मुख्य सामग्रीवर वगळा

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

गणपती बाप्पा चा चातुर्य हा एक गुण


 गणपती बाप्पा चा चातुर्य हा एक गुण 

गणपती बाप्पा ही ज्ञानाची, बुद्धीची,शक्तीची, व आरोग्याची देवता आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे आपण गणरायकडून अनेक गुण घेऊ शकतो.चातुर्य हा त्या पैकी एक .तो गुण पुढील काही उदाहरणावरून लक्षातच येईल.

  पुराणात अनेक कथा गणरायाच्या बुद्धीचे व चतुर्याचे वर्णन करतात -

         ती एक कथा तर सर्वानाच माहीत असेल, ज्यावेळी गणरायावर जेव्हा साडेसाती म्हणजेच शनी ग्रह लागणार होता. त्यावेळी शनी देव गणरायाकडे निघाले.ही गोष्ट जेव्हा गणरायाला कळाली तेव्हा गणरायाने एक युक्ती लढवली, व शनी देव ज्या मार्गाने येत होता त्या मार्गावर  जिते तिथ लिहून ठेवले की "उद्या या" .गणपती हे देवाचे प्रमुख असल्याने त्यांच्या या विनंतीला शनिदेव मान देत दुसऱ्या दिवशी आले. पण दुसऱ्याची दिवशी तसेच लिहिले असल्याने त्यांना परत जावे लागले. शनी देव जेव्हा गणरायकडे येतात त्यावेळी त्यांना हेच वाचण्यास मिळते. त्यामुळे सर्व देवांमध्ये  फक्त गणपती (व हनुमान )यांना शनिग्रह लागत नाही .

           गणरायाच्या बुद्धी चातुर्यामुळे शनि देव गणरायपर्यंत कधीच पोहोचलेच नाही .म्हणून गणरायाची  प्रथम पूजा केली जाण्याचे एक कारणच आहे .

        या पौराणिक कथे वरून गणरायाच्या बुद्धीचे व चतुर्याचे महत्व कळून येते. शनी सर्वांवर हावी होतो ,पूर्ण रामा पर्यंत पण गणरायावर नाही.

        यावरून संकट कितीही मोठे असले तरी निट विचार करून निर्णय घेतला तर मार्ग नक्कीच सापडतो, फक्त आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे .म्हणून गणरायाची भक्ती केल्यावर जर आपल्यावर संकट आले तर योग्य वेळी गणराया धाऊन येतो व योग्य विचार व निर्णय घेण्याची शक्ती देतो. हे या कथे वरून लक्षात येते.

    

क्रमशः.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिव दिनविशेष २६ फेब्रुवारी १६४७

 २६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.

शिव तेज दिन ।शिवरायांचे आठवावे ते रूप शिवरायांचा आठवावा तो प्रताप

    भारतात   काही नापाक आतंकवादयानी घुसून हल्ला केला, ज्यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झाले, पण जे आतंकवादी भारत भूमी मध्ये घुसले होते, त्यांना मात्र कंठस्नान घालण्यात आले .     एक महिन्यानंतर भारताने या हमल्याचा बदला पाकिस्तान मधील आतंकवादी लॉन्चपँड वर सर्जिकल स्राईक करून घेतला ,एवढं काय अमेरिकेनेही अनेक वेळा सर्जिकल स्राईक केलं आहे.      पण ही संकल्पना आली कोठून ? तर याचा पहिला संदर्भ सापडतो ,तो म्हणजे छत्रपती शिवरायांनी शाईस्तेखाना वर केलेली कारवाई ज्याला आपण छापा युद्ध सुद्धा म्हणतो, ८० हजार फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान मामा तीन बोटे तोडून कसा पसार झाला ,हा इतिहास आपण सर्वच जाणतो .      शिवरायांचा असा समृद्ध इतिहास महाराष्ट्रा सह संपूर्ण भारतभूमीला लाभला आहे .पण तो वारसा आपण जपतो का आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सांगतो का या वरून लक्षात येते.       शिवरायांचा इतिहास आपण लक्षात फक्त आपली सांस्कृतिक धन आहे, पुरोगामी इतिहास आहे, म्हणून लक्षात ठेवण्या पेक्षा शिवरायांनी वापरलेल्या योजना कौशल्य आत्मसात करून आजच्या ही कालावधीत...

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...