर आले ते शिवरायांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज भरपूर दिवस मुघलांचा सामना केल्यानंतर ते ही वीर गतीला प्राप्त झाले.     शेवटी गादीवर आल्या त्या ताराबाई, भरपूर दिवस मुघलांना आडवणाऱ्या त्या महाराणी बनल्या. वृद्ध झालेला औरंगजेब शेवटी महाराष्ट्रातच त्याने आपली कबर खोदली . औरंगजेबांनंतर बादशहा कोण होणार यासाठी मुघलांमध्ये आप आपसात युद्ध होऊ लागले. याच दरम्यान शाहू महाराज व येसूबाई यांना मुक्त करण्यात आले. हक्काने वारसदार शाहू महाराज होते. पण ताराबाई स्वतः निर्माण केलेल राज्य  शाहू महाराजांना  देण्यास नकार दिला . शेवटी...

अखेर वेडात मराठे वीर दाऊडले सात। वीरांची म्हण प्रचलित

        प्रतापराव   यांनी बहलोलखानास सोडल्यामुळे शिवरायांचे जे खरखरीत पत्र रावांनी वाचले त्यामुळे त्यांचे मन दुःखी झाले  .      शिवरायांनी कल्पना केल्या प्रमाणे खानाने जखमी सर्पप्रमाणे पुन्हा ताकद जुटाऊन स्वराज्यकडे वाटचाल सुरू केली, प्रतापराव यांना खान चालून येत असल्याची वार्ता कळली तेव्हा त्यांना पाश्चाताप ही झाला ,आणि रागही आला .   खान चालून येताना आता मोठी फौज घेऊन येत होता, तो पूर्ण चौताळलेला होता. स्वराज्यातील सर्व गाव तो उध्वस्त करत चालला होता ,मोठी फौज असल्यामुळे ताबडतोब खानाला थांबावं आता प्रतापरावांना अशक्य होतं ,कारण पहिल्या युद्धात  अर्धी सेना दमलेली होती, व नव्या व ताज्या दमाची फौज येण्यास किमान १५ एक दिवस लागणार होते ,प्रतापरावांच्या सहकाऱ्यांनी अत्ता थोडा धीर धरण्यास सांगितलं, पण शिवरायांचे खरखरीत पत्र व बहलोलखानाचा उर्मट पना रावा ना पाहवेना .     खान आला त्यावेळी शेजारच्या जंगलामध्ये राव शिकार करत होते, गुप्तचरणी जेव्हा ही खबर राव याना दिली तेव्हा प्रतापरावांचे रक्त खानाला पाहून सळसळू लागले पुढचा कोणताही वि...

सला काय निमित्त केला? छत्रपती शिवरायांचे प्रतापरवाना खरखरीत बोल

          सरनोबत  प्रतापराव गुजर यांकडे बहलोलखानास पकडण्यास पाठवले यावरून शिवरायांना प्रतापराव यावर पूर्ण विश्वास होता, की ते नक्की ही कामगिरी पार पडतील आणि प्रतापराव यांनीही मोठ्या शौर्याने बहलोलखानास परास्त केले ही वार्ता ऐकून शिवराय फार आनंदीत ही झाले होते,        येथ पर्यंत सर्व ठीक होते पण जेव्हा भावनांच्या आहारी जाऊन  सारनोबत यांनी खानास जीवदान दिले ही गोष्ट शिवरायांना कळली तेव्हा त्यांची तळ पायची आग मस्तकात गेली .त्यांनी एक खरखरीत पत्र प्रतापराव यांना लिहिले, ज्यामध्ये ते प्रतापराव यांना म्हणाले की "तुम्ही स्वराज्याचे सरनोबत तुम्ही तरी अशी चूक करायला नको होती हाती, आलेला शत्रू तुम्ही जाऊ दिला कोणाच्या परवानगीने एकदा आमची रजामंदी घेणं आवश्यक वाटले नाही. हातून सुटलेला शत्रू हा जखमी सापसारखा आहे जो पुन्हा वार करण्यास नक्की येईल सला काय निमित्त केला .आता जो पर्यंत तुम्ही त्या बहलोलखानास पकडून आणत नाही तोपर्यंत आपले मुख सुद्धा आम्हाला दाखवू नका.        खरे पाहिले हातात आलेला शत्रू जर सुटला तर दुसऱ्या वेळेस वार ...

या योजनेने सरनोबत प्रतापराव यांनी बहलोलखानास परास्त केले

        छत्रपती   शिवरायांच्या शूर वीरांच्या तिजोरीत अनेक कल्पक ,धीर जिद्दी सरदार होते जे छत्रपती कडून एखादी कामगिरी मिळाल्यावर उसंत घेत नव्हते .      छत्रपतींचा राज्याभिषेक काही दिवसांवर येऊन ठेपला होता. आणि त्याच मुळे आदिलशाही आणि मुघलशाही एकत्र येणे लाजमी आणि शिवरायांचा प्रताप दाखवण्यास पुरेसे आहे. त्याच मुळे निजामाने बहलोलखानास १२ हजाराच्या फौजेसह छत्रपतीवर चालून जाण्यास सांगितले .ही खबर जेव्हा शिवरायांना कळली .तेव्हा त्यांनी ताबडतोब सरनोबत प्रतापरावांची भेट घेतली. खान उंबरणीत आपला तळ ठोकून बसला होता. आणि मुघलांकडून येणाऱ्या फौजेची वाट पाहत बसला होता. शिवरायांना ही नामी संधी वाटली .आणि प्रतापरावाणी शिवरायांच्या मनातील ही गोष्ट हेरली.   दुष्मन खाऊ द्यायच बलाढ्य होऊ द्यायच इतका वेळ दिल्यावर अंगावर घ्यायचं हे शिवरायांचे तत्व मुताळतच नव्हते .अंगावर येणारच आहे ,तर त्या आधीच दुष्मन ठेचायचा म्हणजे समोरच्याला पुढील हमला करता धाक पडायला हवा .       छत्रपती शिवरायांचा आदेश मिळताच प्रतापरावयांनी  खान जेथे तळ ठोकून बसला होता .त्या...

आपल्या मराठ्यांना हाच शाप विचारानं पेक्षा भावनाच बलवत्तर,।शिवरायांचे प्रतापरावाना वैचारिक बोल

      छत्रपती   शिवरायांच्या कालावधीतील इतिहास जर पहिला तर शिवरायांचे अनेक साथीदार, मावळे,सरदार शिवरायांसाठी जीव की प्राण देण्यास तयार होते. खरे पाहिले तर मराठे खाल्या मिठाला जगात, आणि एकदा वचन दिले तर ते तोडणे म्हणजे मराठ्यांना मृत्यू समान वाटत. शिवाय जुने व काही चुकीच्या  धार्मिक परंपरेत अडकलेल्या आपल्या हिंदूंवर पौराणिक कालावधीतील अनेक गोष्टींचा प्रभाव होता.भावनांच्या भरात अनेक वेळा शक्तीचा वापर अधिक होत होता. त्यामुळे कलियुगातील अनेक राजपटवरील डाव मराठे भावनांच्या बळावरच लढत .ज्याच्या मध्ये भावना बलवत्तर आहे ,तो विचारांचा  वापर करत नाही हे अनेक इतिहासातील उदाहरणावरून लक्षात येते.         राकट स्वभावाचे लक्ष्मण हे  श्री रामाच्या भक्तीती मध्ये राहत ,त्यामुळे अनेक वेळा युद्धच्या वेळी ते भावांच्या भारत युद्ध करत.   ( रावणाचा पुत्र इंद्रजित मायावी होता, हे रामाने समजून सांगितले होते ,तरीही श्री रामाला लालकरल्यामुळे भावनांच्या भरात लक्ष्मण इंद्रजित बरोबर युद्धास गेले, नंतर मायावी शक्तीचा वापर करून लक्ष्मणाला मूर्च्छित होण्या...

महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महाभारतातील कर्ण संबंध ।

    अनेक    संकटे आली.उच्च समजणाऱ्या समाजाने अनेक बद्दतीचा त्रास ही दिला. एवढ काय शिकत असताना दलित आहे, म्हणून वर्गा बाहेर बसवून शिक्षण ही दिले ,पण तरीही हार न मानता शिक्षण घेण्याची व समाज हितासाठी काहीतरी करून दाखवण्याची जी तिव्र इच्छा असणारे महामानव बाबासाहेब आंबेडकर.     महाभारतात अशाच दोन विराचे उद्धाहरण भेटते ते म्हणजे कर्णाचे आणि एकलव्याचे कर्णाला सूत पुत्र म्हणून अनेक वेळा युद्ध प्रशिक्षणा पासून दूर जावे लागले तर ऐकलव्यालाही कमी जातीचे उल्लेखून शिक्षणापासून दूर लोटण्यात आले.पण इतके संकटे येऊनही शेवटी महाभारताचा वीर योद्धा कर्णाला मानण्यात आले.      अशीच काही गोष्ट बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर झाली असे इतिहासाकडे बघून लक्षात येते .बाबासाहेब आंबेडकरही ध्येय वादी होते ,समाजहितासाठी काही करून दाखवण्याची जिद्द बाबासाहेबा मध्ये दिसून येते .     महामानव म्हटले जाणाऱ्या बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू येथील लष्करी छावणीत भिमाबाईंच्या पोटी जन्म झाला .आईचे नाव भीमाबाई असल्या मुळे बाबासाहेबाना भीमा असेही म्हणत. बाबासाहेबां...

भारतीय नुतून वर्ष गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज संभंध

        भारतीय नुतून वर्ष जर मूळ संस्कृती नुसार पाहिले तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच इंग्रजी महिन्या नुसार एप्रिल किंवा मे महिन्यात आपल्या महाराष्ट्राचा लाडका सण गुढीपाडवा आहे ,असे महाराष्ट्रातील जनते वरून दिसून येते .महाराष्ट्रात दिवाळी नंतर या सणाला महत्व आहे .     ह्या सणाचा प्रथम सभंधं जर पहिला तर इंद्र जेव्हा भूतलावर आले.तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी एक काठी व त्यावर नवीन कापड टाकून त्यांचें स्वागत केले, खर म्हणजे इंद्र हा पाऊस, वर्षा याचा देवता त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी शेतकऱ्यांनी असे स्वागत केले होते. आणि त्यानंतर ही एक परंपराच झाली .       म्हणजे पुराण कथेवरून ही गोष्ट स्पष्ठ होते की हा सण खरा शेतकऱ्यां पासून सुरू झाला असावा .       यानंतर एक पौराणिक कथा ज्यामध्ये असा उल्लेख येतो की श्री राम जेव्हा वनवासातुन पुन्हा अयोध्येत आले , तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अयोध्या वासींनी गुढी उभारली व रामाचे स्वागत केले .      गुढी हा शब्द खरा तामिळ मधून आला आहे .गुढी म्हणजे तामिळ मध्ये काठी म्हणून गुढी पा...

शक्ती पेक्षा बुद्धी श्रेष्ठ छत्रपती शिवरायांचे सुरुवाती पासूनचे तत्व आणि सुरुवातीच्या संकटांचा सामना

        प्रत्येक युद्धा मध्ये शक्तिचा वापर करावा लागतो ,हा आपला समज आहे किंवा प्रत्यकाचे तत्व आहे. छत्रपती संभाजी महाराजानी अनेक युद्धा मध्ये तुल्यत्मक रित्या शक्तीचा जास्त वापर केला आहे, हे शंभु राजांचे  तत्व असू शकते.पण जर शिवरायांचा विचार केला .तर त्यांनी अनेक युद्धात तुल्यत्मक रित्या बुद्धीचा वापर केलेला दिसतो .      आर्य चाणक्यनी ही त्यांच्या ग्रंथामध्ये शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ चे तत्व स्वीकारले आहे .आर्य चाणक्य यांनी अनेक युद्धात कुटणीती व युक्ती वापरून नियोजना च्या बळावला युद्ध लढले आहे.       श्री राम ही शांत विचार सारणीचे होते रावण व इतर राक्षसांशी युद्ध करताना श्री राम यांनी संयम व नियोजन बद्ध हे तत्व स्वीकारले असेल असे आढळून येते. जिजामतेचे रामायण ऐकणारे छत्रपती शिवाजी महाराज श्री रामाच्या संयम व शांत तत्वाला सोडणार कसे !       तोरणा जिंखल्या नंतर शिवरायांकडे थांबणे घातक होते .कारण शिवरायांनी निजामविरुद्ध एक प्रकारे बंड पुकारला होता.या मुळे शिवरायांनी संयमित रित्या शेजारील किल्लेदाराशी काहीशी वाटा...

विद्येचे आणि नीतीचे महत्व सांगणाऱ्या महात्मा जोतीराव फुलेंचे तरुण पिढीला दोन शब्द

        महात्मा   जोतीराव फुले जेव्हा तरुण अवस्थेत होते . त्या वेळीच त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या होत्या, त्यांचे असे म्हणणे होते की ,जीवनात विद्या आणि नीती असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो, फक्त त्यासाठी प्रथम जीवनात नीती मूल्यांचा म्हणजेच कुठलेही कार्य करताना नियम, योजना, ज्ञान असणे आवश्यक आहे.   विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली । नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।     हे जोतीराव फुलेंचे प्रेरक काही कवितेच्या पंक्ती जोतीरावांचे म्हणणे होते की ,वेद हा मानवनिर्मित आहे ,आणि त्यातील जाती व्यवस्था ही पूर्णपणे मानव निर्मिती आहे ,त्यांनी अनेक वेळा जाती व्यवस्थेचा कडाडून विरोध केला. या साठी त्यांनी त्यावेळच्या उचवर्गीय समाज म्हणजे ब्राह्मणाच्या विरोधात जाऊन दलित अस्पृश्य समाजाला शिक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. स्वात प्रयत्न करून समाजाच्या विरोधाचा ही सामना केला .       महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म 11 एप्रिल 1627 रोजी कटगुण सातारा जिल्यात झाला .गोविंदराव...

निजाम मुघल व औरंगजेबा सारखे नराधम हिंदू मंदिरे का पाडत होते या मागील कारण

        भारतावर अनेक मुघल शासकांनी राज्य केले,पण त्यांनी राज्य केले म्हणजे सेना व शक्ती जास्त होती, असे मुळातच नाही. ज्यावेळी मराठ्यांनी अटके पार झेंडे फडकवले.त्या मध्ये त्यांनी कमी सैनिकांचा वापर करून युद्ध केले होते.पण जेव्हा मुघल व पाश्चिमात्य अफगाणिस्तान इराण इराक या देशातील म्लेंच्छणी भारतावर अनेक वेळा आक्रमण केले होते. त्यामध्ये भारतीय राजा पुढे ते अनेक वेळा टिकू शकत नव्हते. भारतीय सैनिक निष्ठेने लढत  आणि खाल्या मिठाला ती एकनिष्ठ राहत. तर मुघलांची सेना शरीराने धिप्पाड जरी असली तरीही युद्ध प्रसंगी ती कठीण परिस्थितीचा सामना करू शकत नव्हती. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत टिकून राहणाऱ्या हिंदू राजा पुढे मुघल अनेक वेळा टिकाव धरू शकत नव्हते.यामुळे शेवटी मुघलांनी कपट युद्धाला सुरुवात केली.मुघलांच्या लक्षात आले की ,भारतीय हिंदू सैनिकांची व राज्यांची खरी आस्था ही हिंदू मंदीरावर आहे .शिवाय हिंदू देवावर त्यांचा स्वतःच्या जीवा पेक्षा जास्त विश्वास आहे .आणि त्याच बरोबर हिंदू सर्वात जास्त दान धर्म  सुद्धा मंदिरातच करतात. मुघलांनी भारतावर सत्ता मिळवण्यासाठी हिंदू सं...

शिवरायांनी स्व क्षमता ,नियोजन व, जनतेत स्वराज्याचा विश्वास निर्माण करून स्वराज्याची सुरुवात केली.

        आपण  पिढीजात व वाड वडिलांकडून मिळालेल्या  संपत्तीला आपले जीवन समाधान मानून तिच्यावरच जगण्याचा प्रयत्न करतो. काही जण तीही सांभाळता येत नाही ,आणि काही जण तर चुकीचे मार्गे दुसऱ्याचे अधिपत्य स्वीकारून का होईना पण सम्पत्ती कमावतात.       इतिहासात असे थोडे वीर आहे ,जे सत्ता व सम्पत्ती स्व क्षमतेने कमवतात.पण त्याचा वापर समाज हितासाठीच करतात. श्री राम जेव्हा वनात होतेे,तेव्हा स्व क्षमता वापरूनच त्यांनी मित्र बनवले गोड वक्तृत्वामुळे  सुग्रीवा सारखे अनेक साथीदार मिळवले . नेतृत्व क्षमते मुळे एक भव्य वानर सेना उभी केली .शिवाय श्री रामाने स्व क्षमता अनेक वेळा राक्षसंचा वध करून दर्शविलीच होती .या सर्व माहिती मागे सांगण्याचे तात्पर्य हेच की समाज हितासाठी ज्यांनी कार्य केले त्या सर्वांनी प्रथम स्व क्षमता दर्शवली.      या मध्ये शिवराय मागे कसे राहणार. राजे जेव्हा पुण्यात आले तेव्हा ते लहान होते, काही वर्षांपर्यंत जिजाऊंनीच पुण्याचा करोभार पहिला शिवराय जसे जसे मोठे होऊ लागले तसे तसे त्यांच्यात स्वराज्याचे स्वप्न रुजू लागले. सामान्य...

मावळे शहाजी राज्यांचे पुत्र म्हणून तुमच्या मागे उभे आहे । दादोजींच्या कटू शब्दांचा शिवरायांवर परिणाम

    शिवरायांनी स्वराज्याच्या सुरुवातीला अनेक संकटांचा सामना केला अनेक वेळा अशा काही परस्थितीला सामोरे जावे लागले. ज्याचा सामना आज आपण केल्यावर छाती धडधडून येईल .ज्यावेळी शिवरायांनी तोरणा दादोजींना पूर्ण कल्पना न देता जेव्हा हातगत केला. त्यावेळी दादोजी कोंडदेव यांना अत्यंत दुःख झाले शहाजी राजांनी ही एक वेळी निजामशाही विरुद्ध बंड पुकारला व कमी सैनिक व आप आपसातील वैरी मुळे तो बंड निजामाने मोडून काढला.     आता त्याच पित्याच्या पावलावर पुत्र चालत आहे ,याचा दादोजींना मनोमनी आनंद होता. पण शहाजी राजे सारखच शिवरायांचा बंड मोडून काडू नये ,असे ही दादोजींना वाटत होते .     ज्यावेळी तोरणा शिवरायांनी हास्तगत केला, त्यावेळेस मनोमनी आनंदीत झालेले दादोजी तोरणा मोहिमेविषयी त्यांना काही न सांगितल्या मुळे काही रागात शिवरायांशी बोलू लागले ते  शिवरायांना ते म्हणाले की -"आता तुम्ही मोठे झाला आमची काहीही गरज राहिली नाही, शहाजी राज्यांनी ज्या विश्वासाने येथे पाठवले तो विश्वास आम्ही ठेऊ शकलो नाही .अम्हाला तुमची काळजी शहाजी राज्या बरोबर जे झाले ते तुमच्या बरोबर नाही व्हावे शिवब...

तोरणा किल्ल्या विषयी थोडक्यात माहिती

तोरणा म्हणजेच शिवरायांच्या विजयाचे पाहिले तोरण म्हटले तरी चालेल . हा किल्ला महाराष्ट्रात पुणे जिल्यातील वेल्हे या तालुख्यात आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी या किल्ल्याला कुशीत घेतले आहे. किल्ल्याची उंची १४०६ मी आणि रुंदी ६०४ फिट  .हा किल्ला कधी बांधला या विषयी इतिहासकारांकडे कोठलीही माहिती नाही, पण या किल्ल्यावरील अवषेशांचे निरीक्षण केल्यावर असे लक्षात येते की, शैव पंथीय लोकांचा आत्रम येथे असावा ,जो पुढे जाऊन १४४० ते १४८६  च्या दरम्यान बहामनी मुघलांनी का किल्ला जिंखला त्यानंतर जेव्हा शिवरायांचा कालावधी आला .त्यावेळी शिवरायांनी फक्त काही साथीदारांच्या साहाय्याने हा  किल्ला हस्तगत केला. शिवराय हयात (जिवंत) होते ,तोपर्यंत  हा किल्ला शिवरायांच्या ताब्यात होता .आणि हा किल्ला मोठा असल्या मुळे शिवराय या किल्ल्याला प्रंचड गड पण म्हणत ,पण शिवरायांनी स्वराज्याच्या सुरुवातीला जिंखल्या मुळे स्वराज्याचे तोरण म्हणजेच तोरणा हेच नाव प्रसिद्ध झाले .शिवरायांच्या देहान्त नंतर औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आल्यावर हा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात गेला .पण नंतर औरंगजेबाच्या मृत्यू नंतर मर...

छत्रपती संभाजी महाराज या कारणावरून तरुण असताना मुघलांच्या चंगुळ (बाजूने) गेले होते

      छत्रपती शिवरायांचा छावा म्हटले जाणारे वीर संभाजी महाराज ज्यांनी अखेरच्या श्वासा पर्यंत मुघलांशी लढा दिला.  ज्यांच्या शौर्या पुढे औरंगजेब सुद्धा नमला होता. त्या छ .संभाजी महाराजांवर अनेक वेळा   हा आरोप राज्यांचे विरोधक लावत होते , की संभाजी महाराज युवा अवस्थेत असताना मुघलांना जाऊन मिळाले.पण मूळ तथ्य आणि इतिहासकार मात्र वेगळेच सांगतात .     छत्रपती संभाजी महाराज जेव्हा युवा अवस्थेत होते तेव्हा त्यांचे रक्त सळसळते होते. पण आंतरिक स्वराज्यात शंभू राज्या विरुद्ध मात्र वेगळेच कट शिजत होते.छ संभाजी महाराज जेव्हा नवीन मोहिमेवर निघण्याची तयारी करत तेव्हा अनेक विरोधक ती मोहीम हातातून काढून वेगळ्या किल्ल्यावर फक्त देखरेख करण्यासाठी शिवरायांना सांगून पाठवत. ज्यामुळे संभाजी महाराजांना नवीन काही शिकताच येत नव्हते. त्यामुळे अनेक वेळा त्यांचे शांत मन अस्थिर व्हायचे .    एकदा छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्याच शेजारी असलेल्या काही किल्यांची देखरेख करत होते. शेजारी मुघलांच्या किल्लेदार महाबत खान  होता .जेव्हा त्याला ही गुप्त माहिती कळली की संभा...

हे राज्य रामसारख्या माझ्या थोरल्या बंधूंचे मी फक्त भरता प्रमाणे राज्य संभाळतोय छ. राजाराम महाराजांचे प्रेरक पत्र

   २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजाराम महाराजांचा जन्म रायगडावर झाला छ. राजाराम महाराज म्हणजेच सोयराबाई आणि छत्रपती शिवरायांचे कनिष्ठ पुत्र. जेव्हा संभाजी राजे मुघलांच्या कैदेत गेले , तेव्हा रिक्त छत्रपती चे पद राजाराम महाराजानी भरून काढले .    राजाराम महाराज ही वाघाचाच छावा होता , त्यामुळे शिवराया प्रमाणे ते ही शूर वीर होते .संभाजी महाराज कैदेत असताना    राजाराम महाराजानी कमी धन सैन्य असूनही मुघल ला विरुद्ध सुमारे १२ वर्ष लढा दिला .संताजी आणि धनाजी या वीर योध्यांच्या मदतीने गनिमी काव्या चा वापर करून अनेक वेळा मुघलांना पाणी पाजले .राजाराम महाराज अनेक वेळा मुघलांशी लढा देण्यासाठी स्वतः मोहीम हाती घेत . त्यामुळे सामान्य सरदारामध्ये जोश येत ,राजाराम महाराज धोरणी आणि शांत विचारांचे होते . सुरवातीच्या कालावधीत राजे झाल्या नंतर सोबतीला चुकीच्या सारदारामुळे मद्य च्या आहारी गेले. पण जेव्हा त्यांना शिवरायांचे स्मरण झाले तर वाईट वाटून पुन्हा ते स्वराज्य राखण्यास सुरुवात केली.    औरंगजेबाने जेव्हा वतन  दारी देऊन मराठी सरदारांना स्वतःच्या बाजूला करण्यास सुरु...

संभाजी राज्यांचे बालपणी चे प्रेरक प्रशिक्षण

        शिवराया प्रमाणे शंभू राजे ही बाळपणापासूनच शूर होते. शिवरायांनी ज्या वाघिणी कडून बालपणी रामायण महाभारताचे धडे घेतले तोच वारसा शंभू राजांनाही लाभला होता.       शंभू राजे बालपणापासून तल्लख बुद्दीचे होते .त्यांना कोणतीही गोष्ट एकदा सांगितल्यावर ती त्यांच्या स्मरणात राहत त्यामुळेच ते संस्कृत ,उर्दू ,तमिळ याच बरोबर त्यांना क्षेत्रीय ५ पेक्षा अधिक भाषा येत शंभाजी राज्यांना इंग्रजी भाषेचे सुद्धा ज्ञान होते. या वरून हे लक्षात येते की संभाजी राजे चालू कालावधीत कोणती गोष्ट संकट होऊ शकते याची चाहूल त्यांना लवकर लक्षात येते असे .     सावत्र आई सोयरा बाई अनेक वेळा संभाजी राज्याचे बाल्य मनात काही मतभेदाच्या वाईट गोष्टी सांगत होत्या. असे अनेक इतिहासातील घटकामध्ये आढळून येते. त्यात शंभू राज्यांचे मन लहान पणापासूनच हळवे होते. शंभू राज्यांचे बालपणापासूनचे वैरी ज्यांना संभाजी राजे शिवराया नंतर छत्रपती होऊ नये असे वाटत होते,त्यांनी सतत संभाजी राज्यांचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. पण वाघिणीचे प्रशिक्षण घेणारा याला भाळणार तो कसा.     ...

३ एप्रिल १६८० इतिहासातील एक काळा दिवस ।शिवाजी महाराज पुण्यतिथी दिन

      इतिहासात अनेक वीर योद्धे राजे महाराजे होऊन गेले आणि काळाच्या काळ्या दरीत समाहून पण गेले .पण इतिहासाने असेही काही योद्धे बघितले आहे जे इतिहासात अजर अजरामर तर झालेच, आणि भविष्यात त्यांचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा शरीरावर क्षहारे उभे राहिल्या शिवाय राहणार नाही       त्या पैकी शिवराय आहे यात काही दुमत नाही हेच खरे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्ष मध्ये नावाजलेले अमर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वर्ग वाशी झाले तेव्हा हिंदू स्वराज्य निर्माण करणारा भारताचा खरा वीर इहलोक सोडून गेले याचा संपूर्ण भारत वर्षाला दुःख होते.     शिवराय जेव्हा मृत्यू च्या दारात होते तेव्हाही त्यांना स्वराज्य आणि सामान्य जनतेचीच काळजी होती. संभाजी महाराज नेटकेच मुघलांच्या चंगुळ मधून सुटून आले होते ,शंभूराजे बरोबर शेवटी  खुप बोलावं असही शिवरायांना वाटत होतं.      शिवराय फक्त संसारच करून नाही गेले, तर तुकाराम महाराज रामदास स्वामी च्या सानिध्यात जे परमार्थ रुपी धन तेही जोपासले होते .प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे सर्वात श्रेष्ठ तो भगवंत आहे. ब...

रंगपंचमी आणि त्यामागील भारतीय संस्कृती

  रंगपंचमी भारत खंडात प्राचीन काळापासूनच हा सण साजरा केल्याचे अनेक पौराणिक कथा मधून आढळून येते जसे राधा कृष्ण जेव्हा मथुरेत होते त्या ठिकाणी गोप गोपिका (जे दूध जन्य प्राण्यांचे पालन करायचे )त्या कालावधी तेथील प्रजेने हा सण सुरू केला असावा असा उल्लेख अनेक ग्रंथामध्ये आदळून येतो त्याच बरोबर भगवान कृष्ण आणि राधा जेव्हा बाल्य अवस्थेत होते तेव्हा रास क्रीडा म्हणजेच बाल्य अवस्थेतील खेळने (ज्याचा अर्थ आज चुकीच्या अर्थाने घेतला जातो) या खेळामध्ये रंग लावणे आनंद उत्सव साजरा करणे असे अनेक क्रीडा कृष्ण भगवान करत असत त्यामुळेच पुढे जाऊन हा सण वसंत पंचमी (उन्हाळ्यात साजरा केला जाणारा सण ) म्हणून रंग पंचमी म्हणून हा सण नाव रुपास आला असावा.    त्याच बरोबर या सणाला प्रेमाचे प्रतीक म्हणून सुद्धा संबोधले जाते .ज्यामध्ये माता पार्वती आणि शंकर भगवान वसंत पंचमीच्या दिवशीच प्रथम दर्शी एक मेकांना भेटले होते . रंगपंचमी हा सण प्रत्यक राज्यात विविध पद्धतीने साजरा केला जातो .महाराष्ट्रात या रंगपंचमीला गोड पुरण पोळीचा स्वयंपाक केला जातो .तर राजस्थानात नृत्य करून हा सण साजरा केला जातो. तर उत्तर प्रदे...