मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

संभाजी राज्यांचे बालपणी चे प्रेरक प्रशिक्षण


       

शिवराया प्रमाणे शंभू राजे ही बाळपणापासूनच शूर होते. शिवरायांनी ज्या वाघिणी कडून बालपणी रामायण महाभारताचे धडे घेतले तोच वारसा शंभू राजांनाही लाभला होता. 

     शंभू राजे बालपणापासून तल्लख बुद्दीचे होते .त्यांना कोणतीही गोष्ट एकदा सांगितल्यावर ती त्यांच्या स्मरणात राहत त्यामुळेच ते संस्कृत ,उर्दू ,तमिळ याच बरोबर त्यांना क्षेत्रीय ५ पेक्षा अधिक भाषा येत शंभाजी राज्यांना इंग्रजी भाषेचे सुद्धा ज्ञान होते. या वरून हे लक्षात येते की संभाजी राजे चालू कालावधीत कोणती गोष्ट संकट होऊ शकते याची चाहूल त्यांना लवकर लक्षात येते असे .

    सावत्र आई सोयरा बाई अनेक वेळा संभाजी राज्याचे बाल्य मनात काही मतभेदाच्या वाईट गोष्टी सांगत होत्या. असे अनेक इतिहासातील घटकामध्ये आढळून येते. त्यात शंभू राज्यांचे मन लहान पणापासूनच हळवे होते. शंभू राज्यांचे बालपणापासूनचे वैरी ज्यांना संभाजी राजे शिवराया नंतर छत्रपती होऊ नये असे वाटत होते,त्यांनी सतत संभाजी राज्यांचे मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला. पण वाघिणीचे प्रशिक्षण घेणारा याला भाळणार तो कसा.

      संभाजी राजे शारीरिक यष्टी ने मजबूत होते. ते अनेक युद्ध कौशल्या मध्ये प्रवीण होते प्राथमिक प्रशिक्षण त्यांना जिजाऊ आणि महालातील अनेक शिवरायांच्या सहकर्या कडून मिळाले.

    शिवाय संभाजी राजांना बालपणापासून च एक प्रकारे प्रत्यक्षित ज्ञान (practical knowledge ) मग ते राजा जयसिंग बरोबर भेट असो किंवा आग्रा भेट या मधून संभाजी राज्यांना भविष्यातील अनेक डावपेज शिकण्यास मिळाले.

     खरे पाहिले तर अनेक गोष्टी संभाजी राज्यांनी स्वतःहून आत्मसात केल्या आहेत मग ते व्यवहारिक ज्ञान असो राजकीय डावपेज असो युद्ध नियोजन असो किंवा पारमार्थिक ज्ञान .संभाजी राजे बालपणीच संस्कृत शिकल्यामुळे पुढे त्यांनी अनेक संस्कृत श्लोक लिहिले  संभाजी राज्यांना बालपणापासूनच नृत्य गायन या मध्येही रस होता .आणि हे सर्व ते स्वतःहून शिकले.

    स्वतःहून शिकण्याची प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या संभाजी राज्या कडून आपण बाल्यावस्थेतीअनेक गुण शिकू शकतो संकटे कितीही असो पण मनातील प्रबळ इच्छाशक्ती संपू द्यायची नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...