मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिवरायांचे निस्वार्थी मित्र परिवार


 



शिवरायांचे निस्वार्थी मित्र परिवार 

            जीवनात जर मोठे कार्य सम्पन करायचे असेल तर आपल्याला निस्वार्थी आणि त्यागी मित्र बनवणे गरजेचे आहे. संकटाच्या प्रत्येक पावलावर साथ देणारे मित्र  मिळवणे गरजेचे आहे. शिवरायांनी बारा मावळातून अनेक मित्र मिळवले ,आणि शिवरायांचा मित्र परिवार स्वराज्याच्या संकट काळात शिवरायांसाठी मर मिटायला ही तयार होता. स्वराज्या साठी शिवरायांनी कसे मित्र निवडले ते पुढील मुद्यांवरून लक्षातच येईल. 

योग्य मित्राची निवड  

               शिवरायांच्या मित्र परिवारात जर पाहिले तर त्यांनी कुठल्याही प्रकारचा हिंदू मुस्लिम जातीचा भेदभाव केलेला आढळत नाही.फक्त मातृभूमी साठी ज्यांच्या मनात तीव्र इच्छा आहे जे स्वतःच्या प्रणापेक्षा स्वराज्यासाठी बलिदान देण्यास तयार होते असा सर्व मित्र परिवारा कडे शिवराय आकर्षित होताना दिसून येतात . कारण शिवरायांनचे विचारही त्याच प्रकारचे होते, एक प्रकारे शिवरायांनी वर्ण धर्म यांच्या पेक्षा विचार धारेला महत्व दिले म्हणजेच बाय्य गुना पेक्षा आंतरिक गुणांना महत्त्व दिले .

       स्वराज्यासाठी मित्रांची योग्य ठिकाणी नेमणूक 

             शिवराय स्वराज्यासाठी प्रत्येक आपल्या मित्रांची योग्य ठिकाणी नेमणूक करताना त्यांच्या विचार धारेवरून विविध ठिकाणी नेमणूक करत जसे वीर तानाजी ,येसाजी ,जिवाजी हे बलिष्ठ आणि युद्धात निपुर्ण होते, त्यामुळे प्रत्येक युद्धाच्या अग्रभागी या मित्रांचा समावेश असत. अफजलखानाच्या वेळी होता जीवा म्हणून वाचला शिवा अस आपण म्हणतो,  तर चतुर आणि चपळ मित्रांना गुप्त हेर म्हणून नेमणूक केली,आग्र्याच्या सुटकेच्या वेळी माधारी मेहतरच सर्वात जास्त गुप्त बातम्या आणत होता. 

          त्याच बरोबर लबाड व स्वहितासाठी, जहागिरीसाठी लढणाऱ्या सोबत्याना शिवरायांनी दोन हात दूर म्हणजेच दोनचार गावांचा सुभेदार म्हणून नेमणूक करत अफजलखानाच्या वेळी जेधे, बांधलं, घोरपडे यानासरखेच सर्वात पाहिल्यानंदा खानाला जाऊन मिळाले.शिवरायांच्या इतिहासात कधी मित्रावर संशय केला, किंवा जवळील मित्राने दगा केला, असे उदाहरण आढळत नाही .

         त्यामुळेच फक्त फायदा काढून घेणारे पैसे जवळ असताना पुढे पुढे करणारे मित्र करण्या पेक्षा संगतीने नवा करोबार टाकू सोबत देशाच्या विकासात हातभार लावू असे मित्र बनवणे गरजेचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...