मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

१५ जानेवारी इ.स.१६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीवर छापा घालुन जावळी काबीज केली.

  जावळी काबीज झाली. 15 जानेवारी 1656 या दिवशी महाराज जातीनिशी जावळीत आले. शंभू महादेवाची... महाबळेश्वराची जावळी स्वराज्यात सामील झाली. या युद्धात चंद्ररावांकडून लढणारा एक योद्धा महाराजांनी स्वराज्यात सामील केला - मुरारबाजी देशपांडे, तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक येत असाल तर आजच या!" जावळीच्या घनदाट जंगलात राज्य करणार्या चंद्रराव मोर्यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना डिवचलं. महाबळेश्वर, मकरंदगड आणि पारघाटाच्या डोंगरांच्या दाटीत चंद्रराव मोर्यांची जावळी वसली होती. जावळीच्या जंगलात राज्य करायला वाघाचेच काळीज हवे आणि मोऱ्यांचे काळीज खरोखर वाघाचेच होते. म्हणूनच मोरे जावळीत पिढ्यान्पिढ्या दौलत थाटून बसले होते. मोरे आदिलशहांचे मांडलिक सरदार होते. 'चंद्रराव' हा मोऱ्यांचा पिढीजात किताब होता. आदिलशहाची अवकृपा झाली आणि मोऱ्यांची दौलत जप्त करण्याचा हुकूम सुटला, पण छत्रपति शिवाजी महाराजांच्या पाठबळामुळे यशवंतराव मोरे 'चंद्रराव' झाले. चंद्रराव आपला भाऊबंद प्रतापराव मोरे व कारभारी हणमंतराव मोऱ्यांसवे जावळीचा कारभार पाहू लागले. काही चुगलखोर चंद्रराव व हणमंतरावांच्या कानाला ला...

गणरायाचे विवेकबुद्धी व शांतपण हे अतुलनीय गुण

 गणरायाचे विवेकबुद्धी व शांतपण हे अतुलनीय गुण  अगोदर च्या भागात गणरायाच्या चातुर्य या गुणाचा मागोवा घेतला या भागात आपण विवेक बुद्धी व शांतपणा या गुणांचा मागोवा घेऊ  - विवेक बुद्धी या गुणांचा आपल्या जीवनात असामान्य महत्व आहे .आपली बुद्धी विवेकी स्थिर ,व परस्थितीनुसार निर्णय करणारी असेल तर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो. क्रोध नियंत्रित करू शकतो हे पुढील कथेवरून लक्षातच येईल-           ती कथा आपल्या सर्वानाच माहित आहे .जेव्हा देवानं वादविवाद सुरु  झाला, कि प्रथम पूजनाचा मान कोन्हाला याचे उत्तर म्हणून ब्रम्हदेवाने स्पर्धा आयोजित केली, कि जो कोण्ही संपूर्ण ब्रम्हांडाला चक्कर मारिल तो विजयी . मातापार्वतीनी गणराया व कार्तिकेय या दोघांना या स्पर्धेत भाग घेण्यास सांगितल. या ठिकाणी गणरायाचे वाहन मूषक होते तरीही गणरायाने भाग घेतला. जेव्हा स्पर्धा सुरु झाली तेव्हा गणराया सर्वात मागे होते .तरीही गणरायाने योग्य निर्णय घेत आपले मातापिता यांना चक्कर मारला .जेव्हा याचे कारण गणरायाला विचारले तेव्हा गणरायाणे सांगितले कि जर मातापित्यातच जर सम्पूर्ण ब...

गणपती बाप्पा चा चातुर्य हा एक गुण

  गणपती बाप्पा चा चातुर्य हा एक गुण  गणपती बाप्पा ही ज्ञानाची, बुद्धीची,शक्तीची, व आरोग्याची देवता आहे, हे आपल्या सर्वांना माहितच आहे आपण गणरायकडून अनेक गुण घेऊ शकतो.चातुर्य हा त्या पैकी एक .तो गुण पुढील काही उदाहरणावरून लक्षातच येईल.   पुराणात अनेक कथा गणरायाच्या बुद्धीचे व चतुर्याचे वर्णन करतात -          ती एक कथा तर सर्वानाच माहीत असेल, ज्यावेळी गणरायावर जेव्हा साडेसाती म्हणजेच शनी ग्रह लागणार होता. त्यावेळी शनी देव गणरायाकडे निघाले.ही गोष्ट जेव्हा गणरायाला कळाली तेव्हा गणरायाने एक युक्ती लढवली, व शनी देव ज्या मार्गाने येत होता त्या मार्गावर  जिते तिथ लिहून ठेवले की "उद्या या " .गणपती हे देवाचे प्रमुख असल्याने त्यांच्या या विनंतीला शनिदेव मान देत दुसऱ्या दिवशी आले. पण दुसऱ्याची दिवशी तसेच लिहिले असल्याने त्यांना परत जावे लागले. शनी देव जेव्हा गणरायकडे येतात त्यावेळी त्यांना हेच वाचण्यास मिळते. त्यामुळे सर्व देवांमध्ये  फक्त गणपती (व हनुमान )यांना शनिग्रह लागत नाही .            गणरायाच्या बुद्धी चातुर्याम...

शिवरायांचे बालपणीचे शिक्षण

 शिवरायांचे बालपणीचे शिक्षण  शिवराय हे छत्रपती झाले असतील तर त्या मागे त्यांच्या प्रशिक्षणाचा नक्किच मोठा वाटा आहे हे पुढील काही मुद्यांवरून आढळून येते- प्रात्यक्षित पद्धतीचे शिक्षण (Practical knowledge)           शिवरायांच्या कालावधीत शिक्षण हे मुख्य करून प्रात्यक्षिक पध्दतीचे होते. असे आढळून येते या कालावधीतील विद्यार्थ्यांना युद्ध कला जसे  तालावरबाजी, दांडपट्टा, घोड्यावर रपेट मारणे अशा विविध कला शिकवल्या जात.             आजच्या कालावधीत प्रात्यक्षित पद्धतीचे शिक्षण खुप कमी दिसून येते. १ तासाच्या आत शिकवलेला विषय जीवनात कोठे उपयोगी पडू शकतो हे काही वेळा शिक्षक सांगत नाही, तर विद्यार्थी ही समजून घेत नाही शिवाय पाण्यात पडल्या शिवाय पोहता कसे काय येईल . संघ व वयक्तिक पद्धतीचे शिक्षण          संघ पद्धतीने म्हणजे एकत्र जसे शिवरायांचे शिक्षक गुरू दादाजी कोंडदेव  हे शिवरायांना त्याच बरोबर मावळ्यांना आणि शिवरायांच्या सवंगड्याना एक सोबत व वयक्तिक शिक्षण देत असे पण त्यांच्या शिस्तीत मात्र थोडा सु...

भारतीय स्वातंत्र्य विरांच्या (क्रांतिकारकांच्या) कथा

  भारतीय स्वातंत्र्य विरांच्या (क्रांतिकारकांच्या) कथा  आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनेक स्वातंत्र्य विरांपासून यशाचे काही धडे घेऊ शकतो - 1. आर्थिक संकट           अनेक क्रांतिकारक हे गरीब व आर्थिक टंचाईतलेच होते. घरामध्ये अनेक आर्थिक अडचणी ही होत्या, पण त्यांना आर्थिक श्रीमंती पेक्षा देशाचे स्वातंत्र्य महत्वाचे होते. मग त्यामध्ये लोकमान्य टिळक असतील चंद्रशेखर आझाद असतील भगतसिंग असेल किंवा सुभाषचंद्र बोस असतील, सुभाषचंद्रानि देशासाठी कलेक्टर पद सोडलं   यावरून महत्वाच्या गोष्टीसाठी कोणताही मोह सोडावा हे लक्ष्यात येते, तर अनेक आर्थिक अडचनीणा कसे सामोरे जावे हे आपण स्वातंत्र्य वीरांकडून शिकतो.  (तोरणा जिंकल्यावर शिवरायानं समोर अनेक आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले होते पण त्याच वेळी तोरणा किल्यावर सोन्याचे घडे सापडले ) 2.कठीण परिथितील विजय          स्वातंत्र्य विरांसमोर अनेक संकट होती ठीक ठिकाणी इंग्रजचे गुप्तचर होते, त्यात भारतातलेच अनेक शिपाई होते, संदेश पाठवण्यास क्रांतीकारकांना अनेक अडचणनी आल्या प...

श्री कृष्णा च्या बालपणीचे वैशिष्ट्य व गुण

  श्री कृष्णा च्या बालपणीचे वैशिष्ट्य व गुण  श्री कृष्णांच्या बाळपणापासून अनेक गुण घेऊ शकतो जसे की - 1.श्रीकृष्णाचा जन्मच कारागृहात झाला. मामा वैरी तर आई वडील बंधिस्त म्हणजेच संकटाची सुरुवातच जन्मापासूनच झाली होती. पण नियतीला तेथे काही वेगळेच घडवायचे होते. त्यामुळेच श्री कृष्ण कारागृहातून मूक्त होऊन नंदराजाच्या घरी पोहचले  आपल्याही आयुष्यात पहिले तर आपलाही जन्म गरीब किंवा श्रीमंत परिवारात झाला आहे, याचा विचार न करता आपल लक्ष्य  काय आहे, विचार करण महत्वाचे आहे.  (शिवाजीमहाराजांचा जन्मही दुःखाच्या परिस्थितीत शिवनेरीवर झाला होता.) 2.श्री कृष्ण हे देव आहे. पण जर आपण त्यांच्याकडे एका मित्रा प्रमाणे पहिले तर अनेक गुण हेऊ शकतो. जसे की श्री कृष्णाने बालपणीच अनेक राक्षसांचा वध केला होता   आपल्याही आयुष्यात अनेक संकट येतात पण आपल्या क्षमते नुसार त्यांचा सामना केला तर आपले ही आयुष्य ठरलेल्या लक्ष्या पर्यंत जाऊन पोहचेल.  3.श्री कृष्णा लहानपणापासूनच नटखट खोडकर आनंदी व उत्साहित होते पण तेवढेच माता यशोदेचे आज्ञाकारी ही होते.  आपणही बालपणात खोडकर असतो पण तेवढेच आ...

शिवरायांचा तोरणा विजय

शिवरायांचा तोरणा विजय  शिवरायांनी तोरणा जिंखन्यासाठी ज्या योजना वापरल्या त्या अतुलनीय होत्या. वयाच्या फक्त अठराव्या वर्षीं त्यांनी हा गढ  जिंखला. (आणि आजच्या या वयातील मुलांचा विचार केलातर या वयातील मुलं दहावी बारावी ची परीक्षाच देत असतात.)  शिवरायांनी गढावर चढाई करण्यापूर्वी अनेक मुख्य आणि महत्वाच्या बाबींचा विचार केला होता, असेच दिसून येते,पुढील मुद्यावरून ते लक्ष्यातच येईल. गडाची ओळख  शिवरायांनी गुप्तचरांच्या माध्यमातून गडावरील संपूर्ण माहिती मिळवली होती. स्वतः रूप पालटून गडावरील माहिती मिळवली. गड प्रमुखाच्या गोटात शिवरायांचे गुप्तचर जाऊन पोहोचलो होते. गडावरील पूर्ण तपशील मिळाल्या नंतरच शिवरायांनी पुढील योजना आखली.असे दिसून येते.  गाडावरील नाजूक भागांचा शोध  शिवरायांनी गडावरील सर्वप्रथम नाजूक भागांचा शोध घेतला. (नक्कीच एका योध्याने आपल्या शत्रूच्या नाजुक भागांचा शोध घेणं महत्वाच असत व तेच येथे शिवरायांनी केले).  सैनिकांचे नियोजन   शिवरायांनी चाणाक्ष लढाऊ व चपळ मोजक्या सैनिकांची निवड केली (यावरून कोणत्याही युद्धाचा परिणाम सैनिकांच्या संख्येवरून ...

शिवरायांच्या बालपणीचे गुण

शिवरायांचे बालपण  शिवरायांच्या बालपनाचा विचार करण्यापूर्वी जिजाऊचां विचार करणं महत्वाचं आहे  जिजाऊंनी लहानपनीच शिवरायांना  रामायण महाभारतल्या कथा सांगीतल्या ( पण आजचा विचार केला तर पालकांना मुलांशी बोलण्यासाठी सुद्धा वेळ नाहीये) शिवरायांचे लहानपणापासूनच युध्द कलेचे प्रशिक्षण सुरु झाले होते  . (पण आजचा विचार केलातर मुलांचा जास्त वेळ मोबाईल टीव्ही वरच जातोय) शिवराय लहानपणापासूनच उत्साही होते नवीन गोष्टी शिकण्यासाठी दूरवर फिरत गड किल्ले पाहत मित्र बनवट नवीन डावपेच शिकत. ( पण आजचा विचार केलातर युवकांमध्ये उत्साह नाही घरात मोबाइला चटकून राहतात) शिवराय बालपनापासून स्वराज्याचा विचार करत होते.   ( पण आजचे तरुण नोकरीचाच विचार करतोय ) शिवाजी महाराजांनी लहानपणापासूनच शरीराबरोबर मन व बुद्धीलाही बळकट केलं  (पण आजचा तरुण शरीर तर बळकट बनवतोय पण मन विवेकी बनवट नाहीये). शिवराय सात भाषेत प्रवीण होते अनेक युद्धकला गणित ग्रंथात प्रवीण होते.   ( पण आजचा तरुण दहावी पास करण्याआधी सुद्धा कॉप्या करतोय) वरील मत खर असेल तर खाली कंमेन्ट करा.