मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शक्ती पेक्षा बुद्धी श्रेष्ठ छत्रपती शिवरायांचे सुरुवाती पासूनचे तत्व आणि सुरुवातीच्या संकटांचा सामना


 


     प्रत्येक युद्धा मध्ये शक्तिचा वापर करावा लागतो ,हा आपला समज आहे किंवा प्रत्यकाचे तत्व आहे. छत्रपती संभाजी महाराजानी अनेक युद्धा मध्ये तुल्यत्मक रित्या शक्तीचा जास्त वापर केला आहे, हे शंभु राजांचे  तत्व असू शकते.पण जर शिवरायांचा विचार केला .तर त्यांनी अनेक युद्धात तुल्यत्मक रित्या बुद्धीचा वापर केलेला दिसतो .

     आर्य चाणक्यनी ही त्यांच्या ग्रंथामध्ये शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ चे तत्व स्वीकारले आहे .आर्य चाणक्य यांनी अनेक युद्धात कुटणीती व युक्ती वापरून नियोजना च्या बळावला युद्ध लढले आहे.

      श्री राम ही शांत विचार सारणीचे होते रावण व इतर राक्षसांशी युद्ध करताना श्री राम यांनी संयम व नियोजन बद्ध हे तत्व स्वीकारले असेल असे आढळून येते.

जिजामतेचे रामायण ऐकणारे छत्रपती शिवाजी महाराज श्री रामाच्या संयम व शांत तत्वाला सोडणार कसे !   

   तोरणा जिंखल्या नंतर शिवरायांकडे थांबणे घातक होते .कारण शिवरायांनी निजामविरुद्ध एक प्रकारे बंड पुकारला होता.या मुळे शिवरायांनी संयमित रित्या शेजारील किल्लेदाराशी काहीशी वाटाघाटी करून  तर काहींना आर्थिक लालूच दाखवून तर काहींशी कुटणीती खेळून अनेक किल्यानां स्वतःच्या बाजूने केले .

    त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात सुरुवातीला आर्थिक अडचणी येतात, किंवा अनेक अडचणी येतात ज्या शिवरयांच्याही आयुष्यात आल्या पन त्या संकतावरही त्यांनी मार्ग शोधला त्यावर त्यांनी मात करण्याचा प्रयत्न केला .आणि आपला यशाचा मार्ग मोकळा केला .

    त्यामुळे आपल्या आयुष्यात अनेक संकटे असतील आणि आपल्याला आपले स्वप्न आपले ध्येय पूर्ण करायचे असेल तर नक्कीच शिवरायांचे चरित्र आठवावे म्हणजेच आपले संकट त्यांच्या संकटा पुढे इवलेसे दिसेल आणि त्यांनी वापरल्या योजना आपल्याला कमी येतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...