मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिवरायांनी ,जिजाऊंनी आणि दादोजींनी या युक्तीने आणि योजनेने वसवले उद्वस्त पुणे


 

           आजच्या सरकारला आहे, ते रस्ते आणि आहे त्या सरकारी वास्तू ( शाळा, दवाखान .इ) निट व्यवस्थित ठेवता येत नाहीत. आणि शिवरायांनी तर उद्वस्त पुणे वसवले आणि शिवरायांनी याच पुण्यातून स्वराज्याची सुरुवात केली. 

            शाहजीराजे यांनी जेव्हा आदिलशाही विरुद्ध बंड पुकारला तेव्हा तो मोडूनन काढण्यात आला. त्यानंतर मुरार जगदेवणे आदिलशहाच्या आदेशाने पूर्ण पुणे उध्वस्त केले.

           शिवरायांना पुण्याची जहागीर मिळाली .त्यावेळी पुण्यातील सर्व जनता इतर प्रदेशात निघून गेली होती आणि जी होती तीही दऱ्या खोऱ्या मध्ये लपलेली होती. या सर्वांना शिवरायांनी आणि दादोजींना रक्षणाचा भरोसा देऊन पुणे वासवण्यास सुरुवात केली.

             सुरुवातीलाच त्यांना गणरायाचा कौल घडला. ज्या ठिकाणी शिवरायांच्या लाल महालाचे काम करीत होते. त्या ठिकाणी गणरायाची मूर्ती सापडली हे ऐकताच प्रजा जमू लागली .

          १.सोन्याचा नांगर सोन्या सारखे पीक

         जनतेत विश्वास यावा यासाठी जेव्हा जिजाऊंनी व शिवरायांनी सोन्याचा नांगर बंजर जागेवर (शेतात) फिरवला, तेव्हा जनतेला विश्वास पटला की हा राजा शेतकऱ्यांसाठी नक्की कार्य करेल.

           ( शिवरायांनी स्वराज्याचे कार्य जर पहिले तर त्याची सुरुवातच शेतकऱ्या पासून केली, असे दिसते त्यांना माहीत होते, की शेतकरीच खरा कर दाता आहे. राज्यातील प्रजेला धन धान्य पुरवण्याचे काम शेतकरीच करत असतो आजही तसेच आहे. शेतकरी कच्चा माल देतो म्हणूनच तर उद्योग धंदे चालतात लोकांना रोजगार मिळतो ,पण आजचे राजकारणी नेते निवडणुकी साठी फक्त businessman च हाताशी धरतात आणि एक दोन वर्षासाठी सुद्धा यांचे सरकार टिकत नाही.)

२.वाडा निवड 

            जनतेचे गऱ्याने ऐकण्यासाठी जिजाऊंनी प्रथम लाल महाल त्यांच्या मधोमध बांधला जिजाऊ जातीने त्यांची गऱ्याने ऐकत होत्या त्यामुळे प्रजेचा अधीकच विश्वास वाढला .

(पण आजच्या राजकीय नेत्याचे आलिशान बंगले मात्र मुंबईला आमदार खासदार निवास म्हणून खऱ्या निवडून आलेल्या क्षेत्रापासून दूर असतात.)

        3.माणसांची निवड, निर्मिती आणि प्रशिक्षण

            पुणे जेव्हा वसवले, तेव्हा दादोजींना आणि शिवरायांनी मजबूत विश्वासु माणसे प्रजेतून सापडून निरखून प्रशिक्षणास सुरुवात केली .ज्यामध्ये तानाजी येसाजी असे अनेक विर ही होते. 

        ( पण आजचे नेते सामान्य तरुणाना धनाचा लोभ देऊन व्यसनी लावतात, आणि निवडणूक की पुरते वापर करतात.)

४.पारितोषिके

            कोल्ह्याचे भय त्या उद्वस्त पुण्यात जेव्हा होते, तेव्हा दादोजींनी आणि शिवरायांनी त्यांना मारण्यासाठी पारितोषिक ठेवली, ज्यामुळे जनतेत उत्साह वाढला आणि त्यामुळे अनेक वीर ही समोर आले.

        ( आजच्या कालावधीत अशी पारितोषिक फार कमी प्रमाणात देण्यात येतात.) 

   ५.सामाजिक कार्य 

               पुणे वसवल्या नंतर कायदे बनवण्यात आले प्रजेच्या गाऱ्हान्यावर पटकन कार्यवाही होऊ लागली. महिलांचे रक्षण, शेत रक्षण, युवकांना प्रशिक्षण, शेतकऱ्याकडून योग्य कर आकारणी ,फळबाग झाडे लागवड,नवीन वस्ती बांधणार्यांना आर्थिक मदत अशी अनेक छोटी मोठी कामे पटकन होऊ लागली. त्यामुळे पुण्यामध्ये राहण्या साठी प्रजा आकर्षित होऊ लागली.

       (आणि आज नीट नियोजन नाहीये म्हणून नोकऱ्यासाठी युवक देश सोडत आहे.) 

                   आजच्या राजीकय नेत्यांनी जर तुम्ही शिवरायकडून थोडी जरी शिकवण घेतली तर नक्कीच भारताच्या विकासाला चालना मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...