मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

विद्येचे आणि नीतीचे महत्व सांगणाऱ्या महात्मा जोतीराव फुलेंचे तरुण पिढीला दोन शब्द


 

      महात्मा  जोतीराव फुले जेव्हा तरुण अवस्थेत होते . त्या वेळीच त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या होत्या, त्यांचे असे म्हणणे होते की ,जीवनात विद्या आणि नीती असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो, फक्त त्यासाठी प्रथम जीवनात नीती मूल्यांचा म्हणजेच कुठलेही कार्य करताना नियम, योजना, ज्ञान असणे आवश्यक आहे.

  विद्येविना मती गेली ।

मतीविना नीती गेली ।

नीतीविना गती गेली ।

गतीविना वित्त गेले ।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

    हे जोतीराव फुलेंचे प्रेरक काही कवितेच्या पंक्ती जोतीरावांचे म्हणणे होते की ,वेद हा मानवनिर्मित आहे ,आणि त्यातील जाती व्यवस्था ही पूर्णपणे मानव निर्मिती आहे ,त्यांनी अनेक वेळा जाती व्यवस्थेचा कडाडून विरोध केला. या साठी त्यांनी त्यावेळच्या उचवर्गीय समाज म्हणजे ब्राह्मणाच्या विरोधात जाऊन दलित अस्पृश्य समाजाला शिक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. स्वात प्रयत्न करून समाजाच्या विरोधाचा ही सामना केला .

      महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्म 11 एप्रिल 1627 रोजी कटगुण सातारा जिल्यात झाला .गोविंदराव फुले हे त्यांच्या वडिलांचे नाव, तर चिमनाबाई हे त्यांच्या आईचे नाव, जोतीराव यांचे मूळ आडनाव गोरे होते .पण वडील आणि त्यांचे चुलते फुले विकत त्यामुळे त्यांचे आडनाव फुले असे झाले .जोतीराव शाळेत हुशार आणि चपळ होते .वाचण्याचा त्यांना खुप छंद होता. जोतिराव यांच्यावर शिवरायांचा प्रभाव होता .त्यांनी त्यांच्या अनेक ग्रंथा मध्ये शिवरायांचे विचार प्रगत केले आहे.

   वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा विवाह सावित्री बाई यांच्याही झाला .शिक्षणाची पराकोटीची आवड असणाऱ्या सावित्री बाईंना स्वतः जोतिरावांनी शिक्षण दिले .  

    समाजात स्त्री शिक्षण किती महत्वाचे आहे हे जोतीरावांना अडाणी राहिल्या मुळे स्त्रीयावर किती अत्याचार होतात यावरून लक्षात आले .पत्नी बरोबर संसार करायचा सोडून स्त्रियांसाठी समाज्याच्या विरोधात जाऊन शाळा उघडण्याचा धाडसी  निर्णय त्यांनी घेतला. आणि मुली साठी जी पहिली शाळा उघली तेथील पाहल्या महिला शिक्षिका होत्या सावित्री बाई. या नंतर शाळा बंद पाडण्यासाठी जो त्रास दिला तो सर्वाना माहीतच आहे.

       महात्मा जोतीराव परखड विचारांचे होते. समाज समान आहे ,कोणीही उच्च नाही कोणीही नीच नाही ,देवाने सर्वाना समान निर्माण केले आहे .सर्वांनी एकत्रित गुण्यागोविंदाणे राहावे अशी इच्छा जोतीरावांची होती .

   अशा थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.