२६ फेब्रुवारी १६४७ : थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी शिवाजी महाराजांची पाठवणी बंगळूरहून पुणे जहागिरीकडे केली. या ऐतिहासिक घटनेने मराठा साम्राज्याच्या विस्तारास प्रारंभ केला. शहाजी राजेंच्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची नींव रचली. हा दिवस इतिहासात एक महत्वाचा टप्पा आहे, जो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वारशात अमर राहील. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते: शक्ती, धाडस, आणि आत्मविश्वास यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराज भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व बनले.
या आधीच्या भागात आपण शिवरायांच्या जन्मकाळावधी पासून संकटांची वर्दळ पहिली, या भागात आपण संभाजी महाराजांच्या ही जन्म कालावधी पासून संकटांची वर्दळ होती ,ती पुढील मुद्यांवरून पाहू- १. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर या किल्यावर झाला. आणि स्वराज्याला छावा मिळाला. पण वीरांच्या आयुष्यात जन्मापासूनच संकटे जशी त्यांची परीक्षाच पाहतात. २. सर्वात मोठं संकट म्हणजेच अफजलखान ज्यावेळी शिवरायांवर चालून आला त्याच वेळी संभाजी राजे नुकतेच ४ महिन्यांचे झाले होते, आणि याच कालावधीत अफजलखान महाराष्ट्रावर चालून आला होता, आणि शिवरायांचा मुलुख बेचराख करत चालला होता . आणि सँभाजी महाराजांचे मामा बजाजी निंबाळकर हे अफजलखानाच्या कैदेत अडकले होते. ३ .आणि त्याच कालावधीत सँभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई या आजारी होत्या. त्यामुळे संभाजी राजेंना पुरेसे दूध भेटत नव्हते, त्यामुळे त्यांच्यासाठी दाईची व्यवस्था करण्यात आली होती. ४. आणि याच कालावधीत सँभाजी राजेंच्या मातोश्र...