मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

एवढया संकटां नंतर झाला होता संभाजी महाराजांचा राज्यभिषेक


       कोणतेही पद आपल्याला प्राप्त करायचे असेल , किंवा मिळत असेल तर त्यासाठी आपली क्षमता दाखवने खुप गरजेचे असते. आपण इतिहासातील अनेक उदाहरणे पाहिले तर राजाने आपली सत्ता आपल्या पुत्रा कडे कोणती ही क्षमता न बघता सोपवली असे आढळून येते. पण संभाजी महाराजांच्या बाबद हे उलट आदळून येते, ज्यावेळी शिवरायांचे देहांत झाले, त्यावेळी संभाजी महाराज मुघलांच्या तावडीतुन सुटून नेटकेच आले होते. परंपरा आणि क्षमते नुसार संभाजी महाराजांचा छत्रपती पदावर अधिकार होता. पण संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाईना आपला पुत्र राजाराम महाराज यांना सत्तेवर बसवायचे होते. म्हणजेच संभाजी महाराजांना माघे मुघल तर समोर स्वतःची आई असे शत्रू होऊन बसले होते.(आणि औरंगजेबाला ही संभाजी महाराज छत्रपती होऊ नये असे वाटत होते.)

      यामुळेच सोयराबाईनी स्वतःचे सख्खे भाऊ आणि स्वराज्याचे सेनापती हंबीराव मोहिते यांना संभाजी महाराजांना अटक करण्याचा आदेश दिला. पण जेव्हा हंबीरराव संभाजी महाराजा कडे पोहोचले त्यावेळी त्यांनी आपली तलवार संभाजी महाराजांच्या समोर ठेवली म्हणजेच हंबीररावानी स्वराज्याचे छत्रपती आपल्या सख्या भाच्या पेक्षा संभाजी महाराजांना मानले यामधून दोन गोष्टी नक्की स्पष्ट होतात पहिली म्हणजे हंबीरावांचा कार्याप्रति प्रामाणिकपणा आणि संभाजी महाराजांची क्षमता, कारण हंबीररावांना माहीत होते की मुघलांशी लढा शिवरायानंतर संभाजी महाराजच देऊ शकतील.

       संभाजी महाराज जेव्हा रायगडावर आल्यावर काही कालावधीसाठी त्यांनी सोयराबाईंना त्यांच्याच कक्षात बंदी बनवले. पण नंतर मात्र मुक्त करून त्यांना राजमाता या पदावरही आरूढ केले. राजाराम महाराजाना तर संभाजी महाराज सख्खा भावा प्रमाणे वागवत. (एवढं होऊन सुद्धा)

      संभाजी महाराजांवर अष्ट मंडळाचा ही विश्वास होता. संभाजी महाराज राजकारभरात तरबेज होते, अनेक भाषा ते जाणत होते युद्ध कौशल्य, अर्थशास्त्र, नीती शास्त्र शिवाय संस्कृत भाषेत त्यांनी अनेक श्लोक ही लिहिले आहे.

      संभाजी महाराजांची छत्रपती या पदासाठी अजिबात हवस नव्हती, पण शिवरायांनी उभे केलेल्या स्वराज्याचे रक्षण करणे गरजेचे होते, म्हणून दूर दृष्टीकोन ठेऊनच ते आपल्या सावत्र आई च्या विरोधात गेले.

     या ठिकाणी संभाजी महाराजाच्या छत्रपती पदासाठी प्राथमिक क्षमता बघितली, तर स्वराज्यातील अनेक सरदार अधिकाऱ्यांचा विश्वास संभाजी महाराजांवर होता. आणि बाकीच्या क्षमता तर  त्यांनी मुघलांशी सामना करताना तब्बल नऊ वर्ष दाखवलेच .

       याच गोष्टीला आजच्या काळात पाहिले तर वडील आपल्या बेजबाबदार मुलाला क्षमता न भागताच संपत्ती देऊन टाकतात आणि कनिष्ठ अधीकारी आपल्या फायद्यासाठी पुढेपुढे करता राजकारणातील नेत्यांमध्ये हे मुख्यत्वे आढळून येते या सर्वांनी संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी त्यांच्या कडून काही शिकावे अशी अपेक्षा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.