मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण


 

          महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.  त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे-

१.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध

         दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.

 २.अशक्य गोष्टीस योजना_

         महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला युद्धासाठी लालकरल्यावर तो चकित झाला. युद्धात हरल्यावर  महिषासुर दुर्गा मातेला शरण आला. (मातेची पूजा केल्यामुळे आज महिषासुराला म्हसोबा म्हणून सुद्धा ओळखलं जातं.)

         त्याच बरोबर रक्तबीज नावाच्या राक्षसाला वर होता, की त्याचे रक्त जमिनीवर पडल्यावर त्याच्यासारखाच एक नवीन राक्षस निर्माण होत. त्यामुळे रक्तबीजाचा वध होणं अशक्य होत. पण दुर्गा मातेने त्याच्याशी युद्ध करताना त्याच्या रक्ताला एका काटोरित जमा केले. व तेच रक्त काली माता अवतार घेऊन पिऊन टाकले व रक्तबीजाचा वध झाला. 

याच प्रमाणे आपणही योजना वापरून अशक्य गोष्टी शक्य करू शकतो

   ३.चांगल्या विचारांचा सांभाळ दृष्टांचा विनाश_ 

        परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ या श्लोका प्रमाणे मातेने पुण्य वंतांच रक्षण केले व वाईटाचा विनाश केला.

          आपणही आपल्या अंतरंगातील वाईट विचारांचा विनाश करणे ,व चांगल्या विचारांचा सांभाळ करणे, आवश्यक आहे.  

४. करा शांत मनाला_ 

          तब्बल नऊ दिवस राक्षसांशी युद्ध केल्यानंतर  दुर्गा मातेचे शरीर पूर्ण तप्त झाले होते .भक्तांनी मातेला शांत करण्यासाठी पंचामृताने, निंबाच्या पाल्याने स्नान घातले व त्यामुळे दुर्गा माता शांत झाल्या. 

    वाईट विचारांशी लढून जर आपलं मन लढून तप्त होत असेल तर दुर्गामतेची भक्ती करून मनाला भक्तीचे एक प्रकारे स्नानच घातले पाहिजे. 

  ५.दुर्गा मातेची कीर्ती _

       राक्षसांचा वध केल्यावर देवांनी मातेची पूजा करून मातेला महिषासुरमर्दिनी पण म्हटले जाऊ लागले .यामुळे मातेची महती सर्वदूर पसरली.

       आपणही जर वाईट कृती ,कार्य, विचार यांच्या विरुद्ध लढून जर आपले चरित्र घडवू शकत असेल तर आपणही दुर्गामाता व शिवरयाप्रमाणे आपली कीर्ती सर्वदूर पसरवू शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.