मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शहाजीराजांचे आज्ञाधारक पुत्र शिवराय

 


             प्रत्येक पित्याला वाटते की आपल्या पुत्राने आपल्या आज्ञात रहावे. पण शिवराय असे कसे की ज्या वेळी आदिलशहाने शहाजीराजांना कपटाने कैद केले, आणि त्यांना खाल्या मिठाची आन देऊन बळजबरीने शिवरायांना सर्व जिंखलेले किल्ले देऊन समर्पण करण्यास ये असा मजकूर लिहिण्यास शहाजीराजांना सांगितले. आणि नाईलाजाने शहाजीराजांना ही तसे करावे लागले. आणि एवढे शहाजीराजांचे पत्र आल्यावरही शिवरायांनी आपले हल्ले आदिलशाही किल्यावर चालूच ठेवले. त्याचे कारण असे होते की, शहाजीराजांना ही आंतरिक मनातून शिवरायांच्या कार्याचे कौतुक वाटत होते. व ते आशीर्वाद ही देत होते.  कारण जे शहाजीराजांना करायचे होते. पण फंद फितुरीमुळे झाले नाही ते स्वराज्याचे स्वप्न आपला पुत्र करत होता ,याचा त्यांना अभिमानच होता. आणि शिवराय मनातून हे जाणतच होते. आणि शहाजी राजांनी ही त्या पत्रातून सांकेतिक भाषेत शिवरायांना आदेशच दिला होता.

           शिवराय किती आज्ञाधारक होते याचे अजून एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी नेस्तनाबूत झालेले पुणे शिवरायांना पुन्हा बसवायला सांगितले आणि एक उध्वस्त प्रदेश आपल्याला जहागिरी साठी याचा विचारही न करता पित्याची आज्ञा शिरासावंद्य मानली .

            पूर्ण इतिहासातून फक्त एका पुत्रा नेच आपल्या पित्याचे स्वप्न पूर्ण केले, कारण शहाजी राजांचे ही स्वप्न स्वराज्य होते ,आणि ते शिवरायांनी पूर्ण केले होते.

 वरील माहिती वरून एवढेच तात्पर्य लक्षात येते की-

१ शिवराय शहाजीराजांची आज्ञा फक्त बाहेरून (physicality) ऐकत नव्हते, तर आंतरिक (intarnaly) मनातून ऐकत होते.

2.जे आपण करू शकलो नाही ते आपल्या पुत्राने करून दाखवले.

आजच्या काळात आपल्या कष्टकरी पित्याची किती आज्ञा मनापासून मानतो, हे शिवरायांना आपला मित्र मित्र मानून त्यांच्याशी त्यांच्याशी तुलना केली तर लक्षातच येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...