मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिवरायांनी स्व क्षमता ,नियोजन व, जनतेत स्वराज्याचा विश्वास निर्माण करून स्वराज्याची सुरुवात केली.


 


      आपण  पिढीजात व वाड वडिलांकडून मिळालेल्या  संपत्तीला आपले जीवन समाधान मानून तिच्यावरच जगण्याचा प्रयत्न करतो. काही जण तीही सांभाळता येत नाही ,आणि काही जण तर चुकीचे मार्गे दुसऱ्याचे अधिपत्य स्वीकारून का होईना पण सम्पत्ती कमावतात.
      इतिहासात असे थोडे वीर आहे ,जे सत्ता व सम्पत्ती स्व क्षमतेने कमवतात.पण त्याचा वापर समाज हितासाठीच करतात. श्री राम जेव्हा वनात होतेे,तेव्हा स्व क्षमता वापरूनच त्यांनी मित्र बनवले गोड वक्तृत्वामुळे  सुग्रीवा सारखे अनेक साथीदार मिळवले . नेतृत्व क्षमते मुळे एक भव्य वानर सेना उभी केली .शिवाय श्री रामाने स्व क्षमता अनेक वेळा राक्षसंचा वध करून दर्शविलीच होती .या सर्व माहिती मागे सांगण्याचे तात्पर्य हेच की समाज हितासाठी ज्यांनी कार्य केले त्या सर्वांनी प्रथम स्व क्षमता दर्शवली.
     या मध्ये शिवराय मागे कसे राहणार. राजे जेव्हा पुण्यात आले तेव्हा ते लहान होते, काही वर्षांपर्यंत जिजाऊंनीच पुण्याचा करोभार पहिला शिवराय जसे जसे मोठे होऊ लागले तसे तसे त्यांच्यात स्वराज्याचे स्वप्न रुजू लागले. सामान्य जनतेचे त्रास बघितल्यावर स्वराज्या विषयी प्रेरित करण्यास शिवरायांनी सुरुवात केली.मावळ्यांना स्वतासोबत करण्यास सोबती बनवण्यास शिवरायांनी सुरुवात केली. आणि जेव्हा त्यांनी पहिला किल्ला जिंकला तो पूर्ण सेना विरहित फक्त नियोजन आणि गनिमी काव्याच्या साह्याने तोरणा जिंखला होता. यामध्ये त्यांनी शाहजी राज्यांनी दिलेल्या कुठल्याही सेनेचा वापर केला नव्हता. शिवाय राज्यांच्या मागे जे मावळे उभे होते. ते सर्व यानंतर ही शिवरायांनी ज्या ज्या नवीन मोहिमा हातात घेतल्या , त्या सर्व नियोजन आणि सामोपचारानेच विजय प्रस्थापित केला. आणि त्यानंतर शिवरायांची वाटचाल शहाजीराजेच्या ही डोळ्यात आणि मनात भरून आली.
      यावरून लक्षात येते की जो पर्यंत तुम्ही स्वतःच जग निर्माण करत नाही, तो पर्यंत इतिहास घडत नाही.
    शिवरायांनी जीही सत्ता संपत्ती कमवली ती सर्व समाज हितासाठीच ना की स्व हितासाठी हे मात्र नक्की.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...