जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
आपण पिढीजात व वाड वडिलांकडून मिळालेल्या संपत्तीला आपले जीवन समाधान मानून तिच्यावरच जगण्याचा प्रयत्न करतो. काही जण तीही सांभाळता येत नाही ,आणि काही जण तर चुकीचे मार्गे दुसऱ्याचे अधिपत्य स्वीकारून का होईना पण सम्पत्ती कमावतात.
इतिहासात असे थोडे वीर आहे ,जे सत्ता व सम्पत्ती स्व क्षमतेने कमवतात.पण त्याचा वापर समाज हितासाठीच करतात. श्री राम जेव्हा वनात होतेे,तेव्हा स्व क्षमता वापरूनच त्यांनी मित्र बनवले गोड वक्तृत्वामुळे सुग्रीवा सारखे अनेक साथीदार मिळवले . नेतृत्व क्षमते मुळे एक भव्य वानर सेना उभी केली .शिवाय श्री रामाने स्व क्षमता अनेक वेळा राक्षसंचा वध करून दर्शविलीच होती .या सर्व माहिती मागे सांगण्याचे तात्पर्य हेच की समाज हितासाठी ज्यांनी कार्य केले त्या सर्वांनी प्रथम स्व क्षमता दर्शवली.
या मध्ये शिवराय मागे कसे राहणार. राजे जेव्हा पुण्यात आले तेव्हा ते लहान होते, काही वर्षांपर्यंत जिजाऊंनीच पुण्याचा करोभार पहिला शिवराय जसे जसे मोठे होऊ लागले तसे तसे त्यांच्यात स्वराज्याचे स्वप्न रुजू लागले. सामान्य जनतेचे त्रास बघितल्यावर स्वराज्या विषयी प्रेरित करण्यास शिवरायांनी सुरुवात केली.मावळ्यांना स्वतासोबत करण्यास सोबती बनवण्यास शिवरायांनी सुरुवात केली. आणि जेव्हा त्यांनी पहिला किल्ला जिंकला तो पूर्ण सेना विरहित फक्त नियोजन आणि गनिमी काव्याच्या साह्याने तोरणा जिंखला होता. यामध्ये त्यांनी शाहजी राज्यांनी दिलेल्या कुठल्याही सेनेचा वापर केला नव्हता. शिवाय राज्यांच्या मागे जे मावळे उभे होते. ते सर्व यानंतर ही शिवरायांनी ज्या ज्या नवीन मोहिमा हातात घेतल्या , त्या सर्व नियोजन आणि सामोपचारानेच विजय प्रस्थापित केला. आणि त्यानंतर शिवरायांची वाटचाल शहाजीराजेच्या ही डोळ्यात आणि मनात भरून आली.
यावरून लक्षात येते की जो पर्यंत तुम्ही स्वतःच जग निर्माण करत नाही, तो पर्यंत इतिहास घडत नाही.
शिवरायांनी जीही सत्ता संपत्ती कमवली ती सर्व समाज हितासाठीच ना की स्व हितासाठी हे मात्र नक्की.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा