२६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
माघ शु १५ (२७ फेब्रुवारी )कवी कुसुमाग्रज यांच्या जन्म दिना निमित्ताने का होईना आपण एक दिवस मराठी चे महत्व समजून घेण्याचा प्रयन्त करतो. नाहीतर इतर वेळेस आपण इंग्रजीलाच महत्त्व देत बसतो, नक्कीच इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले आहे पण आईच्या दुधा शिवाय जगू तरी कसे शकू . याच ठिकाणी जर आपण कर्नाटक, तामिळ लोक आपल्या भाषेला किती महत्व देतात हे लक्षात .येईल फ्रांस मध्ये तर लोक इंग्रजीला फक्त परदेशातील लोकांशी संवाद साधण्याचे साधन मानतात नाहीतर ज्याला फ्रांस भाषा येत नाही त्याला नोकरी नाही असा तेथील सरकारचा कायदाच आहे. आणि आपल्या देशात ज्याला इंग्रजी येते तोच जसा उच्च शिक्षित. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणते - माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता ते ही पैज जिंखे ज्या ज्ञानेश्वर माऊलीच्या ओवीवर विश्व स्तरावर संशोधन केले जाते त्या मराठी तरी आपण कमी समजायला नको . आज पासूनच आपण आपल्या मुलांना इंग्रजीचे बळजबरीचे शिक्षण देण्या पेक्षा मराठीतून व्यवहारी उदयोग (व्यवसाई) ज्ञान दिले हवे कारण लाभले आम्हास भाग्य बो...