मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिवजयंती रामनवमी आणि कृष्ण जन्म अष्टमी आपण का साजरी करतो या मागील कारण काय ( भाग १)


         प्रत्येक युगात कोणत्या न कोणत्या दानवांचा अत्याचार वाढला, किंवा मनुष्य जातीवर अन्याय झाल्यावर कोणीतरी दैवी शक्ती जन्म घेते हे खरेच म्हणावे लागेल.

      सत युगात रावणाचा अत्याचार वाढल्यावर राम आणि द्वापार युगात धर्म संकटात आल्यावर श्रीकृष्णा चा जन्म झाला.

      प्रत्येक युगात जसे वाईट वृत्तीचे मनुष्य जन्माला आले ,आणि त्यांच्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच दैवी पुरुष ही जन्माला आले. 

       ज्या वेळी महाराष्ट्रा वरच नव्हे तर संपूर्ण भारतावर मुघल शासन करताना हिंदूंवर अत्याचार करत होते, आणि हा अन्याय अत्याचार पाहून जिजाऊ ना मात्र दुःख होत होते ,म्हणजेच ही एक चाहूल होती. अनामिक घडण्याची सामान्य जनातेवरील अन्याय दूर करण्यासाठी सुद्धा कोणा वीर पुरुषाला धरतीवर पाठवण्याची ही एक चाहूलच असेल.

     गर्भवती जिजाऊंना सुद्धा तुळजा मातेकडे कोणी विर पुरुषच जन्माला यावा अशी याचना मातेकडे करत असेल, आणि अभिमन्यू ने जसे आपल्या आईच्या गर्भात असतानाच चक्राविव भेदण्याचे समजून घेतले होते तसेच शिवरायांनी भविष्यात हिंदूंवर भारत भूमीवर अत्याचार करणाऱ्यांचा परिपात करण्याचे शिवरायांनी जसे ठाणलेच होते. 

      १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला म्हणून नाव शिवाजी ठेवण्यात आले.

        इतिहासातील काही उदाहरणावरून शिवराय जन्मताच दैवी पुरुष आहे. असे मी दर्शवण्याचा प्रयत्न केला किंवा आपण सर्व मानतो, पण त्या पेक्षा शिवराय जन्मताच एक सामान्य मनुष्य म्हणून जन्माला आले आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ते एक दैवी पुरुष झाले. तसेही आपल्या संतांनीही सांगितले च आहे की कर्तृत्वाच्या बळे किंवा भक्तीच्या बळे आम्ही झालो देव.

      आपण साधारण मनुष्य  शिवरायांचा आदर्श ठेऊन समाज हितासाठी नक्कीच कार्य करू,  नाहीतर शिवराय जन्मताच दैवी पुरुष आणि आपण तर सामान्य मनुष्य असे म्हटल्यावर आपण काहीही करणार नाही

      पण ज्या दिवशी मीही शिवरयासारखे कर्तृत्व करू शकतो असे ठरवल्यावर फुल नाही पण फुलाची पाकळी एवढे कर्तृत्व शिवरायांचा आदर्श ठेऊन नक्कीच करू. 

   हो की नाही कमेंट करून नक्की सांगा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.