मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिवजयंती रामनवमी आणि कृष्ण जन्म अष्टमी आपण का साजरी करतो या मागील कारण काय ( भाग १)


         प्रत्येक युगात कोणत्या न कोणत्या दानवांचा अत्याचार वाढला, किंवा मनुष्य जातीवर अन्याय झाल्यावर कोणीतरी दैवी शक्ती जन्म घेते हे खरेच म्हणावे लागेल.

      सत युगात रावणाचा अत्याचार वाढल्यावर राम आणि द्वापार युगात धर्म संकटात आल्यावर श्रीकृष्णा चा जन्म झाला.

      प्रत्येक युगात जसे वाईट वृत्तीचे मनुष्य जन्माला आले ,आणि त्यांच्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच दैवी पुरुष ही जन्माला आले. 

       ज्या वेळी महाराष्ट्रा वरच नव्हे तर संपूर्ण भारतावर मुघल शासन करताना हिंदूंवर अत्याचार करत होते, आणि हा अन्याय अत्याचार पाहून जिजाऊ ना मात्र दुःख होत होते ,म्हणजेच ही एक चाहूल होती. अनामिक घडण्याची सामान्य जनातेवरील अन्याय दूर करण्यासाठी सुद्धा कोणा वीर पुरुषाला धरतीवर पाठवण्याची ही एक चाहूलच असेल.

     गर्भवती जिजाऊंना सुद्धा तुळजा मातेकडे कोणी विर पुरुषच जन्माला यावा अशी याचना मातेकडे करत असेल, आणि अभिमन्यू ने जसे आपल्या आईच्या गर्भात असतानाच चक्राविव भेदण्याचे समजून घेतले होते तसेच शिवरायांनी भविष्यात हिंदूंवर भारत भूमीवर अत्याचार करणाऱ्यांचा परिपात करण्याचे शिवरायांनी जसे ठाणलेच होते. 

      १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवरायांचा जन्म शिवनेरीवर झाला म्हणून नाव शिवाजी ठेवण्यात आले.

        इतिहासातील काही उदाहरणावरून शिवराय जन्मताच दैवी पुरुष आहे. असे मी दर्शवण्याचा प्रयत्न केला किंवा आपण सर्व मानतो, पण त्या पेक्षा शिवराय जन्मताच एक सामान्य मनुष्य म्हणून जन्माला आले आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ते एक दैवी पुरुष झाले. तसेही आपल्या संतांनीही सांगितले च आहे की कर्तृत्वाच्या बळे किंवा भक्तीच्या बळे आम्ही झालो देव.

      आपण साधारण मनुष्य  शिवरायांचा आदर्श ठेऊन समाज हितासाठी नक्कीच कार्य करू,  नाहीतर शिवराय जन्मताच दैवी पुरुष आणि आपण तर सामान्य मनुष्य असे म्हटल्यावर आपण काहीही करणार नाही

      पण ज्या दिवशी मीही शिवरयासारखे कर्तृत्व करू शकतो असे ठरवल्यावर फुल नाही पण फुलाची पाकळी एवढे कर्तृत्व शिवरायांचा आदर्श ठेऊन नक्कीच करू. 

   हो की नाही कमेंट करून नक्की सांगा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...