मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

सुभाषचंद्र बोस यांच्यातील नेतृत्व हा मोलाचा गुण


 

      सामाजिक कोणत्याही गोष्टीचे नेतृत्व करायचे असेल, तर त्यासाठी धेंर्य लागते. नेतृत्व करणाऱ्या गोष्टी विषयी माहिती नसताना जर आपण आव आणून नेतृत्व केले, तर मोठी सामाजिक हानी होण्याची शक्यता असते. वस्तूत काही गुण माणसाला जन्मतःच असतात, त्यापैकीच सुभाषचंद्र यांच्यात नेतृत्व हा गुण आढळून येतो.इंग्रज गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाचे नेतृत्व करून आपण आपल्या देशाला स्वतंत्र करू शकतो असा विश्वास सुभाषचंद्र यांना होता.

       तसाच विश्वास जर आपल्याला आपल्या नेतृत्व विषयी असेल, आणि त्यामुळे सामाजिक मोठा बदल घडवून येत असेल, तर नक्कीच आपले नाव इतिहासात अजरामर होण्यास जास्त वेळ लागत नाही.

      सुभाषचंद्र यांचे धाडस आणि त्याग काही वेगळाच होता. वडिलांच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांनी कलेक्टरची परीक्षा ८ महिन्यातच उत्तीर्ण करून ही देशाचे नेतृत्व करावे म्हणून ते काँग्रेस मध्ये शामिल झाले. जेव्हा काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली त्यावेळी सुभाषचंद्र बहुमताने निवडून आले. त्यानंतरही जेव्हा प्रांतीय निवडणूक झाली त्यामध्येही देशाचे नागरिकांनी सुभाषचंद्र यांना समर्थन दिले.  यानंतर सुभासचंद्राचे निर्णय इंग्रजांप्रती आक्रमक होते. अनेक भारतीयांना गांधीजी पेक्षा सुभासचंद्र लवकर भारताला स्वातंत्र्य मिळवून देतील असा विश्वास होता.

     पुढे गांधीजींशी मतभेद झाल्यावर आणि काँग्रेस मधून बाहेर पडल्यावर सुभासचंद्रा मधील नेतृत्व हा गुण शांत बसणार कोठे शिवरायांनी जसे औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून पसार झाले. तसेच सुभासचंद्र  इंग्रजांच्या नजर कैदेतुन पसार झाले.

       जर्मनीत गेल्यावर हिटलर कुठल्याही पद्धतीने मदत करणार नाही, दिसल्यावर सुभासचंद्र जपानला आले.  सुभासचंद्र यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या कैदेतील 20 हजार भारतीय सैनिक आणि जपान मधील स्थानिक भारतीय मिळून सुभासचंद्रानी 45 हजारांची मोठी सेना उभी केली. हा सर्व सुभासचंद्र यांच्या नेतृत्वाचाच प्रभाव होता. यानंतर जी हिम्मत सुभासचंद्रानी दाखवली ती नक्कीच प्रशंसा लायक आहे. भारतातील बंगाल अंदमान निकोबार बेटे त्यांनी त्यावेळी स्वतंत्र केले होते. यानंतर जेव्हा सुभासचंद्रानी चलो दिल्ली चा नारा दिला त्यावेळी तर इंग्रजांना घामच फुटला. 

       मानले जाते की दुसरे विश्व युद्ध संपल्यावर आपलेच भारतीय सैनिक पुन्हा भारतात आल्यावर इंग्रजांकडून लढले नसते, तर भारत सुभासचंद्र यांच्याच हातून आझाद झाला असता.

    त्याच बरोबर हे पण मानले जाते की, भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूंच्या जागी सुभासचंद्र झाले असते, तर आज भारत प्रगत देश असता. आणि हे सर्व फक्त सुभासचंद्रांच्या प्रभावी नेतृत्वामुळे झाले असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...