मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

जिजाऊ महासाहेब स्वराज्याच्या पहिल्या उगमस्थान का ? यामागील पाश्वभूमी

        आपल्या स्वतःवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध जो आवाज उठवून त्या अन्यायाला मोडून काढतो ,त्याला आपण वीर मानतो. पण दुसऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठतो, त्याला तर आपण महावीरच म्हटले हवे .

   ' उदाहरणार्थ जिजाऊ महासाहेब'. जेव्हा पूर्ण भारतावर मुघल, निजाम जेव्हा हिंदूंवर  अन्याय अत्याचार करत होते .त्याच वेळी महाराष्ट्राचा काही भाग असा ही होता, जेथे हिंदूं सुरक्षित होते .त्यापैकीच ऐका ठिकाणचे महाराज लखुजीराव जाधव. लखुजीराव  निजामाचे सरदार होते .पण इतर प्रदेशामध्ये जो अन्याय चालला होता, तो त्यांनी सिंदखेड मध्ये त्यांनी प्रजेला सुखात ठेवले होते, आणि याच वातावरणात जिजाऊंचा जन्म झाला.

     लहानपणापासूनच जिजाऊ हुशार होत्या, त्यांनी खुप लवकर राजकारणात लक्ष दिले होते. वडील सरदार असल्यामुळे जिजाऊंना लहानपणापासूनच घोड्यावर बसने, तालावर चालवणे यांचे प्रशिक्षण मिळाले, शिवाय जिजाऊ घर कामातही चपळ होत्या .

    जिजाऊ महासाहेब जेव्हा वडीला बरोबर निजामांच्या प्रदेशात जात तेव्हा तेथील प्रजेवरील अन्याय पाहून मात्र जिजाऊंना अत्यंत दुःख होत.

     खरे तर दुसऱ्या विषयी आपुलकी वाटून त्याच्यावरील अन्याय दूर करणाऱ्यालाच आपण महावीर मानतो . नाहीतर आजचे नेते,आणि युवक दुसऱ्यांचे हित करण्याचे फक्त ढोंग करतात ,प्रचाराच्या वेळी आणि सोसियल मीडियावर हे दिसूनच येते.

   आणि यामुळेच स्वराज्याचे पाहिले उगमस्थान अन्याया विरुद्ध उभे ठाकले ,स्वराज म्हणजे आपल्या सर्वांचे राज्य मायमाऊलींचे रक्षण ,शेतकऱ्यांचे हित अशा राज्याचे खरे स्वप्न जिजाऊनीच पहिल्यांदा पाहिले होते, जिजाऊंचे स्वप्न जर बीज  आहे ,तर शिवराय त्यातील झाड आहे.

     शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी त्यामुळे खरे पाहिले तर जिजाउमहासाहेबच स्वराज्याच्या पहिल्या उगमस्थान आहे.

      जर आपण थोडे आजच्या कालावधीत बघितले, तर मायमाऊल्यानी आपल्या मुला, मुलींना TV वरील प्रेमाच्या मालिका आणि मोबाईल वरील रिकामी चॅटिंग करू देण्या पेक्षा जिजाऊंचा इतिहास वाचून दाखवला तर त्या नक्कीच जिजाऊसारख्या रणांगणा होतील.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...