२६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
श्री कृष्णा च्या बालपणीचे वैशिष्ट्य व गुण
श्री कृष्णांच्या बाळपणापासून अनेक गुण घेऊ शकतो जसे की -
1.श्रीकृष्णाचा जन्मच कारागृहात झाला. मामा वैरी तर आई वडील बंधिस्त म्हणजेच संकटाची सुरुवातच जन्मापासूनच झाली होती. पण नियतीला तेथे काही वेगळेच घडवायचे होते. त्यामुळेच श्री कृष्ण कारागृहातून मूक्त होऊन नंदराजाच्या घरी पोहचले
आपल्याही आयुष्यात पहिले तर आपलाही जन्म गरीब किंवा श्रीमंत परिवारात झाला आहे, याचा विचार न करता आपल लक्ष्य काय आहे, विचार करण महत्वाचे आहे.
(शिवाजीमहाराजांचा जन्मही दुःखाच्या परिस्थितीत शिवनेरीवर झाला होता.)
2.श्री कृष्ण हे देव आहे. पण जर आपण त्यांच्याकडे एका मित्रा प्रमाणे पहिले तर अनेक गुण हेऊ शकतो. जसे की श्री कृष्णाने बालपणीच अनेक राक्षसांचा वध केला होता
आपल्याही आयुष्यात अनेक संकट येतात पण आपल्या क्षमते नुसार त्यांचा सामना केला तर आपले ही आयुष्य ठरलेल्या लक्ष्या पर्यंत जाऊन पोहचेल.
3.श्री कृष्णा लहानपणापासूनच नटखट खोडकर आनंदी व उत्साहित होते पण तेवढेच माता यशोदेचे आज्ञाकारी ही होते.
आपणही बालपणात खोडकर असतो पण तेवढेच आज्ञाकारी असतो का?
4.श्री कृष्ण बालपणी आपल्या मित्रांना संकटात मदत करत असे .
पण जर आपल्या आयुष्यात पहिले तर आपण बालपणापासूनच मित्रांबरोबर छोट्या गोष्टी साठी वाद घालत असतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा