मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

रंगपंचमी आणि त्यामागील भारतीय संस्कृती


  रंगपंचमी भारत खंडात प्राचीन काळापासूनच हा सण साजरा केल्याचे अनेक पौराणिक कथा मधून आढळून येते जसे राधा कृष्ण जेव्हा मथुरेत होते त्या ठिकाणी गोप गोपिका (जे दूध जन्य प्राण्यांचे पालन करायचे )त्या कालावधी तेथील प्रजेने हा सण सुरू केला असावा असा उल्लेख अनेक ग्रंथामध्ये आदळून येतो त्याच बरोबर भगवान कृष्ण आणि राधा जेव्हा बाल्य अवस्थेत होते तेव्हा रास क्रीडा म्हणजेच बाल्य अवस्थेतील खेळने (ज्याचा अर्थ आज चुकीच्या अर्थाने घेतला जातो) या खेळामध्ये रंग लावणे आनंद उत्सव साजरा करणे असे अनेक क्रीडा कृष्ण भगवान करत असत त्यामुळेच पुढे जाऊन हा सण वसंत पंचमी (उन्हाळ्यात साजरा केला जाणारा सण ) म्हणून रंग पंचमी म्हणून हा सण नाव रुपास आला असावा.

   त्याच बरोबर या सणाला प्रेमाचे प्रतीक म्हणून सुद्धा संबोधले जाते .ज्यामध्ये माता पार्वती आणि शंकर भगवान वसंत पंचमीच्या दिवशीच प्रथम दर्शी एक मेकांना भेटले होते .

रंगपंचमी हा सण प्रत्यक राज्यात विविध पद्धतीने साजरा केला जातो .महाराष्ट्रात या रंगपंचमीला गोड पुरण पोळीचा स्वयंपाक केला जातो .तर राजस्थानात नृत्य करून हा सण साजरा केला जातो. तर उत्तर प्रदेशात रंग उडवून हा सण साजरा केला जातो.

   हा सण साजरा करताना सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो.

पण मूळ रंग पंचमीत उन्हाळ्यातील शरीराला थंड ठेवतील अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. त्या मुळे सर्व वाचक प्रेमींना आग्रहाचे म्हणणे की पाण्याची नासधूस करण्या पेक्षा शरीराला व मनाला थंड ठेवतील अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर करून ही रंग पंचमी साजरी करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...