मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

एवढया संकटां नंतर झाला होता संभाजी महाराजांचा राज्यभिषेक


       कोणतेही पद आपल्याला प्राप्त करायचे असेल , किंवा मिळत असेल तर त्यासाठी आपली क्षमता दाखवने खुप गरजेचे असते. आपण इतिहासातील अनेक उदाहरणे पाहिले तर राजाने आपली सत्ता आपल्या पुत्रा कडे कोणती ही क्षमता न बघता सोपवली असे आढळून येते. पण संभाजी महाराजांच्या बाबद हे उलट आदळून येते, ज्यावेळी शिवरायांचे देहांत झाले, त्यावेळी संभाजी महाराज मुघलांच्या तावडीतुन सुटून नेटकेच आले होते. परंपरा आणि क्षमते नुसार संभाजी महाराजांचा छत्रपती पदावर अधिकार होता. पण संभाजी महाराजांच्या सावत्र आई सोयराबाईना आपला पुत्र राजाराम महाराज यांना सत्तेवर बसवायचे होते. म्हणजेच संभाजी महाराजांना माघे मुघल तर समोर स्वतःची आई असे शत्रू होऊन बसले होते.(आणि औरंगजेबाला ही संभाजी महाराज छत्रपती होऊ नये असे वाटत होते.)

      यामुळेच सोयराबाईनी स्वतःचे सख्खे भाऊ आणि स्वराज्याचे सेनापती हंबीराव मोहिते यांना संभाजी महाराजांना अटक करण्याचा आदेश दिला. पण जेव्हा हंबीरराव संभाजी महाराजा कडे पोहोचले त्यावेळी त्यांनी आपली तलवार संभाजी महाराजांच्या समोर ठेवली म्हणजेच हंबीररावानी स्वराज्याचे छत्रपती आपल्या सख्या भाच्या पेक्षा संभाजी महाराजांना मानले यामधून दोन गोष्टी नक्की स्पष्ट होतात पहिली म्हणजे हंबीरावांचा कार्याप्रति प्रामाणिकपणा आणि संभाजी महाराजांची क्षमता, कारण हंबीररावांना माहीत होते की मुघलांशी लढा शिवरायानंतर संभाजी महाराजच देऊ शकतील.

       संभाजी महाराज जेव्हा रायगडावर आल्यावर काही कालावधीसाठी त्यांनी सोयराबाईंना त्यांच्याच कक्षात बंदी बनवले. पण नंतर मात्र मुक्त करून त्यांना राजमाता या पदावरही आरूढ केले. राजाराम महाराजाना तर संभाजी महाराज सख्खा भावा प्रमाणे वागवत. (एवढं होऊन सुद्धा)

      संभाजी महाराजांवर अष्ट मंडळाचा ही विश्वास होता. संभाजी महाराज राजकारभरात तरबेज होते, अनेक भाषा ते जाणत होते युद्ध कौशल्य, अर्थशास्त्र, नीती शास्त्र शिवाय संस्कृत भाषेत त्यांनी अनेक श्लोक ही लिहिले आहे.

      संभाजी महाराजांची छत्रपती या पदासाठी अजिबात हवस नव्हती, पण शिवरायांनी उभे केलेल्या स्वराज्याचे रक्षण करणे गरजेचे होते, म्हणून दूर दृष्टीकोन ठेऊनच ते आपल्या सावत्र आई च्या विरोधात गेले.

     या ठिकाणी संभाजी महाराजाच्या छत्रपती पदासाठी प्राथमिक क्षमता बघितली, तर स्वराज्यातील अनेक सरदार अधिकाऱ्यांचा विश्वास संभाजी महाराजांवर होता. आणि बाकीच्या क्षमता तर  त्यांनी मुघलांशी सामना करताना तब्बल नऊ वर्ष दाखवलेच .

       याच गोष्टीला आजच्या काळात पाहिले तर वडील आपल्या बेजबाबदार मुलाला क्षमता न भागताच संपत्ती देऊन टाकतात आणि कनिष्ठ अधीकारी आपल्या फायद्यासाठी पुढेपुढे करता राजकारणातील नेत्यांमध्ये हे मुख्यत्वे आढळून येते या सर्वांनी संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनी त्यांच्या कडून काही शिकावे अशी अपेक्षा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

दृष्टा विरुद्ध लढणाऱ्या दुर्गा मातेकडून घ्या हे पाच मौल्यवान गुण

            महिषासुराने तप करून देवांकडून अजय होण्याचे वर मागितले व ते देवांना नाईलाजाने द्यावे लागले.   त्यांना माहीत होतं,की हा राक्षस त्याच्या शक्तीचा गैरवापर नक्की करेल.आणि तसेच झाले महिषासुराने देवलोकला जिंकून घेतले यानंतर महिषासुराचा वध करण्यासाठी इंद्राने माता पार्वतीची आराधना केली.प्रसन्न होऊन मातेने इंद्राला महिषासुराचा वध करण्याचे आश्वासन दिले.आणि यानंतर दुर्गा अवतार घेऊन मातेने नऊ दिवसामध्ये असुरांचा वध केला,यामधून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो,त्यातील काही पुढल प्रमाणे- १.अंतरंगातील वाईट (राक्षसी) विचारांचा वध          दुर्गा मातेने राक्षसांशी जे युद्ध केले.त्यातून पहिला हाच संदेश मिळतो,की जसे माता दुर्गाने राक्षसांचा वध केला तसेच आपल्या अंतरंगातील काम, वासना,क्रोध लोभ यासारखे अनेक राक्षस असतात.भक्ती नामक शक्ती निर्माण करून आपण वाईट विचारांचा वध करू शकतो.   २.अशक्य गोष्टीस योजना_          महिषासुराला अजय होण्याचे वर होते. तो ज्याच्याशी युद्धाला सिद्ध होत त्याचा पराभव होत ,पण मातेने त्याला...

३ एप्रिल १६८० इतिहासातील एक काळा दिवस ।शिवाजी महाराज पुण्यतिथी दिन

      इतिहासात अनेक वीर योद्धे राजे महाराजे होऊन गेले आणि काळाच्या काळ्या दरीत समाहून पण गेले .पण इतिहासाने असेही काही योद्धे बघितले आहे जे इतिहासात अजर अजरामर तर झालेच, आणि भविष्यात त्यांचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा शरीरावर क्षहारे उभे राहिल्या शिवाय राहणार नाही       त्या पैकी शिवराय आहे यात काही दुमत नाही हेच खरे, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत वर्ष मध्ये नावाजलेले अमर योद्धे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वर्ग वाशी झाले तेव्हा हिंदू स्वराज्य निर्माण करणारा भारताचा खरा वीर इहलोक सोडून गेले याचा संपूर्ण भारत वर्षाला दुःख होते.     शिवराय जेव्हा मृत्यू च्या दारात होते तेव्हाही त्यांना स्वराज्य आणि सामान्य जनतेचीच काळजी होती. संभाजी महाराज नेटकेच मुघलांच्या चंगुळ मधून सुटून आले होते ,शंभूराजे बरोबर शेवटी  खुप बोलावं असही शिवरायांना वाटत होतं.      शिवराय फक्त संसारच करून नाही गेले, तर तुकाराम महाराज रामदास स्वामी च्या सानिध्यात जे परमार्थ रुपी धन तेही जोपासले होते .प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे सर्वात श्रेष्ठ तो भगवंत आहे. ब...