मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

गणरायाचे विवेकबुद्धी व शांतपण हे अतुलनीय गुण



 गणरायाचे विवेकबुद्धी व शांतपण हे अतुलनीय गुण 

अगोदर च्या भागात गणरायाच्या चातुर्य या गुणाचा मागोवा घेतला या भागात आपण विवेक बुद्धी व शांतपणा या गुणांचा मागोवा घेऊ -

विवेक बुद्धी या गुणांचा आपल्या जीवनात असामान्य महत्व आहे .आपली बुद्धी विवेकी स्थिर ,व परस्थितीनुसार निर्णय करणारी असेल तर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. क्रोध नियंत्रित करू शकतो हे पुढील कथेवरून लक्षातच येईल-

          ती कथा आपल्या सर्वानाच माहित आहे .जेव्हा देवानं वादविवाद सुरु  झाला, कि प्रथम पूजनाचा मान कोन्हाला याचे उत्तर म्हणून ब्रम्हदेवाने स्पर्धा आयोजित केली, कि जो कोण्ही संपूर्ण ब्रम्हांडाला चक्कर मारिल तो विजयी . मातापार्वतीनी गणराया व कार्तिकेय या दोघांना या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितल. या ठिकाणी गणरायाचे वाहन मूषक होते तरीही गणरायाने भाग घेतला. जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा गणराया सर्वात मागे होते .तरीही गणरायाने योग्य निर्णय घेत आपले मातापिता यांना चक्कर मारला .जेव्हा याचे कारण गणरायाला विचारले तेव्हा गणरायाणे सांगितले कि जर मातापित्यातच जर सम्पूर्ण ब्रह्मांड आहे तर इतरत्र का फिरू 

      या कथे वरून आपण अनेक महत्वाच्या बाबी स्पष्ट होतात जसे कि -

१. गणरायाचे वाहन मूषक होते तरीही गणारयाने स्पर्धेत भाग घेतला आपली बाजू नाजूक आहे कि नाही याचा त्यांनी स्पर्धेत विचार देखील केला नाही. 

    ( नाहीतर आपण आपली बाजू जर नाजुक असेल तर त्याचाच विचार करत बसतो व स्पर्धे पूर्वीच माघार घेतो )

२. गणरायाने  स्पर्धेत फक्त माझाच वीजय व्हावा म्हणून सहभाग न घेता मातेचा आदेश व कर्त्यव्य म्हणून भाग घेतला .   

(पण जर आपण आपला विचार केला तर मात्र प्रत्येक क्षेत्रात माझाच विजय व्हावा अशी अपेक्षा बाळगतो व नाही प्राप्त झाल्यास दुःखी होतो)

3. वाहन मूषक जोरात चालत नाही याचा राग गणरायाने मूषक वर काढला असता, पण त्याही ठिकाणी संयम ठेवत विवेकाने वेगळ्या मार्गाने पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला ,व मतापित्यामद्धेच संपूर्ण जग सामावलेलं आहे हा विवेकी विचार जगासमोर मांडला.

   (पण आपण आपल्या अपयशाचा दोष दुसऱ्यावर टाकून मोकळे होतो.)

विवेकी व संयमी विचारवंतांचे मोठे व उदान्त विचार असू शकतात जसेकी गणारायाने जय पराजया पेक्षा मातापिताच जगा पेक्षा श्रेष्ठ आहे याला महत्व दिले व विजय शेवटी गणारायचाच झाला.

 त्यामुळेच गणरायाचे जर आपण नित्य पठण केले गणपती स्तोत्राचे नित्य पठण केले तर आपलीही बुद्धी विवेकी शांत व संयमी होते











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...