मुख्य सामग्रीवर वगळा

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

चंपाषष्ठीला घ्या खंडेरायकडून हे मौल्यवान गुण



          संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदेवत खंडेराया यांना संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय आदराने पुजले जाते. गोंधळाचा पहिला       मान खंडेरायलाच ,पण आपण खंडेरायाला डीवट्या पूजन गोंधळ या वितिरिक्त कधी समजूनच घेतले नाही.               खंडेराया हे एक जागृत देवस्थान आहे .खंडेरायाच्या भक्ती बरोबरच खंडेरायकडून खुप काही शिकण्यासारखे ही आहे. 

माणिचुर पर्वतावर सप्तर्षी तप करत होते. पण याच वेळी मल्ल नावाचा राक्षस त्या सप्तर्षीना त्रास देत होता .ब्रम्हाकडून अमरत्व सारखं वरदान प्राप्त झाले होते. त्यामुळे भक्तांच्या रक्षणासाठी शिवशंकराने खंडेरायाच्या अवतार घेतला .

     भक्तांचे तारण करण्यास व दृष्टा चा संहार करण्यास देव अवतार घेत असतो, रावणाचा अत्याचार वाढल्यावर राम आले धर्म भ्रष्ट झाल्यावर श्री कृष्ण आले. तर मुघलांचा अत्याचार वाढल्यावर शिवराय आले, गरज आहे या काळात अशाच वीरांची .

मल्लाचा पराभव केल्या नंतर मरताना मल्ल राक्षसाने माझे नाव आपल्यात घ्यावे अशी विनंती केल्यावर खंडेराया मल्हारी या नावाने सुद्धा ओळखला जाऊ लागले .(खंडांग+ राव राजा खंडांगाचा  राजा असा हा खंडेराव )

  शत्रूला माफ करतो तो एक वीर माणूस तर शत्रूचे ही नाव स्वतःत घेतो त्याला तर देवच म्हटले जाते .खरे पाहिले तर दृष्ट गुण विरोधकात असतात तोपर्यंत तो आपला शत्रू पण दृष्ट गुण संपल्यावर तो आपला सोबतीच होतो .पण अस ओळखणारा एक देवच असतो.

मुळातच मल्ला चा वध हा पती पत्नीच्या हातून होईल असा वर होता त्या मुळे नियती नुसार खंडेरायाने देवी भानई शी लग्न करून मल्लाचा वध केला. भानई मागील जन्मातील गंगा होती.पती रुपी महादेव मिळावे असा वर तिने मागितला होता .आणि खंडेरायाच्या तो ही वर पूर्ण केला.

     तसे पाहिलेतर खंडेरायाच्या हा अवतार पूर्ण पणे समृद्ध आहे .शिकण्या सारखे खुप आहे. देवी म्हाळसेचा खंडेरायाला शाप देवी म्हाळसेचा बाणाई वरील राग या गोष्टी संसारी माणसाला खूप काही शिकवतात मी माझ्या अल्प बुद्धीने होईल तेवढे मंडण्या पर्यंत केला .येणाऱ्या पुढील भागात होईल तेवढी माहिती मांडण्याचा नक्की पर्यंत करील .

आजचा भाग आपल्याला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा.



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छत्रसाल बुंदेला स्वराज स्थापने साठी छत्रपती शिवरायांकडून झाले होते प्रेरित

    छत्रपती शिवरायांनी ज्या प्रमाणे दक्षिण भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण केले. त्याच प्रमाणे आपणही उत्तर भारतात हिंदू समाजा साठी स्वराज्य निर्माण करू शकतो असे विचार करणारे बुंदेल खंडचे महाराज छत्रसाल बुंदेले.     महाराज छत्रसाल यांचा जन्म ४ एप्रिल १६४९ रोजी  राजस्थान मधील टिकम गड जिल्यातील ककर कांचनाहे या गावी झाला. चंपतराय बुंदेला हे त्यांचे वडील . छत्रसाल हे १२ वर्षाचे असताना त्यांच्या आई वडिलांचे निधन झाले. आणि त्याच कालावधीत मुघलांनी बुंदेल खंडावर हल्ला चढवला. बुंदेलखंड मुघलांकडे गेल्यावर छत्रसाल यांच्या मोठ्या भावाने मुघलांचे वर्चस्व स्वीकारले. त्यामुळे वयाने लहान असे छत्रसाल यांच्या ताब्यात काहीच राहिले नाही. शेवटी छत्रसाल आणि त्यांचे भाऊ हे सर्व छत्रसाल यांच्या वडिलांचे मित्र जयसिंग यांच्या कडे गेले, व त्यांच्या सेनेत शामिल झाले.     जयसिंग हे औरंगजेबासाठी काम करत होते. जयसिंग यांना ज्या मुघलांकडून जी पण  कामगिरी भेटत त्यामध्ये छत्रसाल पण सामील होत.        छत्रसाल बुंदेला यांना १६६५ मध्ये निजमविरुद्ध च्या लढाई...

26 सप्टेंबर शिव छत्रपती दिनविशेष

  गुरुवार २६ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर ४ आश्विन शके १९४६, भाद्रपद कृष्ण नवमी दुपारी १२-२५ पर्यंत, २६ सप्टेंबर इ.स.१६७७ छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले जिंजी व वेलोर ह्या दोन बळकट किल्ल्यांच्या आसपासचा बावीस लाख होन उत्पादनाचा मुलूख काबीज केला. इतर   १९१० - त्रावणकोर सरकारने स्वदेशाभिमानी या पेपरमध्ये टीका प्रकाशित केल्यानंतर भारतीय पत्रकार रामकृष्ण पिल्लई यांना अटक केली.

राजर्षी शाहू महाराज एक नाविन्यपूर्ण विचारांचा राजा

     जनतेसाठी व जनतेच्या विकासासाठी जर संपूर्ण तिजोरी जरी मुक्त झाली तरीही चालेल. स्वतः राजा आहे पण धनाचा वापर जनतेसाठी स्वतःचे जीवन आनंदी बनवण्यासाठी नाही ,असे विचार करणारे राजर्षि शाहू महाराज.       छत्रपती व राजर्षि शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू किंवा चौथे शाहू महाराज म्हणून ओळखले जाणारे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. राजर्षि शाहू महाराज यांनी त्यांच्या कालावधीत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातील काही पुढील प्रमाणे.    १. शिक्षणाकडे लक्ष राजर्षि शाहू महाराजयांनी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. महिला शिक्षणाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले त्याच बरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणकडे ही त्यांनी लक्ष दिले.   २.अनेक चुकीच्या प्रथेला विरोध   भारतात त्या कालावधीत अनेक चुकीच्या प्रथा होत्या, ज्यामुळे सामान्य जनता व महिला या जाचात भरडून निघत. यामुळे शाहू महाराजांनी सती प्रथा, केस वेपन अशा प्रथा बंद केल्या.   ३.जातीय भेदाभेदास विरोध      त्या कालावधीत मागासवर्गीय समाजाकडे खुप डावलून बघितले जाई. त्यांना शिक्षणा...