मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

हे राज्य रामसारख्या माझ्या थोरल्या बंधूंचे मी फक्त भरता प्रमाणे राज्य संभाळतोय छ. राजाराम महाराजांचे प्रेरक पत्र

  

२४ फेब्रुवारी १६७० रोजी राजाराम महाराजांचा जन्म रायगडावर झाला छ. राजाराम महाराज म्हणजेच सोयराबाई आणि छत्रपती शिवरायांचे कनिष्ठ पुत्र. जेव्हा संभाजी राजे मुघलांच्या कैदेत गेले , तेव्हा रिक्त छत्रपती चे पद राजाराम महाराजानी भरून काढले .

   राजाराम महाराज ही वाघाचाच छावा होता , त्यामुळे शिवराया प्रमाणे ते ही शूर वीर होते .संभाजी महाराज कैदेत असताना    राजाराम महाराजानी कमी धन सैन्य असूनही मुघल ला विरुद्ध सुमारे १२ वर्ष लढा दिला .संताजी आणि धनाजी या वीर योध्यांच्या मदतीने गनिमी काव्या चा वापर करून अनेक वेळा मुघलांना पाणी पाजले .राजाराम महाराज अनेक वेळा मुघलांशी लढा देण्यासाठी स्वतः मोहीम हाती घेत . त्यामुळे सामान्य सरदारामध्ये जोश येत ,राजाराम महाराज धोरणी आणि शांत विचारांचे होते . सुरवातीच्या कालावधीत राजे झाल्या नंतर सोबतीला चुकीच्या सारदारामुळे मद्य च्या आहारी गेले. पण जेव्हा त्यांना शिवरायांचे स्मरण झाले तर वाईट वाटून पुन्हा ते स्वराज्य राखण्यास सुरुवात केली.

   औरंगजेबाने जेव्हा वतन  दारी देऊन मराठी सरदारांना स्वतःच्या बाजूला करण्यास सुरुवात केली ,तेव्हा शिवरायांनी बंध केलेली वतनदारी राजाराम महाराजाना पुन्हा सुरुवात करावी लागली.

     राजाराम महाराजांनी  आपल्या किल्ल्या वरील सरदारांना स्फुर्ती मिळावी म्हणून  आपल्या पत्रातून अनेक वेळा ते सारदारांना सांगत की हे राज्य माझा रामा सारख्या मोठा भाऊ संभाजी महाराजांचे आहे मी फक्त भरता प्रमाणे हे राज्य संभाळतोय असे विचार राजाराम महाराजांचे होते.

      १२ वर्ष मुघलांशी झुंज देणाऱ्या या विराने ३ मार्च १७०० रोजी सिंहगडावर अखेरचा श्वास घेतला.

(आणि ४ एप्रिल ला त्यांची पुण्यतिथी साजरी केली)

      आशा सामर्थ्य शाली योध्यास आपल्या सर्वांकडून विनम्र अभिवादन.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...