मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

संभाजी राज्यांचे बालपणी चे प्रेरक प्रशिक्षण


       

शिवराया प्रमाणे शंभू राजे ही बाळपणापासूनच शूर होते. शिवरायांनी ज्या वाघिणी कडून बालपणी रामायण महाभारताचे धडे घेतले तोच वारसा शंभू राजांनाही लाभला होता. 

     शंभू राजे बालपणापासून तल्लख बुद्दीचे होते .त्यांना कोणतीही गोष्ट एकदा सांगितल्यावर ती त्यांच्या स्मरणात राहत त्यामुळेच ते संस्कृत ,उर्दू ,तमिळ याच बरोबर त्यांना क्षेत्रीय ५ पेक्षा अधिक भाषा येत शंभाजी राज्यांना इंग्रजी भाषेचे सुद्धा ज्ञान होते. या वरून हे लक्षात येते की संभाजी राजे चालू कालावधीत कोणती गोष्ट संकट होऊ शकते याची चाहूल त्यांना लवकर लक्षात येते असे .

    सावत्र आई सोयरा बाई अनेक वेळा संभाजी राज्याचे बाल्य मनात काही मतभेदाच्या वाईट गोष्टी सांगत होत्या. असे अनेक इतिहासातील घटकामध्ये आढळून येते. त्यात शंभू राज्यांचे मन लहान पणापासूनच हळवे होते. शंभू राज्यांचे बालपणापासूनचे वैरी ज्यांना संभाजी राजे शिवराया नंतर छत्रपती होऊ नये असे वाटत होते,त्यांनी सतत संभाजी राज्यांचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. पण वाघिणीचे प्रशिक्षण घेणारा याला भाळणार तो कसा.

      संभाजी राजे शारीरिक यष्टी ने मजबूत होते. ते अनेक युद्ध कौशल्या मध्ये प्रवीण होते प्राथमिक प्रशिक्षण त्यांना जिजाऊ आणि महालातील अनेक शिवरायांच्या सहकर्या कडून मिळाले.

    शिवाय संभाजी राजांना बालपणापासून च एक प्रकारे प्रत्यक्षित ज्ञान (practical knowledge ) मग ते राजा जयसिंग बरोबर भेट असो किंवा आग्रा भेट या मधून संभाजी राज्यांना भविष्यातील अनेक डावपेज शिकण्यास मिळाले.

     खरे पाहिले तर अनेक गोष्टी संभाजी राज्यांनी स्वतःहून आत्मसात केल्या आहेत मग ते व्यवहारिक ज्ञान असो राजकीय डावपेज असो युद्ध नियोजन असो किंवा पारमार्थिक ज्ञान .संभाजी राजे बालपणीच संस्कृत शिकल्यामुळे पुढे त्यांनी अनेक संस्कृत श्लोक लिहिले  संभाजी राज्यांना बालपणापासूनच नृत्य गायन या मध्येही रस होता .आणि हे सर्व ते स्वतःहून शिकले.

    स्वतःहून शिकण्याची प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या संभाजी राज्या कडून आपण बाल्यावस्थेतीअनेक गुण शिकू शकतो संकटे कितीही असो पण मनातील प्रबळ इच्छाशक्ती संपू द्यायची नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...