मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

विद्येचे आणि नीतीचे महत्व सांगणाऱ्या महात्मा जोतीराव फुलेंचे तरुण पिढीला दोन शब्द


 

      महात्मा  जोतीराव फुले जेव्हा तरुण अवस्थेत होते . त्या वेळीच त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या होत्या, त्यांचे असे म्हणणे होते की ,जीवनात विद्या आणि नीती असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो, फक्त त्यासाठी प्रथम जीवनात नीती मूल्यांचा म्हणजेच कुठलेही कार्य करताना नियम, योजना, ज्ञान असणे आवश्यक आहे.

  विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

    हे जोतीराव फुलेंचे प्रेरक काही कवितेच्या पंक्ती जोतीरावांचे म्हणणे होते की ,वेद हा मानवनिर्मित आहे ,आणि त्यातील जाती व्यवस्था ही पूर्णपणे मानव निर्मिती आहे ,त्यांनी अनेक वेळा जाती व्यवस्थेचा कडाडून विरोध केला. या साठी त्यांनी त्यावेळच्या उचवर्गीय समाज म्हणजे ब्राह्मणाच्या विरोधात जाऊन दलित अस्पृश्य समाजाला शिक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. स्वात प्रयत्न करून समाजाच्या विरोधाचा ही सामना केला .

      महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म 11 एप्रिल 1627 रोजी कटगुण सातारा जिल्यात झाला .गोविंदराव फुले हे त्यांच्या वडिलांचे नाव, तर चिमनाबाई हे त्यांच्या आईचे नाव, जोतीराव यांचे मूळ आडनाव गोरे होते .पण वडील आणि त्यांचे चुलते फुले विकत त्यामुळे त्यांचे आडनाव फुले असे झाले .जोतीराव शाळेत हुशार आणि चपळ होते .वाचण्याचा त्यांना खुप छंद होता. जोतिराव यांच्यावर शिवरायांचा प्रभाव होता .त्यांनी त्यांच्या अनेक ग्रंथा मध्ये शिवरायांचे विचार प्रगत केले आहे.

   वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्री बाई यांच्याही झाला .शिक्षणाची पराकोटीची आवड असणाऱ्या सावित्री बाईंना स्वतः जोतिरावांनी शिक्षण दिले .  

    समाजात स्त्री शिक्षण किती महत्वाचे आहे हे जोतीरावांना अडाणी राहिल्या मुळे स्त्रीयावर किती अत्याचार होतात यावरून लक्षात आले .पत्नी बरोबर संसार करायचा सोडून स्त्रियांसाठी समाज्याच्या विरोधात जाऊन शाळा उघडण्याचा धाडसी  निर्णय त्यांनी घेतला. आणि मुली साठी जी पहिली शाळा उघली तेथील पाहल्या महिला शिक्षिका होत्या सावित्री बाई. या नंतर शाळा बंद पाडण्यासाठी जो त्रास दिला तो सर्वाना माहीतच आहे.

       महात्मा जोतीराव परखड विचारांचे होते. समाज समान आहे ,कोणीही उच्च नाही कोणीही नीच नाही ,देवाने सर्वाना समान निर्माण केले आहे .सर्वांनी एकत्रित गुण्यागोविंदाणे राहावे अशी इच्छा जोतीरावांची होती .

   अशा थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...