मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक

 


सावित्रीबाई फुले इतिहासातील एक उत्कृष्ट शिक्षक

                मित्रानो इतिहासात नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जावे व ते  पुढील पिढीने आदर्श मानून प्रेरित होणे गरजेचे आहे पण इतिहासात नाव कोरने काही सोपी गोष्ट नाही सावित्री बाईंनी इतिहासात नाव कोरले जावे म्हणून काही हट्टहास धरला नव्हता समाजाचे हित इच्छुन त्यांनी कार्य केले पण समाजाचे हित करताना व त्याच समाजापुढे इतिहासात नाव कोरले जाताना त्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले ते पूढील काही मुद्यांवरून लक्षात च येईल

अशी ही सावित्रीबाईची शिक्षणाची आवड

       बालपणापासून च शिक्षणाची आवड  असणाऱ्या सावित्रीबाईंच्या कालावधीत स्त्री ला शिक्षण दिले जात नव्हते.तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही.त्या पुस्तकांना आपला गुरू मनात व त्यांना त्या जपत.

पण आजच्या कालावधीत जर पाहिले तर सर्व उपलब्ध असूनही आजच्या कालावधीतील सावित्री (मुली) सोशिअल मीडियावर गुंतल्या आहे 

जहाँ चाह वहा राह 

शिक्षणाची आवड असणाऱ्या सावित्रीबाई ना जोतिरावसारखे व्यक्तिमहत्व शिक्षक स्वरूपात मिळाले व त्यांनी त्यांचे कार्य पारही पडले

आजच्या कालावधीत जोतिरावसारखे व्यक्तिमहत्व निर्माण होणे गरजेचे आहे ज्याद्वारे शिक्षणाची गरज असणाऱ्या महिलांना एक राह तरी मिळेल

समाज्याच्या विरोधातकी सावित्रीबाई कणखर

आपल्या सर्वानाच माहीत आहे जेव्हा सावित्रीबाई नि पहिली मुलींची शाळा काढली तेव्हा समाजाचा खुप सारा विरोध झेलवा लागला शेण फेकण्या पासून ते शाळा तोडण्या पर्यंत दृष्ट्यानी कार्य केले पण सावित्रीबाई डगमगल्या नाही

आजच्या काळात अशा शिक्षकाची  गरज आहे जे अत्यंत दुर्गम भागातही शिक्षण घेऊन जातील फक्त पगारासाठी नव्हे तर कर्म म्हणून ते कार्य करतील 

सावित्रीबाई फक्त शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर समाज सुधारणा सतिप्रथा विरोध त्याच्याबरोबर प्लेग सारख्या रोगा दरम्यान स्वतःच्या जीवाची काळजी न करता त्या रुग्णाची मदत करत ,आणि त्यातच त्यांनाच देहांत झाला आहे

अशा प्रकारचे बलिदान देणारेच इतिहासात आपले नाव कोरु शकतात सामान्य जण नव्हे कारण त्याग केल्यावरच इतिहास घडतो

आपणही सावित्रीबाईचा आदर्श घेतला व त्या प्रमाणे कर्म केले तर नक्कीच आपले ही नाव इतिहासात कोरले जाईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

३ एप्रिल १६८० इतिहासातील एक काळा दिवस ।शिवाजी महाराज पुण्यतिथी दिन

      इतिहासात अनेक वीर योद्धे राजे महाराजे होऊन गेले आणि काळाच्या काळ्या दरीत समाहून पण गेले .पण इतिहासाने असेही काही योद्धे बघितले आहे जे इतिहासात अजर अजरामर तर झालेच, आणि भविष्यात त्यांचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा शरीरावर क्षहारे उभे राहिल्या शिवाय राहणार नाही       त्या पैकी शिवराय आहे यात काही दुमत नाही हेच खरे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्ष मध्ये नावाजलेले अमर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वर्ग वाशी झाले तेव्हा हिंदू स्वराज्य निर्माण करणारा भारताचा खरा वीर इहलोक सोडून गेले याचा संपूर्ण भारत वर्षाला दुःख होते.     शिवराय जेव्हा मृत्यू च्या दारात होते तेव्हाही त्यांना स्वराज्य आणि सामान्य जनतेचीच काळजी होती. संभाजी महाराज नेटकेच मुघलांच्या चंगुळ मधून सुटून आले होते ,शंभूराजे बरोबर शेवटी  खुप बोलावं असही शिवरायांना वाटत होतं.      शिवराय फक्त संसारच करून नाही गेले, तर तुकाराम महाराज रामदास स्वामी च्या सानिध्यात जे परमार्थ रुपी धन तेही जोपासले होते .प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे सर्वात श्रेष्ठ तो भगवंत आहे. ब...