मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक

 


सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक

                मित्रानो इतिहासात नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे व ते  पुढील पिढीने आदर्श मानून प्रेरित होणे गरजेचे आहे पण इतिहासात नाव कोरने काही सोपी गोष्ट नाही सावित्री बाईंनी इतिहासात नाव कोरले जावे म्हणून काही हट्टहास धरला नव्हता समाजाचे हित इच्छुन त्यांनी कार्य केले पण समाजाचे हित करताना व त्याच समाजापुढे इतिहासात नाव कोरले जाताना त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले ते पूढील काही मुद्यांवरून लक्षात च येईल

अशी ही सावित्रीबाईची शिक्षणाची आवड

       बालपणापासून च शिक्षणाची आवड  असणाऱ्या सावित्रीबाईंच्या कालावधीत स्त्री ला शिक्षण दिले जात नव्हते.तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही.त्या पुस्तकांना आपला गुरू मनात व त्यांना त्या जपत.

पण आजच्या कालावधीत जर पाहिले तर सर्व उपलब्ध असूनही आजच्या कालावधीतील सावित्री (मुली) सोशिअल मीडियावर गुंतल्या आहे 

जहाँ चाह वहा राह 

शिक्षणाची आवड असणाऱ्या सावित्रीबाई ना जोतिरावसारखे व्यक्तिमहत्व शिक्षक स्वरूपात मिळाले व त्यांनी त्यांचे कार्य पारही पडले

आजच्या कालावधीत जोतिरावसारखे व्यक्तिमहत्व निर्माण होणे गरजेचे आहे ज्याद्वारे शिक्षणाची गरज असणाऱ्या महिलांना एक राह तरी मिळेल

समाज्याच्या विरोधातकी सावित्रीबाई कणखर

आपल्या सर्वानाच माहीत आहे जेव्हा सावित्रीबाई नि पहिली मुलींची शाळा काढली तेव्हा समाजाचा खुप सारा विरोध झेलवा लागला शेण फेकण्या पासून ते शाळा तोडण्या पर्यंत दृष्ट्यानी कार्य केले पण सावित्रीबाई डगमगल्या नाही

आजच्या काळात अशा शिक्षकाची  गरज आहे जे अत्यंत दुर्गम भागातही शिक्षण घेऊन जातील फक्त पगारासाठी नव्हे तर कर्म म्हणून ते कार्य करतील 

सावित्रीबाई फक्त शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर समाज सुधारणा सतिप्रथा विरोध त्याच्याबरोबर प्लेग सारख्या रोगा दरम्यान स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्या रुग्णाची मदत करत ,आणि त्यातच त्यांनाच देहांत झाला आहे

अशा प्रकारचे बलिदान देणारेच इतिहासात आपले नाव कोरु शकतात सामान्य जण नव्हे कारण त्याग केल्यावरच इतिहास घडतो

आपणही सावित्रीबाईचा आदर्श घेतला व त्या प्रमाणे कर्म केले तर नक्कीच आपले ही नाव इतिहासात कोरले जाईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...