मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

सुभाषचंद्र बोस यांच्यातील नेतृत्व हा मोलाचा गुण


 

      सामाजिक कोणत्याही गोष्टीचे नेतृत्व करायचे असेल, तर त्यासाठी धेंर्य लागते. नेतृत्व करणाऱ्या गोष्टी विषयी माहिती नसताना जर आपण आव आणून नेतृत्व केले, तर मोठी सामाजिक हानी होण्याची शक्यता असते. वस्तूत काही गुण माणसाला जन्मतःच असतात, त्यापैकीच सुभाषचंद्र यांच्यात नेतृत्व हा गुण आढळून येतो.इंग्रज गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाचे नेतृत्व करून आपण आपल्या देशाला स्वतंत्र करू शकतो असा विश्वास सुभाषचंद्र यांना होता.

       तसाच विश्वास जर आपल्याला आपल्या नेतृत्व विषयी असेल, आणि त्यामुळे सामाजिक मोठा बदल घडवून येत असेल, तर नक्कीच आपले नाव इतिहासात अजरामर होण्यास जास्त वेळ लागत नाही.

      सुभाषचंद्र यांचे धाडस आणि त्याग काही वेगळाच होता. वडिलांच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांनी कलेक्टरची परीक्षा ८ महिन्यातच उत्तीर्ण करून ही देशाचे नेतृत्व करावे म्हणून ते काँग्रेस मध्ये शामिल झाले. जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली त्यावेळी सुभाषचंद्र बहुमताने निवडून आले. त्यानंतरही जेव्हा प्रांतीय निवडणूक झाली त्यामध्येही देशाचे नागरिकांनी सुभाषचंद्र यांना समर्थन दिले.  यानंतर सुभासचंद्राचे निर्णय इंग्रजांप्रती आक्रमक होते. अनेक भारतीयांना गांधीजी पेक्षा सुभासचंद्र लवकर भारताला स्वातंत्र्य मिळवून देतील असा विश्वास होता.

     पुढे गांधीजींशी मतभेद झाल्यावर आणि काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर सुभासचंद्रा मधील नेतृत्व हा गुण शांत बसणार कोठे शिवरायांनी जसे औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून पसार झाले. तसेच सुभासचंद्र  इंग्रजांच्या नजर कैदेतुन पसार झाले.

       जर्मनीत गेल्यावर हिटलर कुठल्याही पद्धतीने मदत करणार नाही, दिसल्यावर सुभासचंद्र जपानला आले.  सुभासचंद्र यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या कैदेतील 20 हजार भारतीय सैनिक आणि जपान मधील स्थानिक भारतीय मिळून सुभासचंद्रानी 45 हजारांची मोठी सेना उभी केली. हा सर्व सुभासचंद्र यांच्या नेतृत्वाचाच प्रभाव होता. यानंतर जी हिम्मत सुभासचंद्रानी दाखवली ती नक्कीच प्रशंसा लायक आहे. भारतातील बंगाल अंदमान निकोबार बेटे त्यांनी त्यावेळी स्वतंत्र केले होते. यानंतर जेव्हा सुभासचंद्रानी चलो दिल्ली चा नारा दिला त्यावेळी तर इंग्रजांना घामच फुटला. 

       मानले जाते की दुसरे विश्व युद्ध संपल्यावर आपलेच भारतीय सैनिक पुन्हा भारतात आल्यावर इंग्रजांकडून लढले नसते, तर भारत सुभासचंद्र यांच्याच हातून आझाद झाला असता.

    त्याच बरोबर हे पण मानले जाते की, भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूंच्या जागी सुभासचंद्र झाले असते, तर आज भारत प्रगत देश असता. आणि हे सर्व फक्त सुभासचंद्रांच्या प्रभावी नेतृत्वामुळे झाले असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...