मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

जिजाऊ महासाहेब स्वराज्याच्या पहिल्या उगमस्थान का ? यामागील पाश्वभूमी

        आपल्या स्वतःवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध जो आवाज उठवून त्या अन्यायाला मोडून काढतो ,त्याला आपण वीर मानतो. पण दुसऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठतो, त्याला तर आपण महावीरच म्हटले हवे .

   ' उदाहरणार्थ जिजाऊ महासाहेब'. जेव्हा पूर्ण भारतावर मुघल, निजाम जेव्हा हिंदूंवर  अन्याय अत्याचार करत होते .त्याच वेळी महाराष्ट्राचा काही भाग असा ही होता, जेथे हिंदूं सुरक्षित होते .त्यापैकीच ऐका ठिकाणचे महाराज लखुजीराव जाधव. लखुजीराव  निजामाचे सरदार होते .पण इतर प्रदेशामध्ये जो अन्याय चालला होता, तो त्यांनी सिंदखेड मध्ये त्यांनी प्रजेला सुखात ठेवले होते, आणि याच वातावरणात जिजाऊंचा जन्म झाला.

     लहानपणापासूनच जिजाऊ हुशार होत्या, त्यांनी खुप लवकर राजकारणात लक्ष दिले होते. वडील सरदार असल्यामुळे जिजाऊंना लहानपणापासूनच घोड्यावर बसने, तालावर चालवणे यांचे प्रशिक्षण मिळाले, शिवाय जिजाऊ घर कामातही चपळ होत्या .

    जिजाऊ महासाहेब जेव्हा वडीला बरोबर निजामांच्या प्रदेशात जात तेव्हा तेथील प्रजेवरील अन्याय पाहून मात्र जिजाऊंना अत्यंत दुःख होत.

     खरे तर दुसऱ्या विषयी आपुलकी वाटून त्याच्यावरील अन्याय दूर करणाऱ्यालाच आपण महावीर मानतो . नाहीतर आजचे नेते,आणि युवक दुसऱ्यांचे हित करण्याचे फक्त ढोंग करतात ,प्रचाराच्या वेळी आणि सोसियल मीडियावर हे दिसूनच येते.

   आणि यामुळेच स्वराज्याचे पाहिले उगमस्थान अन्याया विरुद्ध उभे ठाकले ,स्वराज म्हणजे आपल्या सर्वांचे राज्य मायमाऊलींचे रक्षण ,शेतकऱ्यांचे हित अशा राज्याचे खरे स्वप्न जिजाऊनीच पहिल्यांदा पाहिले होते, जिजाऊंचे स्वप्न जर बीज  आहे ,तर शिवराय त्यातील झाड आहे.

     शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी त्यामुळे खरे पाहिले तर जिजाउमहासाहेबच स्वराज्याच्या पहिल्या उगमस्थान आहे.

      जर आपण थोडे आजच्या कालावधीत बघितले, तर मायमाऊल्यानी आपल्या मुला, मुलींना TV वरील प्रेमाच्या मालिका आणि मोबाईल वरील रिकामी चॅटिंग करू देण्या पेक्षा जिजाऊंचा इतिहास वाचून दाखवला तर त्या नक्कीच जिजाऊसारख्या रणांगणा होतील.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

३ एप्रिल १६८० इतिहासातील एक काळा दिवस ।शिवाजी महाराज पुण्यतिथी दिन

      इतिहासात अनेक वीर योद्धे राजे महाराजे होऊन गेले आणि काळाच्या काळ्या दरीत समाहून पण गेले .पण इतिहासाने असेही काही योद्धे बघितले आहे जे इतिहासात अजर अजरामर तर झालेच, आणि भविष्यात त्यांचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा शरीरावर क्षहारे उभे राहिल्या शिवाय राहणार नाही       त्या पैकी शिवराय आहे यात काही दुमत नाही हेच खरे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्ष मध्ये नावाजलेले अमर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वर्ग वाशी झाले तेव्हा हिंदू स्वराज्य निर्माण करणारा भारताचा खरा वीर इहलोक सोडून गेले याचा संपूर्ण भारत वर्षाला दुःख होते.     शिवराय जेव्हा मृत्यू च्या दारात होते तेव्हाही त्यांना स्वराज्य आणि सामान्य जनतेचीच काळजी होती. संभाजी महाराज नेटकेच मुघलांच्या चंगुळ मधून सुटून आले होते ,शंभूराजे बरोबर शेवटी  खुप बोलावं असही शिवरायांना वाटत होतं.      शिवराय फक्त संसारच करून नाही गेले, तर तुकाराम महाराज रामदास स्वामी च्या सानिध्यात जे परमार्थ रुपी धन तेही जोपासले होते .प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे सर्वात श्रेष्ठ तो भगवंत आहे. ब...