मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिवरायांनी ,जिजाऊंनी आणि दादोजींनी या युक्तीने आणि योजनेने वसवले उद्वस्त पुणे


 

           आजच्या सरकारला आहे, ते रस्ते आणि आहे त्या सरकारी वास्तू ( शाळा, दवाखान .इ) निट व्यवस्थित ठेवता येत नाहीत. आणि शिवरायांनी तर उद्वस्त पुणे वसवले आणि शिवरायांनी याच पुण्यातून स्वराज्याची सुरुवात केली. 

            शाहजीराजे यांनी जेव्हा आदिलशाही विरुद्ध बंड पुकारला तेव्हा तो मोडूनन काढण्यात आला. त्यानंतर मुरार जगदेवणे आदिलशहाच्या आदेशाने पूर्ण पुणे उध्वस्त केले.

           शिवरायांना पुण्याची जहागीर मिळाली .त्यावेळी पुण्यातील सर्व जनता इतर प्रदेशात निघून गेली होती आणि जी होती तीही दऱ्या खोऱ्या मध्ये लपलेली होती. या सर्वांना शिवरायांनी आणि दादोजींना रक्षणाचा भरोसा देऊन पुणे वासवण्यास सुरुवात केली.

             सुरुवातीलाच त्यांना गणरायाचा कौल घडला. ज्या ठिकाणी शिवरायांच्या लाल महालाचे काम करीत होते. त्या ठिकाणी गणरायाची मूर्ती सापडली हे ऐकताच प्रजा जमू लागली .

          १.सोन्याचा नांगर सोन्या सारखे पीक

         जनतेत विश्वास यावा यासाठी जेव्हा जिजाऊंनी व शिवरायांनी सोन्याचा नांगर बंजर जागेवर (शेतात) फिरवला, तेव्हा जनतेला विश्वास पटला की हा राजा शेतकऱ्यांसाठी नक्की कार्य करेल.

           ( शिवरायांनी स्वराज्याचे कार्य जर पहिले तर त्याची सुरुवातच शेतकऱ्या पासून केली, असे दिसते त्यांना माहीत होते, की शेतकरीच खरा कर दाता आहे. राज्यातील प्रजेला धन धान्य पुरवण्याचे काम शेतकरीच करत असतो आजही तसेच आहे. शेतकरी कच्चा माल देतो म्हणूनच तर उद्योग धंदे चालतात लोकांना रोजगार मिळतो ,पण आजचे राजकारणी नेते निवडणुकी साठी फक्त businessman च हाताशी धरतात आणि एक दोन वर्षासाठी सुद्धा यांचे सरकार टिकत नाही.)

२.वाडा निवड 

            जनतेचे गऱ्याने ऐकण्यासाठी जिजाऊंनी प्रथम लाल महाल त्यांच्या मधोमध बांधला जिजाऊ जातीने त्यांची गऱ्याने ऐकत होत्या त्यामुळे प्रजेचा अधीकच विश्वास वाढला .

(पण आजच्या राजकीय नेत्याचे आलिशान बंगले मात्र मुंबईला आमदार खासदार निवास म्हणून खऱ्या निवडून आलेल्या क्षेत्रापासून दूर असतात.)

        3.माणसांची निवड, निर्मिती आणि प्रशिक्षण

            पुणे जेव्हा वसवले, तेव्हा दादोजींना आणि शिवरायांनी मजबूत विश्वासु माणसे प्रजेतून सापडून निरखून प्रशिक्षणास सुरुवात केली .ज्यामध्ये तानाजी येसाजी असे अनेक विर ही होते. 

        ( पण आजचे नेते सामान्य तरुणाना धनाचा लोभ देऊन व्यसनी लावतात, आणि निवडणूक की पुरते वापर करतात.)

४.पारितोषिके

            कोल्ह्याचे भय त्या उद्वस्त पुण्यात जेव्हा होते, तेव्हा दादोजींनी आणि शिवरायांनी त्यांना मारण्यासाठी पारितोषिक ठेवली, ज्यामुळे जनतेत उत्साह वाढला आणि त्यामुळे अनेक वीर ही समोर आले.

        ( आजच्या कालावधीत अशी पारितोषिक फार कमी प्रमाणात देण्यात येतात.) 

   ५.सामाजिक कार्य 

               पुणे वसवल्या नंतर कायदे बनवण्यात आले प्रजेच्या गाऱ्हान्यावर पटकन कार्यवाही होऊ लागली. महिलांचे रक्षण, शेत रक्षण, युवकांना प्रशिक्षण, शेतकऱ्याकडून योग्य कर आकारणी ,फळबाग झाडे लागवड,नवीन वस्ती बांधणार्यांना आर्थिक मदत अशी अनेक छोटी मोठी कामे पटकन होऊ लागली. त्यामुळे पुण्यामध्ये राहण्या साठी प्रजा आकर्षित होऊ लागली.

       (आणि आज नीट नियोजन नाहीये म्हणून नोकऱ्यासाठी युवक देश सोडत आहे.) 

                   आजच्या राजीकय नेत्यांनी जर तुम्ही शिवरायकडून थोडी जरी शिकवण घेतली तर नक्कीच भारताच्या विकासाला चालना मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...