मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिवरायांचे बालपणीचे शिक्षण

 शिवरायांचे बालपणीचे शिक्षण 

शिवराय हे छत्रपती झाले असतील तर त्या मागे त्यांच्या प्रशिक्षणाचा नक्किच मोठा वाटा आहे हे पुढील काही मुद्यांवरून आढळून येते-

प्रात्यक्षित पद्धतीचे शिक्षण (Practical knowledge)

          शिवरायांच्या कालावधीत शिक्षण हे मुख्य करून प्रात्यक्षिक पध्दतीचे होते. असे आढळून येते या कालावधीतील विद्यार्थ्यांना युद्ध कला जसे  तालावरबाजी, दांडपट्टा, घोड्यावर रपेट मारणे अशा विविध कला शिकवल्या जात.

           आजच्या कालावधीत प्रात्यक्षित पद्धतीचे शिक्षण खुप कमी दिसून येते. १ तासाच्या आत शिकवलेला विषय जीवनात कोठे उपयोगी पडू शकतो हे काही वेळा शिक्षक सांगत नाही, तर विद्यार्थी ही समजून घेत नाही शिवाय पाण्यात पडल्या शिवाय पोहता कसे काय येईल .

संघ व वयक्तिक पद्धतीचे शिक्षण

         संघ पद्धतीने म्हणजे एकत्र जसे शिवरायांचे शिक्षक गुरू दादाजी कोंडदेव  हे शिवरायांना त्याच बरोबर मावळ्यांना आणि शिवरायांच्या सवंगड्याना एक सोबत व वयक्तिक शिक्षण देत असे पण त्यांच्या शिस्तीत मात्र थोडा सुद्धा भेदभाव नसे.

           आजच्या कालावधीत जर पाहिले तर दोन्ही पद्धतीचे शिक्षण मिळते वयक्तिक पध्दतीचे शिक्षण शक्यतो शहरातच आढळून येते. यात शिक्षक समान शिस्त ठेवतीलच असे नाही .त्याच बरोबर विद्यार्थीही शिक्षकांचा किती आदर ठेवतात, त्याच्यावरही प्रश्न उभा राहिला आहे.

आई जिजाऊंचे शिवरायांना प्रशिक्षण

             जिजामाता स्वतः शिवरायांना तालावर बाजी पासून  ते ज्ञानेश्वरी , रामायण पठण पर्यंत प्रशिक्षण देत होत्या. आपल्या स्वतःच्या मुला समोर त्या एका शिस्त बद्ध गुरू प्रमाणे उभ्या राहत. गनिमी काव्याचे अनेक धडे शिवरायांनी जिजाऊनकडूनच घेतले.

                आजच्या कालावधी जर पाहिले तर ग्रामीण भागाततही TV, मोबाईल आल्यामुळे बहुतेक माता आता आपल्या बालकाकडे लक्ष देत नाहीये ,असे आढळून येते.

निसर्ग हा एक शिवरायांचा गुरू

          शिवराय स्वतःहून नवीन काही शिकण्यात रस घेत. किल्यांवर मंदिरामध्ये सवंगड्यासह फिरत निसर्गातून जीवनातील अनेक धडे शिकत. ज्याचा फायदा शिवरायांना अफजलखान वध, शाहिस्तेखान फजिती असा अनेक ठिकाणी झाला.

               पुस्तकातील व शिक्षकांनी दिलेले ज्ञान हे त्या गोष्टीचा अर्धा भाग असतो. आपल्या नवीन अनुभवांनी व विचारांनी ते ज्ञान पूर्ण होत असते .

आजच्या कालावधीत विद्यार्थी घेणारे शिक्षण समजून घेत नाही. त्यामुळे degree तर मिळते पण व्यवसाय काय नोकरीही मिळण्याचे कठीण होते.


शिवरायांचे सिद्धांतिक (theoretical) ज्ञान 

           शिवरायांना विविध ७ ते ८ भाषेंचे ज्ञान होते त्यांनी अनेक ग्रंथ ही वाचले संस्कृत उर्दू तमिळ अष्या अनेक भाषा शिवरायांना अवगत होत्या संस्कृतातील अनेक कठीण श्लोक त्यांना कंठस्त होत्या.

               पण आजच्या कालावधी सिद्धांतिक( theoretical) ज्ञानाला विद्यार्थी कमी महत्व देतो त्याला कंटाळवाणे मानतो शिक्षण तर घेतले जाते पण ते फक्त परीक्षा पुरते.

             या वरील सर्व गोष्टीवरून एक गोष्ट मात्र नक्की स्पष्ट होते की शिवरायांनी प्रात्यक्षित ज्ञाना बरोबर सिद्धांतिक ज्ञानाला महत्व दिले गुरूचा आदर केला स्वतःहून निसर्गाकडून शिकण्याचा प्रयत्न केला या कार्या मध्ये त्यांना जिजाऊंचे त्यांना सहाय्य प्राप्त झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...