जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...
ज्या वेळी स्वहीत सोडून समाजहित करण्यासाठी सुरुवात करतो, त्यावेळी आपण सुरुवातिच्या स्तरावर असतो, पूर्ण यश मिळेलच नसते, त्यामुळे इतरांकडून अनेक वेळा नकारात्मक ( negativeness) बोल ऐकावे लागतात.
असेच काही शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या स्थरावर ऐकावे लागले होते.
ज्यावेळी शिवरायांनी तोरणा जिंकला त्यावेळी त्यांच्या जवळ फारच थोडे धन होते .आणि नुकतेच पुणे बसवले होते. त्यामुळे अधिक कर ही गोळा होत नसे.
दादोजी कोंडदेव आणि शिवरायांचे पंत हे शहाजीराज्यांचे विश्वासु लोक, शहाजीराज्यांचा बंडावा आदिलशहाने मोडून काढला होता. तसाच शिवरयांचाही स्वराज्याचे स्वप्न आदिलशहा मोडून काढतो की काय अशी भीती दादोजींना आणि पंताना होती.
पंत एकदा शिवरायाना म्हणाले ही होते, की तुम्ही जी स्वराज्याची सुरुवात केली आहे ती सुरुवात जेव्हा शहाजी राज्यांनी केली होती. त्यावेळी त्यांनाही पराजयचा सामना करावा लागला होता. त्याच बरोबर स्वराज्य उभारण्या साठी बक्कळ पैसाही लागतो, तो कोठुन आणणार, स्वराज्यासाठी जी माणसे तुम्ही गोळा केली आहे ती सर्व निष्ठेने,आणि विश्वासाने तुमच्या बरोबर उभी आहेत की यातील काहींना फक्त पैसा आणि जहागिरी साठी आहे, यातील काही दगा तर नाहीना देणार.
यावर शिवरायांना खुप राग येत होता. पण जिजाऊंनी शिवरायांना सतत धीर दिला, त्या सांगत की तु विजयाच्या पहिल्या स्तरा वर आहेस, म्हणून त्यांना विश्वास नाही, तू विजय मिळव सर्व तुझ्यावर विश्वास ठेवतील. आणि हीच गोष्ट खरी ठरली. शिवरायांनी जेव्हा तोरणा किल्या नंतर सर्वात मजबूत किल्ला कोंढाणा जिंकला फक्त डाव पैजा द्वारे ,त्यावेळी दादोजीना आणि पंतांना विश्वास बसला, की शिवराय शिवराय नक्कीच स्वराज्य स्थापन करू शकतील.
मित्रानो आपल्या बरोबर असच होत असत, जो पर्यंत यश मिळत नाही तो पर्यंत लोक नाव ठेवतात. पण जेव्हा यश मिळवतो, तेव्हाच सर्वांचा विश्वास बसतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा